शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मुलांना विष पाजून आईची आत्महत्या

By admin | Updated: February 3, 2017 02:30 IST

पतीच्या व सासरच्या जाचाला कंटाळून लहानग्या दोन मुलांना विष पाजून एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना अलिबाग तालुक्यातील

अलिबाग : पतीच्या व सासरच्या जाचाला कंटाळून लहानग्या दोन मुलांना विष पाजून एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना अलिबाग तालुक्यातील थेरोंडा येथे घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कीर्ती केदार गंद्रे (३०) असे मृत महिलेचे नाव आहे. तिच्या दोन्ही मुलांना प्रथम अलिबागच्या सरकारी रु ग्णालयात दाखल करण्यात आहे होते. त्यांना अधिक उपचारासाठी एमजीएम रु ग्णालयात हलविले आहे. कीर्तीचे माहेर हे खोपोली होते. लग्नानंतर ती थेरोंडा येथे आपल्या पती केदार गंद्रे आणि मुलगी आरोही (दीड वर्ष), मुलगा यश (४ वर्षे) यांच्याबरोबर राहत होती. लग्नाच्या काही वर्षानंतर कीर्ती व केदार यांच्यात भांडणे होत होती. त्यानंतर कीर्ती हिने पती केदार यांच्याविरोधात खोपोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार केदारच्या विरोधात पोलिसांनी विवाहितेचा छळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर कीर्ती व केदार यांच्यामध्ये समेट घडवून आणून पुन्हा या दोघांचा संसार सुरु झाला. मात्र संसार सुरु झाला तरी केदार व त्याच्या सासरच्या माणसांनी पुन्हा पैशासाठी कीर्ती हिला त्रास देण्यास सुरु वात केली. त्यामुळे कीर्ती रोजच्या जाचाला कंटाळली होती. शेवटी तिने आपले जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कीर्ती गंद्रे हिने आपला भावाला फोनवर मी व माझ्या मुलांचे जीवन संपवित असल्याचा मेसेज टाकला. त्यानंतर कीर्ती हिने आपल्या लहानग्या दोन्ही मुलांना विष पाजले व स्वत: विष पिऊन गळफास लावून आत्महत्या केली. (प्रतिनिधी)मुलांची प्रकृ ती स्थिरकीर्ती केदार गंद्रे (३०) हिने आपल्या लहानग्या दोन्ही मुलांना विष पाजले व स्वत: विष पिऊन गळफास लावून आत्महत्या केली. लहानग्या दोन्ही मुलांना जिल्हा रु ग्णालयात हलविण्यात आले. त्यांची प्रकृ ती स्थिरअसल्याचे रु ग्णालयातील सूत्रांनी सांगितले. लग्नाच्या काही वर्षानंतर कीर्ती व केदार यांच्यात भांडणे होत होती. कीर्ती हिने पती केदार यांच्याविरोधात खोपोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.