शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
3
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
4
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
5
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
6
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
7
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
8
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
9
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
10
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
11
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
12
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
13
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
14
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
15
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
16
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
17
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
18
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
19
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
20
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला

रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम, १६ खलाशी सुखरूप; बेपत्ता दोन बोटी मुरूड समुद्रात सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 5:06 AM

गेल्या ४८ तासांत जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. जिल्ह्यात २७ घरे-गोठे कोसळले आहेत, तर उरणमध्ये विजेची तार पडल्याने एका तरु णाचा मृत्यू झाला.

अलिबाग : गेल्या ४८ तासांत जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. जिल्ह्यात २७ घरे-गोठे कोसळले आहेत, तर उरणमध्ये विजेची तार पडल्याने एका तरु णाचा मृत्यू झाला. त्याचे नाव समजू शकले नाही. मंगळवारी रात्रभर पावसाने रायगड जिल्ह्यास झोडपून काढले आहे. माथेरानमध्ये सर्वाधिक ३६२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मच्छीमारीकरिता अरबी समुद्रात बेपत्ता झालेल्या चार मच्छीमारी बोटींपैकी दोन बोटींशी संपर्क झाला असून, या दोन्ही बोटी आणि १६ खलाशी सुखरूप आहेत. मात्र इतर दोन बोटींचा पत्ता लागला नाही.अरबी समुद्रात गेलेल्या आणि बेपत्ता झालेल्या चार मच्छीमारी बोटींपैकी करंजा मच्छीमार सोसायटीचे सदस्य हरिश्चंद्र नाखवा यांची ‘मानसशिवालय’ व कृष्णा महादेव कोळी यांची ‘हेरंभशिवलिंग’ या दोन बोटींशी वायरलेस यंत्रणेद्वारे संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास संपर्क झाला असून, या दोन्ही बोटी मुरूड-जंजिरा समुद्रातील बॉम्बे हाय प्लॅटफॉर्मजवळ सुरक्षित आहेत. यातील एकूण १६ खलाशीदेखील सुखरूप असल्याची माहिती करंजा मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष शिवदास नाखवा यांनी दिली.अलिबाग तालुक्यातील रेवस मच्छीमार सोसायटीचे सदस्य किशोर श्याम कोळी यांची ‘पौर्णिमाप्रसाद’ आणि कमलाकर कोळी यांची ‘गंगासागर’ या दोन बोटींचा पत्ता लागलेला नाही. यावर अनुक्रमे १८ व ८ असे एकूण २६ खलाशी असल्याचे नाखवा यांनी सांगितले. उद्या गुरुवारी तटरक्षक दलाच्या माध्यमातून या दोन बोटीसाठी शोध सुरू राहणार आहे.>नद्यांच्या जलपातळीत वाढसंततधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या जलपातळीत वाढ झाली आहे, परंतु कोणत्याही नदीची जलपातळी धोकादायक नसल्याचे जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी सागर पाठक यांनी सांगितले. बुधवारी दुपारी १ वाजता ६.५० मीटर धोकादायक जलपातळी असणाºया सावित्री नदीची प्रत्यक्ष जलपातळी ४.८० मीटर होती. धोकादायक जलपातळी २३.९५ मीटर असलेल्या कुंडलिका नदीची प्रत्यक्ष जलपातळी २२.९० मीटर होती तर धोकादायक जलपातळी ९ मीटर असणाºया अंबा नदीची प्रत्यक्ष जलपातळी ६.६० मीटर होती, अशी माहिती पाठक यांनी दिली.