शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

मतदारयादीतील नावांवरून जुंपली; शेकाप- काँग्रेस आमनेसामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:55 IST

तहसीलदारांना दिले निवेदन; बोगस नावे काढण्यावरून वाद

अलिबाग : लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांचे वारे सध्या जिल्ह्यात वाहताना दिसत आहे. अलिबागमध्ये एकमेकांचे पारंपरिक विरोधक शेकाप आणि काँग्रेस यांच्यामध्ये मतदार यादीत नावे कमी करणे आणि नवीन नावे घालणे यावरून चांगलीच जुंपल्याचे चित्र आहे.अलिबाग तहसीलदार कार्यालयात सोमवारी याचा प्रत्यय आला. शेकापने सुमारे २८६ मतदार बोगस असल्याचे पत्र प्रशासनाला दिले. शेकापने याबाबत तहसीलदारांना थेट पुरावेच सादर केल्याने वातावरण चांगलेच तणावाचे झाले होते.अलिबागमध्ये शेकापला अजूनही काँग्रेसकडून प्रखर विरोध केला जात आहे. हे पारंपरिक कट्टर विरोधक नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी एकमेकांबरोबर भिडत असतात. सध्या मतदारयाद्यांच्या पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम सुरूआहे. त्यानुसार तहसीलदार कार्यालयात या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्या लेटरहेडद्वारे अलिबागच्या प्रांताधिकाऱ्यांना एक पत्र पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये तालुक्यातील २८६ मतदार बोगस आहेत, तसेच त्यांनी बोगस पुरावे दिले आहेत.अलिबाग तालुक्यातील सार्तिजे ग्रामपंचायतीमधील मतदारांच्या नावाचा समावेश आहे. त्यांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट करणारे तलाठी, मंडळ अधिकारी आणि संबंधित मतदार यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. यातील बहुतांश मतदार हे काँग्रेसचे आहेत.काँग्रेस तालुकाध्यक्ष योगेश मगर यांनी यावेळी तहसीलदार यांच्यासमोर आक्र मक भूमिका मांडताना मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण हे वेळोवेळी होत असते, पण एखाद्या पक्षाच्या नेत्याने वारंवार एकच तक्रार करायची आणि प्रशासनाने अशा प्रकारे मतदारांना सातत्याने त्रास देणे हे योग्य नाही. एकदा तपासणीची प्रकिया पूर्ण झाली आणि त्यामध्ये शासनाची खात्री झाली असेल तर मतदारांना सारख्या नोटिसा काढणे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.दरम्यान, अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघामधील मतदारांची नावे बेकायदेशीररीत्या कमी करण्याबाबत मतदार नोंदणी अधिकाºयांवर दबाव टाकणाºयाविरोधात कारवाई करावी अशी लेखी तक्र ार ठाकूर यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केलीआहे. या वेळी ठाकूर यांच्या सोबत जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा अ‍ॅड.श्रद्धा ठाकूर, राजा ठाकूर, रवींद्र (काका) ठाकूर, सातीर्जे सरपंच रवींद्र नाईक, अ‍ॅड.उमेश ठाकूर, काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.काँग्रेसतर्फे जनआंदोलन करण्याचा इशाराधरमतर परिसरामध्ये स्वत:च्या कंपनीमधील परप्रांतीयांच्या मतदार नोंदणीसाठी पुढाकार घेणारे आमदार जयंत पाटील आणि पंडित पाटील हे स्थानिकांची नावे कमी करण्यासाठी अधिकाºयांवर दबाव आणत आहेत. अधिकाºयांनी दबावाखाली येऊन मतदारांची नावे कमी केल्यास काँग्रेस पक्षातर्फे या विरोधात जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी सोमवारी अलिबागचे तहसीलदार सचिन शेजाळ यांची भेट घेऊन दिला.

टॅग्स :congressकाँग्रेसalibaugअलिबाग