शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

दाखल्यांबाबत स्पष्टीकरणासाठी तलाठी संघटनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 02:05 IST

जन्म-मृत्यू, विवाह यासह सर्वच आवश्यक दाखले महसूल विभागाच्या तलाठ्यांमार्फत दिले जातात. हे दाखले कोणत्या नियमाच्या आधारे दिले, याबाबत कोणाला कोणतीच माहिती नसते

दासगाव : जन्म-मृत्यू, विवाह यासह सर्वच आवश्यक दाखले महसूल विभागाच्या तलाठ्यांमार्फत दिले जातात. हे दाखले कोणत्या नियमाच्या आधारे दिले, याबाबत कोणाला कोणतीच माहिती नसते. उच्च पदस्थ अधिकाºयांनी याबाबतची माहिती जाहीर करावी, अशा मागणीचा आग्रह धरत तलाठी संघटनेने आंदोलन पुकारले आहे.ग्रामीण आणि शहरी जीवनाचा महसूल विभागातील तलाठी हा महत्त्वपूर्ण भाग आहे. जन्म, मृत्यू, वारस दाखले, वंशावळ, भूमिहीन, शेतमजूर, विधवा, परित्यक्त्या, जमिनीच्या चतु:सीमा यासह असंख्य दाखले तलाठ्यांमार्फत दिले जातात. या दाखल्यावर सर्वच कामे अगदी सहजगत्या होतात. मात्र एखादा दाखला का दिला जो देण्यासाठी कायद्याचा आधार काय असा युक्तिवाद केला जातो. त्या वेळी सर्वच जण अनुत्तरित असतात. महसूल विभागामार्फत देण्यात येणारे हे दाखले आणि दाखले देण्यासाठीचा नियम याबाबतचा सविस्तर अशी माहिती कोणाकडे उपलब्ध नाही. शासनानेही माहिती उपलब्ध करून द्यावी, असा आग्रह धरत तलाठी संघटनेने दाखले देणे बंद आंदोलन पुकारले आहे.२ आॅक्टोबरपासून तलाठ्यांच्या या आंदोलनाला प्रारंभ झाला आहे. वेगवेगळ्या ३६ प्रकारच्या या दाखल्यांची यादी करत हे दाखले देण्याचे बंद करण्याचा निर्णय महाराष्टÑ राज्य तलाठी संघाने घेतला आहे. या आंदोलनामुळे सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागणार असून, हे आंदोलन जनहितार्थ असल्याचे सांगत लोकांनी तलाठी संघटनांना सहकार्य करावे, असे आवाहन संघटनेमार्फत केले आहे.

टॅग्स :Raigadरायगड