शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
2
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
3
"कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
4
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
5
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
6
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
7
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
8
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
9
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
10
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
11
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
12
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
13
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
14
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
15
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
16
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
17
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
18
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
19
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
20
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल

मुरुड समुद्रकिनारी टपरीधारकांचे व्यवसाय सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 11:36 PM

नव्या उमेदीने कामाचा शुभारंभ : कर्ज काढून घेतल्या नवीन हातगाड्या

लोकमत न्यूज नेटवर्कमुरुड : मुरुड समुद्रकिनारी सुमारे ४४ टपरीधारक असून, या लोकांचे छोटे-मोठे व्यवसाय आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले होते, परंतु खचून न जाता या टपरीधारकांनी पुन्हा आपला व्यवसाय सुरू केला आहे. कर्ज काढून नवीन हातगाड्याही बनवण्यात आल्या असून, पुन्हा नव्या उमेदीने काम सुरू केले असल्याचे पाहावयास मिळत आहे.

चहाटपरी त्याचप्रमाणे, अल्पोहर व भोजन बनवून देणाऱ्या सर्व टपºया संचारबंदीमुळे प्रदीर्घ काळ बंद असलेली दुकाने सुरू झाल्याने या भागात रेलचेल दिसून येत आहे. अल्प प्रमाणात पर्यटकही दाखल होत असल्याने, या टपरीधारकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.अनेक टपरीधरकांनी सांगितले की, पाऊस कमी असेल, तर पर्यटक जास्त प्रमाणात येतात, परंतु मुसळधार पाऊस पडत आमच्या व्यवसायात मोठी घट झाली आहे. जंजिरा किल्ला पर्यटकांना खुला झाल्यावर पर्यटक संख्या वाढून व्यवसाय सुरळीत होतील, असे टपरीधारकांनी सांगितले.

निसर्ग चक्रीवादळाची मदत अनेक टपरीधारकांना मिळालेली नाही, तरीही मोठ्या प्रमाणात दुकाने उघडण्यात आली आहेत. याबाबत पद्मदुर्ग व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष अरविंद गायकर यांनी निसर्ग चक्रीवादळात बहुतावशी टपऱ्यांचे नुकसान झाले आहे.यातील काही टपरीधारकांनी कर्ज काढून आपल्या हातगाड्यांची दुरुस्ती करून घेतली आहे, तर काही जण दुरुस्तीच्या कामात व्यस्त आहेत. कठीण परस्थिती असतानाही आपले दु:ख विसरून टपरीधारकांनी व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.