शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

आंग्रेकालीन सीमोल्लंघन परंपरेस रघुजी राजे आंग्रे यांनी दिला आधुनिक स्नेहाचा आयाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 21:01 IST

सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या काळातील सीमोल्लंघन आणि सोने लुटण्याची पंरपरा आंग्रे यांच्या नवव्या पिढीचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी येथील हिराकोट किल्ल्या शेजारील घेरिया या आपल्या निवासस्थानी आजही अबाधित राखली आहे.

- जयंत धुळपअलिबाग : सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या काळातील सीमोल्लंघन आणि सोने लुटण्याची पंरपरा आंग्रे यांच्या नवव्या पिढीचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी येथील हिराकोट किल्ल्या शेजारील घेरिया या आपल्या निवासस्थानी आजही अबाधित राखली आहे. दरवर्षी या कार्यक्रमाकरिता मराठा बांधव सहकुटुंब विजया दशमीच्या संध्याकाळी घेरियामध्ये एकत्र येतात. गुरुवारी विजया दशमीच्या दिवशी संध्याकाळी रघुजीराजे आंग्रे व मराठा बांधवांतील ज्येष्ठांच्या नेतृत्वाखाली मराठा बांधव सीमोल्लंघनास निघाले होते. हिराकोट किल्ल्या शेजारून हिराकोट तलावावरून तलावाशेजारील आंग्रेकालीन राज राजेश्वरी देवीच्या मंदिरात देवीस अभिवादन करून आशीर्वाद घेतले. सर्वांना सुखसमृद्धी लाभण्याकरिता देवीस रघुजीराजे आंग्रे यांनी सर्व मराठा बांधवांच्या वतीने गार्‍हाणे घालून आशीर्वाद मागितला. यावेळी आपटय़ाच्या पानांची विधिवत पूजा करून आई भवानीच्या आरतीनंतर मंदिरात सोने लुटण्यात आले.घेरियात सुवर्ण पुजनांती, सोने लुटून शुभेच्छाघेरियामध्ये परतल्यावर भगव्या ध्वजाच्या साक्षीने आपट्यांच्या पानांचे सोन लुटण्याकरिता सज्ज ठेवण्यात आले होते. त्याचेही रघुजीराजे आंग्रे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून, सर्वांनी सोने लुटण्याचा आनंद घेतला. लुटलेले सोने एकमेकाला देत आलिंगनासह सर्वांनी एकमेकाला शुभेच्छा दिल्या. मराठा भगिनींनी देखील एकमेकींना सोने देऊन अभिवादन केले.संघटित राहण्यासाठी सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांनी सुरू केली परंपरासरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या काळात परिसरातील सर्वानी संघटित राहावे त्याकरिता एकत्र यावे या हेतूने सीमोल्लंघन व सोने लुटण्याची परंपरा सुरू झाली. आजच्या व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटरच्या जमान्यात प्रत्यक्ष भेटून शुभेच्छांची देवाणघेवाण कमी होत चालली आहे. आधुनिकता स्वीकारताना आपल्या प्राचीन परंपरा आणि त्यानिमित्ताने संघटित होणे ही देखील काळाची गरज असल्याने, सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांची सीमोलंघनाची परंपरा अबाधित राखून त्यास आधुनिक स्नेहाचा आयाम देण्याचा प्रयत्न केला आहे. दिवसेंदिवस हा उपक्रम यशस्वी होते आहे, याचा आनंद वाटत असल्याची भावना या निमित्ताने रघुजीराजे आंग्रे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.