शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
4
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
6
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
7
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
8
हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
9
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
10
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
11
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
12
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
13
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
14
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
15
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
16
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
17
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
18
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
19
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
20
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘एमआयडीसी’चे सर्वेक्षण बेकायदा, पंडित पाटील यांची पत्रकार परिषद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 01:09 IST

टाटा पॉवर औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पाकरिता ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली, त्यांची जमीन परस्पर अन्य कंपनी वा औद्योगिक क्षेत्राकरिता देण्याचा घाट घालून एमआयडीसीने लोकप्रतिनिधी आणि शेतक-यांना अंधारात ठेवले.

अलिबाग : टाटा पॉवर औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पाकरिता ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली, त्यांची जमीन परस्पर अन्य कंपनी वा औद्योगिक क्षेत्राकरिता देण्याचा घाट घालून एमआयडीसीने लोकप्रतिनिधी आणि शेतक-यांना अंधारात ठेवले. आता ‘एमआयडीसी’चे सुरू केलेले सर्वेक्षण बेकायदा असल्याचे नमूद करून त्यास आपला आक्षेप असल्याचा दावा अलिबागचे आमदार पंडित पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे.रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात आयोजित या पत्रकार परिषदेत आ. पाटील पुढे म्हणाले की, अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड परिसरातील शेतकºयांच्या जमिनी गेल्या दहा वर्षांपूर्वी कवडीमोल किमतीने टाटा पॉवर औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पाकरिता महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ(एमआयडीसी)ने संपादित केल्या. मात्र, आता टाटा कंपनीने आपला येथील औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प रद्द केला आहे. ज्या कारणासाठी शेतजमिनी संपादित केल्या, त्या कारणात बदल झाला असल्यास, त्या संपादित जमिनी परस्पर अन्य कारणास्तव वापरणे हे बेकायदेशीर असून, असे आम्ही येथे घडू देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.महाराष्ट्र शासन आणि दि टाटा पॉवर कंपनी लिमिटेड यांच्यात १३ जुलै २०११ रोजी झालेल्या मदत व पुनर्वसन करारनाम्यानुसार, शहापूर-धेरंड गावांकरिता नागरी सुविधांचा दर्जा उंचावण्याकरिता प्रत्येकी दोन कोटी रुपयांची तरतूद, प्रकल्पबाधित कुटुंबातील एका व्यक्तीस प्रकल्पात शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी नोकरी, नोकरीस सक्षम होण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण कंपनी देणार, गावांतील प्रकल्पबाधित परित्यक्ता व निराधार व्यक्तींना दरमहा किमान५०० रुपये आजीवन निवृत्तीवेतन अशी एकूण १५ विविध आश्वासने शेतकºयांना देण्यात आली होती.मात्र, टाटा कंपनीने ती पूर्ण केली नाहीत. परिणामी, शेतजमीनही नाही आणि नोकरी-रोजगारही नाही अशीअवस्था जमीन दिलेल्या शेतकºयांची झाली असल्याचे शेतकरी संघर्ष समिती पेझारीचे सचिव अनिल पाटील यांनी सांगितले.या प्रकरणी आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या विचारात असल्याचेही आमदार पंडित पाटील यांनी यावेळी सांगितले.