शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
3
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
4
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
5
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
6
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
8
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
9
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
10
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
11
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
12
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
14
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
15
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
16
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
17
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
20
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका

जागा वाचवण्यासाठी ग्रामस्थांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 23:00 IST

जमीन विक्रीचा व्यवहार रद्द करा; मोजणीला विरोध करणाऱ्यांना पोलिसांनी रोखले

अलिबाग : तालुक्यातील विर्त-सारळ ग्रामस्थांची कोट्यवधी किमतीची गुरचरण जमीन खासगी बिल्डरच्या घशात घालण्यात आली आहे. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी या जागेच्या मोजणीला बुधवारी विरोध केल्याने पोलिसांनी ग्रामस्थांनाच रोखल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गुरचरण जमीन ही गावठाण विस्तारासाठी वापरण्यात येत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने जमीन विक्रीचा व्यवहार रद्द करावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.विर्त-सारळ हे रेवस आणि मांडवा या बंदराला खेटून असणारे गाव आहे. प्रत्येक गावासाठी गुरचरण जमिनी दिलेली असते. विर्त-सारळ गावासाठी तब्बल साडेतेरा एकर जमीन वाट्याला आलेली आहे. या जमिनीवर सुमारे दीडशे वर्षांपासून ग्रामस्थांचा हक्क आहे. मध्यंतरी काही दलालांनी पंचांची नावे वगळून आपली नावे सातबारावर लावली. त्यानंतर ग्रामस्थांना अंधारात ठेवून एका खासगी बिल्डरला विकण्यात आली असे आगरी शेतकरी प्रबोधिनीचे अध्यक्ष राजाराम पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.अलिबाग तालुका हा एमएमआरडीए क्षेत्रामध्ये आहे. त्यामुळे येथील जमिनीला मुंबई-नवी मुंबई सारखा कोट्यवधी रुपयांचा दर आला आहे. हेच उद्दिष्ट डोळ््यासमोर ठेवून दलालांनी गुरचरण जमिनीचा व्यवहार करून जमीन खासगी बिल्डरच्या घशात घातल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या या जमिनीचा बाजारभावानुसार सुमारे २६० कोटी रुपयांचे मूल्य होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. यामध्ये विविध सरकारी अधिकारी, दलाल यांचे हात ओले झाले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी तातडीने जमिनी विक्रीचा व्यवहार रद्द करून ग्रामस्थांना द्यावी, अशी मागणी राजाराम पाटील यांनी यावेळी केली.बुधवारी लावण्यात आलेल्या जमीन मोजणीला ग्रामस्थ विरोध करणार असल्याचे लक्षात घेऊन प्रचंड पोलीस फौजफाटा तैनात केला होता. ग्रामस्थांनी याही परिस्थितीत मोजणीला प्रखर विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना रोखून तो हाणून पाडला. त्यामुळे त्या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते.गाव विस्तारासाठी केली होती जागेची मागणीगुरचरण जमीन ही संबंधित गावाच्या विस्तारासाठी असते. त्याचप्रमाणे याच जमिनीचा वापर पिढ्यानपिढ्या गुरांना चरण्यासाठी, गोठे बांधणे, काही प्रमाणात शेतीचा व्यवसायही करण्यासाठी केला जातो. गावातील कुटुंबांची संख्या वाढली आहे. त्यामुळे गावाचे विस्तारीकरण गुरचरण जागेत करावा अशी मागणी जिल्हा प्रशासन आणि भूमिअभिलेख विभागाकडे केली होती मात्र त्यांनी त्यावर काहीच कारवाई केली नाही, असे विर्त सारळ ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष प्रवीण वार्डे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.ग्रामस्थांवर खोट्या तक्रारी दाखल करून त्रास दिला जात आहे. या जागेबाबत न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे असे असताना प्रशासनाने जमिनीची मोजणी करणे बेकायदेशीर असल्याचे अ‍ॅड.राकेश पाटील यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :alibaugअलिबाग