शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यात ५० हजारांपेक्षा अधिक असंघटित घरेलू कामगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 03:22 IST

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासनाने २२ सप्टेंबर हा दिवस श्रमप्रतिष्ठा दिन म्हणून घोषित केला आहे.

- जयंत धुळपअलिबाग - कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासनाने २२ सप्टेंबर हा दिवस श्रमप्रतिष्ठा दिन म्हणून घोषित केला आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी त्या काळात ‘कमवा आणि शिका’ अशी योजना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता अमलात आणली. ‘कमवा’ या संज्ञेतून शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना श्रमाचे अनन्य साधारण महत्त्व पटून दिले. त्याच वेळी ‘शिका’ या संज्ञेतून बौद्धिक विकासाचे सूत्र दिले. बौद्धिक विकास आणि श्रमाची साथ या सूत्रातून स्वत:च्या पायावर उभे राहून स्वत:चा आणि कुटुंबाचा विकास, असे सूत्र त्यामागे होते.विज्ञानाच्या माध्यमातून विकासाची कास धरण्यात आली असली, तरी समाजातील कष्टकरी आणि श्रमजीवींची संख्याही प्रचंड मोठी आहे. त्यांच्या श्रमाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन आजही नकारात्मक असून कष्टकरी आणि श्रमजीवीकरिता सक्रिय कार्यरत अशासकीय स्वयंसेवी संस्था आणि संघटनांचा आहे.श्रमजीवी कामगारांची समस्या अत्यंत गंभीर असून, मुळात हा वर्ग असंघटित आहे. घरेलू कामगार या सदरात मोडणाऱ्या ‘मोलकरीण’ या घटकाची समस्या गंभीर असल्याची माहिती या मोलकरीण या असंघटित श्रमजीवींच्या समस्या निराकरणाकरिता वाघाई घरकाम संघटनेच्या माध्यमातून कार्यरत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील यांनी दिली आहे.पेण तालुक्यात दोन हजार ३०० मोलकरणी वाघाई घरकाम संघटनेच्या सदस्य आहेत. रायगड जिल्ह्यात मोलकरणींची संख्या ५० हजारांच्या वर आहे. त्याच्या श्रमाचे मोल ठरवताना वा त्यांच्या समस्यांकडे अनेकजण सकारात्मक नसल्याचे दिसून आले.राज्यात १.५ दशलक्ष घरेलू कामगारघरेलू कामगार यांचे काम अंशकालीन स्वरूपाचे असून, ते एकापेक्षा जास्त मालकाकडे काम करतात. त्यांच्या कामाचे तास हे ठरावीक नसतात. त्यांच्याकडून जास्त काम करून घेतले जाते, असे सरकारी सर्वेक्षणातून निष्पन्न झाले आहे. शहरांत ज्याप्रमाणे नोकरदार महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्याचप्रमाणे घरेलू कामगार महिलांची संख्याही वाढत आहे. कामगार विभागाच्या सर्व्हेनुसार सुमारे १.५ दशलाखांपेक्षा जास्त घरेलू कामगार, तर चार ते पाच दशलाख मालक राज्यात आहेत.एकल महिलांचे प्रमाण सर्वाधिकमोलकरीण या घटकामध्ये येणाºया महिला या मुळात भूमिहीन वा अल्पभूधारक कुटुंबातील, विधवा, परित्यक्त्या आणि सर्वाधिक या ‘एकल महिला’ असल्याने त्यांचे प्रश्न सर्वसाधारणपणे कुणाच्या लक्षात न येण्यासारखे आहेत. मुळात त्या प्रश्न मांडू शकत नाहीत, त्यामुळे त्यांच्या समस्या सोडवण्याचे मार्गच खुले होत नसल्याचे पाटील सांगतात.सकारात्मक दृष्टिकोन हवामहाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम-२००८ या कायद्याची अंमलबजावणी ज्या प्रभावीपणे होणे अपेक्षित आहे, त्या प्रकारे होत नसल्याने शासनाकडे या कायद्यांतर्गत नोंदणीकृत घरेलू कामगारांची संख्या अत्यल्प आहे. या कायद्यांतर्गत ‘आॅनलाइन’ नोंदणी करणे अनिवार्य आहे, ते घरेलू कामागारांकरिता केवळ अशक्य आहे. कारण तो मुळात असंघटित कामगार आहेत. शासकीय यंत्रणेनेच याकरिता विशेष नियोजन करणे आवश्यक आहे. शासनाकडून मिळू शकणारे आर्थिक लाभ वा अन्य सुविधा मोलकरणीला मिळण्याकरिता घरमालकांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून सहकार्य करणे गरजेचे असल्याचे पाटील यांनी अखेरीस सांगितले.

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या