शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

मुलांना विष पाजून आईची आत्महत्या

By admin | Updated: February 3, 2017 02:30 IST

पतीच्या व सासरच्या जाचाला कंटाळून लहानग्या दोन मुलांना विष पाजून एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना अलिबाग तालुक्यातील

अलिबाग : पतीच्या व सासरच्या जाचाला कंटाळून लहानग्या दोन मुलांना विष पाजून एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना अलिबाग तालुक्यातील थेरोंडा येथे घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कीर्ती केदार गंद्रे (३०) असे मृत महिलेचे नाव आहे. तिच्या दोन्ही मुलांना प्रथम अलिबागच्या सरकारी रु ग्णालयात दाखल करण्यात आहे होते. त्यांना अधिक उपचारासाठी एमजीएम रु ग्णालयात हलविले आहे. कीर्तीचे माहेर हे खोपोली होते. लग्नानंतर ती थेरोंडा येथे आपल्या पती केदार गंद्रे आणि मुलगी आरोही (दीड वर्ष), मुलगा यश (४ वर्षे) यांच्याबरोबर राहत होती. लग्नाच्या काही वर्षानंतर कीर्ती व केदार यांच्यात भांडणे होत होती. त्यानंतर कीर्ती हिने पती केदार यांच्याविरोधात खोपोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार केदारच्या विरोधात पोलिसांनी विवाहितेचा छळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर कीर्ती व केदार यांच्यामध्ये समेट घडवून आणून पुन्हा या दोघांचा संसार सुरु झाला. मात्र संसार सुरु झाला तरी केदार व त्याच्या सासरच्या माणसांनी पुन्हा पैशासाठी कीर्ती हिला त्रास देण्यास सुरु वात केली. त्यामुळे कीर्ती रोजच्या जाचाला कंटाळली होती. शेवटी तिने आपले जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कीर्ती गंद्रे हिने आपला भावाला फोनवर मी व माझ्या मुलांचे जीवन संपवित असल्याचा मेसेज टाकला. त्यानंतर कीर्ती हिने आपल्या लहानग्या दोन्ही मुलांना विष पाजले व स्वत: विष पिऊन गळफास लावून आत्महत्या केली. (प्रतिनिधी)मुलांची प्रकृ ती स्थिरकीर्ती केदार गंद्रे (३०) हिने आपल्या लहानग्या दोन्ही मुलांना विष पाजले व स्वत: विष पिऊन गळफास लावून आत्महत्या केली. लहानग्या दोन्ही मुलांना जिल्हा रु ग्णालयात हलविण्यात आले. त्यांची प्रकृ ती स्थिरअसल्याचे रु ग्णालयातील सूत्रांनी सांगितले. लग्नाच्या काही वर्षानंतर कीर्ती व केदार यांच्यात भांडणे होत होती. कीर्ती हिने पती केदार यांच्याविरोधात खोपोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.