शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मुंबई-गोवा महामार्ग रुतला चिखलात; वाहनचालक त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 00:46 IST

ठिकठिकाणी खड्डे : चौपदरीकरणाचे काम संथ गतीने; महामार्गाच्या दुतर्फा केलेला मातीचा भरावामुळे दुरवस्था

दासगाव : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संथ गतीने होत असल्याने आणि ऐन पावसाळ्याच्या तोंडावर संचारबंदी लागू केल्याने, महामार्गाचे काम ठप्प झाले. यामुळे ऐन पावसाळ्यात नवीन रस्त्याकरिता टाकलेला भराव आणि खड्ड्यांनी संपूर्ण रस्त्यावर चिखल झाला आहे. यामुळे वाहनचालकांचे हाल होत आहेत.

दोन राज्यांना जोडणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाेचे चौपदरीकरण २०१४ पूर्वीपासून सुरू आहे. इंदापूर ते पळस्पेदरम्यान पहिल्या टप्प्यात नवीन आणि जुन्या महामार्गाचे वाटोळे झाल्यानंतर लगेचच इंदापूर ते कशेडी या दुसºया टप्प्याला प्रारंभ झाला. यामध्येही गती येत नसल्याचे दिसून येत आहे. २०२० पर्यंत महामार्गाचे काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासनही देण्यात आले. मात्र, शासकीय परवाने, शेतकऱ्यांचे प्रश्न, मातीची उपलब्धता आदी अडचणींमुळे हे काम रखडले आहे. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून महामार्गाचे कामही बंद करण्यात आले. यामुळे ऐन पावसाळ्यापूर्वी केल्या जाणाºया दुरुस्तीचे काम झाले नाही. महामार्गाच्या दुतर्फा केलेला मातीचा भराव, खोदकाम, यामुळे जुन्या रस्त्यावर ऐन पावसाळ्यात मातीचा चिखल आणि खड्डे तयार झाले. आजही ही दुरुस्ती पूर्ण न झाल्याने, रस्त्यावर चिखल आणि खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.जागोजागी निर्माण केलेल्या पर्यायी मार्गावर डांबर शिल्लक राहिले नाही, यामुळे पर्यायी मार्गाचा चिखल रस्त्यावर आला आहे. जुना मार्ग आणि पर्यायी मार्गावरील डांबर निघून गेल्याने खड्डे निर्माण झाले आहेत. महाडजवळ दासगावपासून गांधारपाले, पुढे नातेखिंड ते नांगलवाडीपर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. खड्डेमय रस्त्यातून वाहने चालवताना वाहनचालकाला कसरत करावी लागत आहे. खड्ड्यात टाकल्या जाणाºया भरावाची अवजड वाहनांमुळे वाट लागत आहे.दुरवस्थेमुळे रुग्णांना त्रासच्कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्याचे निर्मूलन यावर शासनाने भर दिल्याने या विकासकामांकडे दुर्लक्ष केले आहे. कोकणातून रुग्णांना उपचारासाठी मुंबई किंवा अन्य ठिकाणी जाताना याच महामार्गाचा वापर करावा लागत आहे. मात्र, महामार्गाच्या दयनीय अवस्थेने रुग्णवाहिकेचे आणि रुग्णांचे हाल होत आहेत. वेळेवर रुग्ण रुग्णालयातपोहोचत नसल्याने रुग्ण दगावण्याच्या घटना घडल्या आहेत.

टॅग्स :Raigadरायगड