शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यात डासांचा जाच वाढला; हत्तीरोगाचे २२९ रुग्ण आढळले

By निखिल म्हात्रे | Updated: June 28, 2024 14:56 IST

पायावर सूज येणे, ताप येणे, पाय लालबुंद होणे, पायाच्या दोन बोटांमध्ये चिखल्या आजाराप्रमाणे जखमा होणे अशी टप्प्याने रुग्णांत लक्षणे दिसून येतात. पायाच्या सुजेवरून तीव्रता तपासून दिव्यांग प्रमाणपत्र वितरित करण्याचे आदेश राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या संचालकांनी दिले आहेत.

अलिबाग : हत्तीरोगाचे रायगड जिल्ह्यात २२९ रुग्ण आहेत. हा आजार समूळ नष्ट करण्यासाठी अनेक मोहिमा राबवून तो जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. अलिबाग आणि पनवेल तालुक्यात त्याचे सर्वाधिक रुग्ण आहेत. ‘क्युलेक्स’ प्रजातीच्या डासांपासून हत्तीरोग हा आजार होतो. सामाजिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आजार आहे. यामध्ये रुग्णांच्या पायावर सूज येऊन हालचालींवर एका प्रकारचे निर्बंध येतात. इतरांच्या मदतीशिवाय हे रुग्ण हालचाल करू शकत नाही.

पायावर सूज येणे, ताप येणे, पाय लालबुंद होणे, पायाच्या दोन बोटांमध्ये चिखल्या आजाराप्रमाणे जखमा होणे अशी टप्प्याने रुग्णांत लक्षणे दिसून येतात. पायाच्या सुजेवरून तीव्रता तपासून दिव्यांग प्रमाणपत्र वितरित करण्याचे आदेश राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या संचालकांनी दिले आहेत. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या हत्तीरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात २२९ रुग्ण आहेत. ४० टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व आलेल्या या आजाराच्या रुग्णांना दिव्यांग प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यासाठी रुग्णांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने गावातील कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. सीएससी सेंटरवर ऑनलाइन अर्ज करण्यासाठी रुग्णास आधार कार्ड, रेशन कार्ड, दोन पासपोर्ट फोटो या कागदपत्रांसह रक्त गट, मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे. शिबिरास येताना ऑनलाइन केलेल्या अर्जाची प्रत सोबत आणणे गरजेचे आहे.रायगडमधील हत्तीरोग रुग्णांची संख्या

अलिबाग- ५६, उरण- ३१, पनवेल- ४७, कर्जत- ७, खालापूर- ९, सुधागड- ५, पेण- २८, मुरूड- १२, रोहा- ११, माणगाव- १२, तळा- १, म्हसळा- १, श्रीवर्धन- १, महाड- ४, पोलादपूर- ४, एकूण- २२९हत्तीरोगाची लक्षणे

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, हत्तीरोगाच्या लक्षणाच्या चार अवस्था असतात. जंतू शरीरात शिरकाव केल्यानंतर आजाराची लक्षणे दिसून येऊ शकतात.

लक्षणविरहित किंवा वाहक अवस्थेमध्ये रुग्णाच्या रात्री घेतलेल्या रक्ताच्या नमुन्यात मायक्रो फायलेरिया आढळून येतात. मात्र, रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. तीव्र लक्षण अवस्थेत ताप येतो, लसिकाग्रंथींचा दाह सुरू होतो.वरिष्ठांच्या सूचनांप्रमाणे हत्तीरोगाच्या रुग्णांची जिल्हा रुग्णालयात तपासणी करून ज्याचे अपंगत्व ४० टक्के पेक्षा जास्त आहे, त्यांना दिव्यांगांचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच हत्तीरोग जिल्ह्यातून हद्दपार व्हावा, यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.-राजाराम भोसले, जिल्हा हिवताप अधिकारी, रायगड