शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

जेट्टीबाबत निर्णय न झाल्यास आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 01:33 IST

प्रकाश सरपाटील यांचा इशारा : मेरिटाइम बोर्डाने सकारात्मक विचार करण्याची मागणी

आगरदांडा : मुंबई येथील मासळीचे मुख्य मार्के ट बंद असल्याने राजपुरी, दिघी, मुरुड, एकदरा येथील मच्छीमारांना मासळी विकता येत नसल्यामुळे पकडलेली मासळी फुकट जात आहे. आगरदांडा येथील जेट्टी मुंबईपासून जवळ असल्याने व मोठ्या बोटींना सोईस्कर असा धक्का असल्याने मुंबईचा बाजार सुरू होईपर्यंत किमान दोन महिन्यांसाठी आगरदांडा येथे मच्छीमारांना जेट्टी उपलब्ध करून द्यावी, यासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने सकारात्मक विचार करून जेट्टी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी. आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास मोठे आंदोलन होईल, असा इशारा मुरुड तालुका नाखवा संघाचे प्रमुख समन्वयक प्रकाश सरपाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

मुरुड शहरातील जय मल्हार महादेव कोळी समाजगृहामध्ये पत्रकास परिषद घेण्यात आली होती. यावेळी सर्व पत्रकारांसमोर आपली भूमिका मांडताना प्रकाश सरपाटील बोलत होते. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडे सहापेक्षा जास्त जेट्ट्या आहेत. आगरदांडा येथे तीन जेट्ट्या असून, त्यातील कोणतीही एक जेट्टी मच्छीमारांना दिल्यास आमचे काम सुकर होणार आहे. मुंबईचे व्यापारी आगरदांडा येथे येण्यास तयार आहेत, परंतु बोटी बंदराला लावून न दिल्यामुळे आमचा माल फुकट जात आहे. व्यापारी आले, तर रोख स्वरूपात व्यवहार झाल्याने क्रयशक्ती वाढणार आहे. स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल, आमच्या या आंदोलनास तालुक्यातील असंख्य मच्छीमार सोसायट्यांचा पाठिंबा असून, ज्यावेळी आम्ही आंदोलन करू, त्यावेळी त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. आगरदांडा इंदापूर या चौपदरी रस्त्यामुळे मुंबई अंतर जवळ झाले असून, मासळीचे घाऊक खरेदीदार येथे येण्यास उत्सुक आहेत. यावेळी जय भवानी मच्छीमार सोसायटीचे चेरमन महेंद्र गार्डी, माहेश्वरी मच्छीमार सोसायटीचे चेरमन धुव्र लोदी, दामोदर बैले आदी मान्यवर उपस्थित होते.आगरदांडा येथील तीनपैकी एक जेट्टी द्यावी

आगरदांडा जेट्टी प्रशासनाने आम्हाला लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी. मच्छीमार बांधव शांत बसणार नाही. प्रवासी जेट्टीमुळे आम्हाला जेट्टी देता येत नाही, असे मेरिटाइम बोर्डाचे म्हणणे असेल, तरी आगरदांडा येथील तीनपैकी कोणतीही एका जेट्टीची मागणी करीत आहोत. तीन जेट्टींपैकी दोन जेट्टींचा वापर होत आहे. एक जेट्टी मच्छीमारांना देण्यास काय हरकत आहे. आम्ही या संदर्भात मत्स्य विभागाचे कॅबिनेट व राज्यमंत्री यांच्याशीही संपर्क साधत आहोत, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही मंत्री क्वारंटाइन असल्याने संपर्क झाला नाही, असे सरपाटील म्हणाले.२५ कोटींच्या उलाढालीचा दावा : एकदरा, राजपुरी, दिघी व मुरुड परिसरातील सुमारे दोनशे होड्या मोठ्या स्वरूपात मासळी घेऊन आल्याने महिन्याला सुमारे २५ कोटी रुपयांची उलाढाल होणार असल्याचा दावा यावेळी सरपाटील यांनी केला आहे. याचा फायदा स्थानिक मच्छीमारांनाच होणार असल्याचे स्पष्ट के ले.

टॅग्स :RaigadरायगडFishermanमच्छीमार