शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

आधुनिक साधनांमुळे वनसंपदा वाचली; वणवे रोखण्यासाठी वन विभागाने केली उपाय योजना

By निखिल म्हात्रे | Updated: March 4, 2024 16:01 IST

अलिबाग वनविभागाचे कार्यक्षेत्रात वणवे लागण्याच्या घटना अद्यापही घडत असल्या तरी त्याचे प्रमाण आता कमी झाले आहे

अलिबाग - रायगड जिल्ह्यात वणव्यांमुळे लाखो झाडे भस्मसात होतात. अलिबाग वनपट्ट्यांत याचे प्रमाण जास्तच आहे. वणवे विझविण्यासाठी वनविभागाने आधुनिक साधनांचा केलेल्या वापरामुळे अलिबाग कार्यक्षेत्रात येणार्‍या पेण, पनवेल, उरण, खालापूर, सुधागड व रोहा तालुक्यांमध्ये सकारात्मक परिणाम जाणवू लागले आहेत.

या तालुक्यांमध्ये वनक्षेत्रफळ अधिक असून त्यावरील अतिक्रमणाचे प्रमाणही मोठे आहे. मात्र जनजागृती, तसेच ऑनलाईन मॉनिटरिंगमुळे वणवे लागण्याच्या घटनांमध्ये 35 टक्के घट झाल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. वणव्यामुळे वनसंपदेचा र्‍हास होतो तसेच, वन्यजीवांचा आश्रयही नष्ट होतो. नैसर्गिक वणवे लागण्याची प्रक्रिया ही जैविक समतोलाचा एक भाग समजली जाते, मात्र अतिक्रमणासाठी तर काही वेळा समाजकंटकांकडून जाणूनबुजून जंगलात आगी लावल्या जातात. काहीजण शिकारीसाठी आगी लावतात, शेतीच्या कामात आग नियंत्रणात राहिली नाही तरीही, वणवा पसरतो. यावर वेळीच नियंत्रण मिळवण्यासाठी वनविभागाने नियोजनबद्ध प्रयत्न सुरू केले आहेत.

अलिबाग वनविभागाचे कार्यक्षेत्रात वणवे लागण्याच्या घटना अद्यापही घडत असल्या तरी त्याचे प्रमाण आता कमी झाले आहे. वनक्षेत्रालगतच्या नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. पर्यावरणाच्या संवर्धनाबाबत, वनौषधीची लागवड, बांबू लागवडीबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. वनक्षेत्रावर सतत होत असलेले ऑनलाईन मॉनिटरिंगमुळे वणवे लागण्याचे प्रमाण कमी झाले आहे. दोन वर्षांत 574 वणवे लागले आहेत, तर एप्रिल ते डिसेंबर 2023 या कालावधीत अलिबाग वनक्षेत्रात 45 वणव्यांची नोंद झाली आहे.

प्रत्येक वनरक्षकास 500 हेक्टर क्षेत्र -अलिबाग वनक्षेत्रात अलिबाग, पेण, पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, सुधागड व रोहा (काही भाग) या तालुक्यांचा समावेश होतो. या विभागात 11 वनपरिक्षेत्र, 62 परिमंडळ व 227 नियतक्षेत्र आहेत. जिल्ह्यात 32 टक्के वनक्षेत्र असून अलिबाग वनविभागाचे निव्वळ क्षेत्र 1074.63 चौरस किलोमीटर इतके आहे. याठिकाणी अलिबाग व पनवेल असे दोन उपविभाग असून दोन गस्ती पथके आहेत. या विभागात एकूण 227 बीट वनरक्षक असून प्रत्येक बीट वनरक्षकावर सरासरी 500 हेक्टर वनक्षेत्र संरक्षणाची जबाबदारी आहे.

आग प्रतिबंधक जाळरेषा -वनक्षेत्राला लागणारी आग ही जमिनीच्या पातळीवर असते. त्याची मोठ्या झाडांना झळ बसली तरी ती नष्ट होत नाही. अलिबाग वनक्षेत्रात खडकाळ, मुरूम, तसेच, कातळाचा परिसर अधिक आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी गवत वाढते अशा ठिकाणी वणव्यास प्रतिबंध करण्याचे दृष्टिने दरवर्षी 15 मीटर, 10 मीटर व 3 मीटर अशा प्रकारच्या आग प्रतिबंधक जाळरेषा केल्या जातात. तसेच, रोपवनांभोवती ऑक्टोबरनंतर आग प्रतिबंधक जाळरेषा घेण्याबाबत सूचना करण्यात येतात. या विभागात फायर वॉच टॉवर्सही उभारण्यात आले आहेत.

वणव्यांवर तात्काळ नियंत्रण आणण्यासाठी वनविभागातर्फे सतत ऑनलाईन देखरेख केले जाते. वनविभागाच्या संकेत स्थळावर रिअल टाइम वनक्षेत्राचा अहवाल मिळतो. त्यात कुठे वणवा लागला आहे, त्याचे स्वरूप किती, हे संबंधित विभागाला समजते. त्याप्रमाणे संबंधित अधिकारी कर्मचार्‍यांना सूचना करून वणवा विझवण्याची तात्काळ कार्यवाही करतात.- राहुल पाटील, वनसंरक्षक, अलिबाग विभाग.