शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 01:55 IST

मंत्रालयावर एकजुटीने धडक दिली की, सरकार सर्व प्रश्न चुटकीसरशी सोडवण्यास तत्पर असते असाच समज सबंध महाराष्ट्रातील जनतेने करून घेतला आहे.

अलिबाग : मंत्रालयावर एकजुटीने धडक दिली की, सरकार सर्व प्रश्न चुटकीसरशी सोडवण्यास तत्पर असते असाच समज सबंध महाराष्ट्रातील जनतेने करून घेतला आहे. त्यामुळेच महाराष्ट्राच्या विविध भागांतील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शेतकरी, कष्टकरी, कामगार, दबलेले, पिचलेले असे सर्वच घटक मंत्रालयावर धडक देताना दिसून येतात. राज्यातील शेतकºयांचे विविध प्रश्न तडीस लावण्यासाठी आता राज्यस्तरावरील बळीराजा शेतकरी संघ मैदानात उतरला आहे. अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी अन्नत्याग आंदोलन केले. मागण्या मान्य न झाल्यास ३० एप्रिल रोजी लाखोंच्या संख्येने मंत्रालयावर धडक देऊन जेल भरो आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.जेलभरो आंदोलन छेडण्यासाठी राज्यातील सुमारे ३५ लाख शेतकºयांची मोट बांधली जात असल्याची माहिती बळीराजा शेतकरी संघ महाराष्ट्र राज्य रायगड जिल्हाध्यक्ष संजय पाशिलकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकºयांच्या होत असलेल्या आत्महत्येबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी, तसेच आत्महत्या केलेल्या शेतकºयांना अभिवादन करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील शेकडोच्या संख्येने शेतकरी अन्नत्याग आंदोलनात सामील झाले होते. विविध मागण्यांचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाºयांना दिले. अन्नत्याग आंदोलन राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छेडण्यात आल्याची माहिती बळीराजा शेतकरी संघ महाराष्ट्र राज्य रायगड जिल्हाध्यक्ष संजय पाशिलकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.महाराष्ट्र राज्यामध्ये अन्नाचा पोशिंदा असलेला शेतकरी संकटात सापडला आहे. इतर राज्याच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रातील शेतकºयांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. असे असताना सरकारने केवळ पोकळ आश्वासने देऊन शेतकºयांची चेष्टा केली आहे. बळीराजा पेटून उठला तर, सरकारला फार कठीण पडेल असा इशारा संघटनेने दिला आहे. राज्यामध्ये शेतकºयांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यास सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळेच धर्मापाटील यांच्यासारख्या शेतकºयाला मंत्रालयात येऊन आत्महत्या करावी लागणे हे सरकारसाठी लाजिरवाणे आहे.ज्या-ज्या शेतकºयांनी न्यायासाठी सरकारकडे हात पसरले, परंतु त्यांच्या हातात काहीच पडले नाही त्यांना आत्महत्या करावी लागली आहे. त्यांना अभिवादन करणे हा अन्नत्याग आंदोलनाचा भाग आहे. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बळीराजा शेतकरी संघाने अन्नत्याग आंदोलन छेडले असल्याचे पाशिलकर यांनी स्पष्ट केले.जगाची भूक भागविणाºया शेतकºयांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जिल्हा प्रशासनातील महत्त्वाचा एकही अधिकारी दुपारपर्यंत आंदोलनाच्या ठिकाणी फिरकला नसल्याचे आंदोलक शेतकºयांनी सांगितले. सरकारने आतापर्यंत शेतकºयांना केवळ आश्वासनेच दिली आहेत. त्यांच्या प्रश्नाकडे सरकारने गांभीर्याने पाहिलेले नाही. त्यामुळे सरकार आणखी किती धर्मा पाटील यांचे बळी घेणार असा संतप्त सवाल पाशिलकर यांनी उपस्थित केला. मंत्रालय हे देवालय नाही तर, आत्महत्येचे केंद्र बनत चालले आहे. त्यामुळेच आता शेतकºयांचा अंत पाहू नका.शेतकºयांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी आर्त हाक संघटनेने सरकारला जिल्हा प्रशासनामार्फत दिली आहे.शेतकरी संघटनेच्या प्रमुख मागण्याशेतकºयांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी ठोस निर्णय, शेतीमालाला योग्य हमीभाव, शेतीकर्ज अद्यापपर्यंत माफ केलेले नाही सर्वप्रथम ते माफ करावे, कृषी पंपासाठी लागणारी वीज मोफत असावी अशा विविध प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.

टॅग्स :RaigadरायगडFarmerशेतकरी