शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

मुरुडला वादळी पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 02:26 IST

ओखी चक्रीवादळाचा फटका मुरुड तालुकालाही सहन करावा लागला आहे. दिवसभरात ढगाळ वातावरण होते, सायंकाळी अचानक जोरदार वा-यासह पावसाला सुरु वात झाल्याने विद्यार्थी व सामान्य नागरिकांची धावपळ उडाली.

आगरदांडा / बोर्ली मांडला : ओखी चक्रीवादळाचा फटका मुरुड तालुकालाही सहन करावा लागला आहे. दिवसभरात ढगाळ वातावरण होते, सायंकाळी अचानक जोरदार वा-यासह पावसाला सुरु वात झाल्याने विद्यार्थी व सामान्य नागरिकांची धावपळ उडाली.दुपारपासून समुद्रात मोठ्या लाटा येऊ लागल्यामुळे समुद्रलगत असणारा कोळी बांधव घाबरून गेला होता. वादळाच्या भीतीने मुरु ड तालुक्यातील कोळी बांधव मासेमारीला न जाता आपआपल्या होड्या किनाºयावर नांगरून ठेवल्या. वादळी पावसामुळे पशुपक्ष्यांची किलबिल शांत झाली होती. ओखी चक्रीवादळाच्या भीतीने पर्यटकांची संख्या रोडावली, यामुळे स्थानिक उद्योगधंद्यावर याचा परिणाम झाला. सायंकाळी अचानक पाच वाजल्यापासून जोरदार पाऊस सुरू होऊन वीज गायब झाली होती. अनेक तास उलटून गेले तरी ती आलीनव्हती.सध्या मुरु ड शहरातील दत्त मंदिर डोंगरावर तीन दिवसीय यात्रा सुरु असून अचानक पडलेल्या पावसामुळे सर्वांची तारांबळ उडाली. तसेच अनेक तास टेलिफोनची नेट सेवा ही विस्कळीत झाली होती. काही ठिकाणी जलवाहतूक बंद असल्याने अनेकांचा प्रवास रखडला होता.मुरु ड तालुक्यातील बोर्लीमांडला, कोर्लई, वळके, नांदगाव, चेहर, सुपेगाव आदी परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. बोर्ली येथे जोरदार पाऊस झाला. अचानक कोसळलेल्या पावसाने चाकरमान्यांची तारांबळ उडाली. अचानक पडलेल्या पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित होऊन व्यवसाय ठप्प झाला.सर्व बोटी सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्या आहेत. किनारपट्ट्यांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज झाली असून त्या दृष्टीने उपाययोजना सुरू आहेत.वादळी पाऊस१अलिबाग : ‘ओखी’ वादळामुळे पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता तो खरा ठरला आहे. रायगड जिल्ह्यातील काही विभागांमध्ये वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावली. सायंकाळी अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. रायगड जिल्ह्यामध्ये दिवसभर हवामान ढगाळच होते. वातावरणात काही प्रमाणात उष्णता जाणवत होती. सायंकाळी अचानक काळोख झाला आणि जोरदार सोसाट्याचा वारा सुरू झाला. त्याच्या जोडीला पावसाने हजेरी लावली.२सायंकाळी शाळा, सरकारी कार्यालये, न्यायालय, बँका, विविध निमशासकीय, खासगी कार्यालये सुटण्याची वेळ असल्याने अचानक सुरू झालेल्या पावसाने सर्वांचीच त्रेधातिरपीट उडाली. अलिबाग : ‘ओखी’ वादळामुळे पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता तो खरा ठरला आहे. रायगड जिल्ह्यातील काही विभागांमध्ये वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावली. सायंकाळी अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.३रायगड जिल्ह्यामध्ये दिवसभर हवामान ढगाळच होते. वातावरणात काही प्रमाणात उष्णता जाणवत होती. सायंकाळी अचानक काळोख झाला आणि जोरदार सोसाट्याचा वारा सुरू झाला. त्याच्या जोडीला पावसाने हजेरी लावली. सायंकाळी शाळा, सरकारी कार्यालये, न्यायालय, बँका, विविध निमशासकीय, खासगी कार्यालये सुटण्याची वेळ असल्याने अचानक सुरू झालेल्या पावसाने सर्वांचीच त्रेधातिरपीट उडाली.