शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
3
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
4
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
5
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
6
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
7
महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन
8
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
9
जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?
10
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
11
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
12
Jara Hatke: सिम कार्डचे एक टोक तिरपे का असते? ९९ % लोकांना माहीत नाही कारण!
13
किमान ५ इमारतीच्या गटाचे ‘मिनी क्लस्टर’ लवकरच; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश
14
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
15
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
16
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
17
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
18
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
19
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
20
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
Daily Top 2Weekly Top 5

मुरुडमध्ये नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:54 IST

२० वर्षे नाल्यासाठी संघर्ष; पावसाचे पाणी जाण्याचा मार्ग रोखल्याने संताप

आगरदांडा : मुरुड-शेगवाडा येथील नेताजी सुभाषचंद्र मार्गावरील पावसाचे पाणी जाण्यासाठी गेली २० वर्षे नागरिकांचा नाल्यासाठी संघर्ष चालू आहे. मुरुड आगार, गणेश पाखाडी, भोगेश्वर पाखाडी आदी भागातून वाहणारे पावसाचे पाणी शेगवाडा येथील मुख्य नाल्यातून समुद्रात जाते. मात्र, मुरुड नगरपरिषदेने या मुख्य नाल्यात चार सिमेंटचे पाइप टाकून वर बांधकाम करून पाण्याचा प्रवाह खंडित केला आहे. त्यामुळे नाल्याचा आकार कमी झाल्याने हे मोठा पाऊस झाल्यास हे पाणी नागरिकांच्या घरात शिरणार आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी संतप्त होऊन गुरु वारी मुरुड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना तसेच प्रभागातील नगरसेवकांना घेराव घातला.मुरुड नगरपरिषदेने या नाल्यावरील केलेले बांधकाम हे नगरपरिषदेने प्रमाणित केलेल्या प्रारंभ प्रमाणपत्र अन्वेय जमिनीपासून आठ फूट उंची व २० फूट रुंदी करणे अपेक्षित होते. मात्र, नगरपरिषदेने हे बांधकाम चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे पावसाच्या पाण्याचा मोठा प्रवाह शेगवाडा बागायतीत व घरांमध्ये शिरून आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. तरी बांधलेले बांधकाम दोन दिवसांच्या आत नगरपरिषदेने न तोडल्यास आम्ही ते बांधकाम तोडू, असा इशारा मुरुड-जंजिरा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा कार्यालयामध्ये शेगवाडातील नागरिकांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांना घेराव घालून दिला. संदर्भात जाब विचारण्यात आला आहे. शेगवाडा येथील नाल्याबाबत निवेदन देऊनसुद्धा उपाययोजना झाली नाही. आमचा प्रश्न स्थानिक नगरसेविकांनी सभेमध्ये मांडला पाहिजे होता. मात्र, सभेमध्ये विषय मांडला गेला नाही यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला.नाल्याचे बांधकाम साइटची उंची आठ फूट ठेवायची आहे. स्लॅब व जमीन या मध्ये आठ फूट अंतर ठेवणे आवश्यक होते; परंतु नगरपरिषदेने तसे न करता कमी फुटांमध्ये बांधकाम केल्याने येणाºया पावसात पुन्हा नागरिकांचे हाल होऊन आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. १४ जून २०१९ च्या जनरल सभेत याबाबत विचार केला जाईल, असे तोंडी आश्वासन देण्यात आले होते; परंतु या अर्जाचा जनरल सभेत साधा विचारही न केल्यामुळे नागरिकांनी जाब विचारला.या वेळी नगराध्यक्षा स्नेहा पाटील, मुख्याधिकारी दयानंद गोरे, गटनेते मुग्धा जोशी, नगरसेविका युगा ठाकूर, नगरसेवक प्रमोद भायदे, बांधकाम सभापती अशोक धुमाळ, नेताजी सुभाषचंद्र बोस मित्रमंडळ अध्यक्ष सुधीर पाटील आदीसह शेगवाडातील नागरिक उपस्थित होते.सभेत योग्य निर्णय घेण्याचे आश्वासनमुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न के ला, तेम्हणाले की ज्या वेळी बांधकाम चालू होते, त्या वेळी स्थानिक नागरिकांनी काम बंद करायला पाहिजे होते. त्यावर स्थानिक नागरिकांनी सांगितले की, आम्ही निवडून दिलेल्या स्थानिक नगरसेवकांचे काम होते, त्यांना माहीत आहे की नाल्याचा ज्वलंत प्रश्न शेगवाडीतील नागरिकांना सतावत आहे. हा विषय त्यांनी मांडणे आवश्यक होता. हा संघर्ष गेले २० वर्षे चालू आहे. होणाºया आर्थिक नुकसानाला नगरसेवक जबाबदार राहतील, असा इशारा नागरिकांनी दिला. या संदर्भात ताबडतोब विशेष जनरल सभा लावून योग्य तो निर्णय तुम्हाला देऊ, असे आश्वासन या वेळी नगराध्यक्षा स्नेहा पाटील व मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी दिले.येत्या दोन दिवसांत बांधकाम तोडले नाही तर हे काम येथील नागरिक तोडून टाकतील, असा इशारा दिला आहे. यामुळे नगरपरिषद या बाबतीत कोणता निर्णय घेणार याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष वेधले आहे.नाल्याचे बांधकाम करताना स्लॅब व जमीन यामध्ये आठ फूट अंतर ठेवणे आवश्यक होते; परंतु नगरपरिषदेने तसे न करता कमी फुटांमध्ये बांधकाम के ले आहे.