शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

मुंबई-गोवा महामार्ग गेला खड्ड्यात, चौपदरीकरणाचे काम थांबल्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 00:15 IST

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे दुसºया टप्प्याचे काम वेगात सुरू असताना, अचानक मार्च महिन्यामध्ये लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे महामार्गाचे काम बंद झाले.

दासगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दासगाव ते महाड या दरम्यान मोठमोठे खड्डे पडले असून, दहा किलोमीटरचा प्रवास जीवघेणा झाला आहे. दुसऱ्या टप्प्याचे चौपदरीकरण सुरू असून, गेले तीन महिने महामार्गाचे चौपदरीकरण लॉकडाऊनमुळे थांबले होते. यामुळे पावसाळ्यात जुन्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे दुसºया टप्प्याचे काम वेगात सुरू असताना, अचानक मार्च महिन्यामध्ये लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे महामार्गाचे काम बंद झाले. दासगाव आणि महाडदरम्यान नवीन रस्त्याला जोडणाºया जुन्या रस्त्यावर दासगाव, वहूर, केंबुर्ली या गावांच्या हद्दीत खड्डे पडले आहेत. काही दिवसांपूर्वी ठेकेदार कंपनीकडून बुजविण्यात आले होते. मात्र, गेल्या चार दिवसांच्या सततच्या पावसामुळे पुन्हा मोठमोठे खड्डे पडले आहेत.आजच्या परिस्थितीत दासगाव ते महाड १० किलोमीटरचा प्रवास या महामार्गावरून धोक्याचा झाला आहे. गेल्या चार दिवसांमध्ये या खड्ड्यांच्या ठिकाणी पंधरा मोटारसायकलस्वारांना अपघात झाला आहे. महामार्गावर पडलेले खड्डे हे काम सुरू असलेल्या ठेकेदार कंपनीने भरायचे आहेत. हे खड्डे वेळीच भरणे अपेक्षित होते; परंतु ठेकेदार कंपनीने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज ही परिस्थिती महामार्गावर निर्माण झाली आहे. तरी ठेकेदार कंपनीने गांभीर्य लक्षात घेत, खड्डे ताबडतोब भरावेत, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे. पडलेल्या खड्ड्यांबाबत ठेकेदार कंपनीकडे संपर्क साधला असता, प्रोजेक्ट अधिकारी जे.एम. नायडू यांनी खड्डे लवकरच व्यवस्थित बुजविले जातील, असे सांगितले.

टॅग्स :Raigadरायगडhighwayमहामार्ग