शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत आधी लढाई, आता नरमाई; भाजप-शिंदेसेनेत आता होणार चर्चा
2
इंडिगोमुळे प्रवासी बेजार, थेट ठोठावलं सुप्रीम कोर्टाचं दार; CJI सूर्य कांत यांच्या घरी गेले याचिकाकर्ते! म्हणाले...
3
डॉ. बाबासाहेबांच्या हयातीतच कोल्हापूरकरांनी अर्धपुतळा उभारून दिली अनोखी मानवंदना!
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, एकदा पैसे गुंतवा; नंतर व्याजाद्वारेच होईल ५ लाखांची कमाई, जाणून घ्या
5
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
6
Netflix-Warner Bros Deal: नेटफ्लिक्सनं वॉर्नर ब्रदर्सच्या खरेदीची केली घोषणा; पाहा किती कोटींना झाली ही धमाकेदार डील
7
लक्ष्य १०० अब्ज डॉलर व्यापाराचे! केवळ तेलविक्री नव्हे तर भारतातील वाहतूक व सेवेचा लाभ घेण्यास रशियन कंपन्या उत्सुक
8
मारायचं होतं एकीला, हत्या केली दुसऱ्याच शिक्षिकेची, धक्कादायक माहिती आली समोर  
9
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
10
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
11
IndiGo: विमानाला १२ तास विलंब, मदन लाल इंडिगोवर भडकले, विमानतळाला 'फिश मार्केट' म्हणाले!
12
इंडिगो विमान संकट, रेल्वेने मोर्चा सांभाळला, ३७ ट्रेनमध्ये वाढवले ११६ डबे, या दोन स्टेशनदरम्यान धावणार विशेष ट्रेन
13
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
14
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निमिष कुलकर्णी अडकला विवाहबंधनात, पत्नीचं मराठी कलाविश्वाशी आहे खास कनेक्शन
15
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
16
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
17
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
18
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
19
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
20
मध्य रेल्वे मनी लाँड्रिंग: ‘क्लोजर रिपोर्ट’ विशेष न्यायालयाने स्वीकारला, आठ अधिकाऱ्यांचे प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुरुड समुद्रकिनारी टपरीधारकांचे व्यवसाय सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 23:37 IST

नव्या उमेदीने कामाचा शुभारंभ : कर्ज काढून घेतल्या नवीन हातगाड्या

लोकमत न्यूज नेटवर्कमुरुड : मुरुड समुद्रकिनारी सुमारे ४४ टपरीधारक असून, या लोकांचे छोटे-मोठे व्यवसाय आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले होते, परंतु खचून न जाता या टपरीधारकांनी पुन्हा आपला व्यवसाय सुरू केला आहे. कर्ज काढून नवीन हातगाड्याही बनवण्यात आल्या असून, पुन्हा नव्या उमेदीने काम सुरू केले असल्याचे पाहावयास मिळत आहे.

चहाटपरी त्याचप्रमाणे, अल्पोहर व भोजन बनवून देणाऱ्या सर्व टपºया संचारबंदीमुळे प्रदीर्घ काळ बंद असलेली दुकाने सुरू झाल्याने या भागात रेलचेल दिसून येत आहे. अल्प प्रमाणात पर्यटकही दाखल होत असल्याने, या टपरीधारकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.अनेक टपरीधरकांनी सांगितले की, पाऊस कमी असेल, तर पर्यटक जास्त प्रमाणात येतात, परंतु मुसळधार पाऊस पडत आमच्या व्यवसायात मोठी घट झाली आहे. जंजिरा किल्ला पर्यटकांना खुला झाल्यावर पर्यटक संख्या वाढून व्यवसाय सुरळीत होतील, असे टपरीधारकांनी सांगितले.

निसर्ग चक्रीवादळाची मदत अनेक टपरीधारकांना मिळालेली नाही, तरीही मोठ्या प्रमाणात दुकाने उघडण्यात आली आहेत. याबाबत पद्मदुर्ग व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष अरविंद गायकर यांनी निसर्ग चक्रीवादळात बहुतावशी टपऱ्यांचे नुकसान झाले आहे.यातील काही टपरीधारकांनी कर्ज काढून आपल्या हातगाड्यांची दुरुस्ती करून घेतली आहे, तर काही जण दुरुस्तीच्या कामात व्यस्त आहेत. कठीण परस्थिती असतानाही आपले दु:ख विसरून टपरीधारकांनी व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.