शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
4
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
5
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
7
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
8
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
9
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
10
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
11
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
12
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
13
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
14
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
15
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
16
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
17
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
18
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
19
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
20
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स

भूसंपादनाचा मोबदला मिळण्यासाठी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 00:49 IST

रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांनी आपल्या पिकत्या जमिनी विकासासाठी दिल्या आहेत;

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांनी आपल्या पिकत्या जमिनी विकासासाठी दिल्या आहेत; परंतु अद्यापही शेतकºयांना पुनर्वसनासाठी झगडावे लागत आहे. गेल्या आठ वर्षांपासून मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या प्रकल्पामध्येही हजारो शेतकºयांच्या जमिनी गेल्या आहेत. पळस्पे ते इंदापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणातील अतिरिक्त भूसंपादनाचा मोबदला शेतकºयांना मिळावा. या महत्त्वपूर्ण मागणीसाठी बळीराजा शेतकरी संघाचे पेण तालुका अध्यक्ष जनार्दन नाईक यांनी उपोषण सुरू केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. अद्यापही सकारात्मक तोडगा काढण्यात प्रशासनाला यश आलेले नाही.निवडक प्रकल्पबाधितांनाच अतिरिक्त मोबदला दिला जात आहे. उर्वरित शेतकºयांना त्याचा फायदा मिळत नाही, त्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयामार्फत सरसकट सर्व प्रकल्पग्रस्त शेतकºयांच्या जमिनीची मोजणी लावून त्यांना संपादित क्षेत्राचा मोबदला देणे आवश्यक असल्याचे जनार्दन नाईक यांनी सांगितले.लोकांना भूसंपादनाचा तसेच पुनर्वसनाचा फायदा मिळावा. गडब, आमटेम, कोलटी या गावांतील शेतकºयांनाही न्याय मिळालाच पाहिजे, अशी मागणी नाईक यांनी केली आहे.>निवडक प्रकल्पग्रस्तांना मोबदला२००९ पासून पळस्पे ते इंदापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या प्रकल्पामध्ये मोठ्या संख्येने शेतकºयांच्या जमिनी, घराचे संपादन केले आहे; परंतु या प्रकल्पबाधित शेतकºयांना योग्य मोबदला दिला गेलेला नाही. अतिरिक्त संपादनात मोडणारी पनवेल ते इंदापूरपर्यंतची बहुतेक गावे येत नाहीत. त्यामधील काही निवडक प्रकल्पबाधितांनाच अतिरिक्त मोबदला दिला जात आहे.