शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

म्हसळा बायपास मृत्यूचा सापळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 04:20 IST

म्हसळा शहरातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेला बायपास हा दिघी पोर्टच्या अवजड वाहतुकीमुळे सध्या मृत्यूचा सापळा बनत चालला आहे.

म्हसळा - म्हसळा शहरातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेला बायपास हा दिघी पोर्टच्या अवजड वाहतुकीमुळे सध्या मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. दिघी पोर्टच्या वाहनांची या बायपासवर दुतर्फा पार्किंग केल्याने या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना अरुंद मार्गावरून जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत व यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.म्हसळा शहरात वाहतूककोंडीला पर्याय म्हणून काही वर्षांपूर्वी म्हसळा बायपास तयार करण्यात आला आहे. बायपास तयार केल्यानंतर काही वर्षातच दिघी पोर्टची अवजड वाहतूक या मार्गावरून सुरू झाली. सुरु वातीला ही अवजड वाहतूक कमी प्रमाणात होत होती, परंतु आज २५ ते २७ टन वजनाच्या पोलादी कॉइल, कोळसा यांची वाहतूक करणारे ट्रेलर, मोठाले डम्पर या मार्गावरून वाहतूक करू लागले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांचा व्याप वाढल्याने दिघी पोर्टजवळ ही वाहने उभी करण्यासाठी जागा कमी पडत असावी या कारणाने या अवजड वाहतूक करणाºया वाहन चालकांना म्हसळा येथे थांबण्याचा पर्याय निवडावा लागत आहे. त्यानुसार हे सर्व अवजड वाहतूक करणारे ट्रेलर, डम्पर म्हसळा बायपास जेथून सुरू होतो त्या एच.पी. पेट्रोल पंपापासून जवळजवळ ५०० मीटरपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा दिवस-रात्र पार्किंग करीत असतात व १0 - १२ तासानंतर आपला नंबर आला की दिघी पोर्टकडे किंवा ज्या कंपनीत माल पोहचवायचा आहे तिथे जातात.दिवस-रात्र ही वाहने म्हसळा बायपासच्या दुतर्फा पार्क केल्याने या बायपासचा वापर करणाºया श्रीवर्धन, बोर्ली, बागमांडला, दिघीकडील प्रवासी वाहनांसहित दिवेआगर, हरिहरेश्वर येथे जाणाºया पर्यटकांना आपला जीव मुठीत घेऊन या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे. आधीच दिघी ते माणगाव मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे, यामध्ये म्हसळा बायपासचादेखील समावेश आहे. त्यामुळे या मार्गावर गेल्या दोन-तीन दिवसांपासून पडलेल्या पावसाने चिखल झाल्याने बायपासवर गेल्या दोन दिवसांत ८ ते १० पर्यटकांच्या दुचाकी घसरून किरकोळ अपघात झाले आहेत. कित्येक चारचाकी वाहनांवरील वाहकाचा ताबा सुटताना अनेक नागरिकांनी पाहिले आहे त्यातच ही दुतर्फा लागलेली दिघी पोर्टची अवजड वाहने उभी असल्यामुळे या किरकोळ घटनांचे अनेक मोठ्या अपघातांमध्ये रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे त्वरित ही दिघी पोर्टची अवजड वाहने म्हसळा बायपासवरून हटवावी, अशी मागणी म्हसळा शहरातील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.म्हसळा बायपासवरून प्रवास करताना पावसामुळे झालेल्या या रस्त्यावरील चिखलाने अनेक दुचाकी, चारचाकी वाहने घसरून अपघात होता होता बचावले आहेत. त्यातच या दिघी पोर्टच्या दुतर्फा लागलेल्या ट्रेलरमुळे या मार्गावरून वाहन चालविणे धोकादायक बनले आहे. या दिघी पोर्टच्या वाहनांना या बायपासवरून त्वरित हटवावे.- सचिन करडे, अध्यक्ष गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान, म्हसळादिघी पोर्टच्या या दुतर्फा पार्किंग करणाºया वाहनचालकांना म्हसळा बायपासवरून वाहनांना हटविण्यास सांगण्यात येईल व वारंवार बायपासवर वाहने पार्किंग करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.- सुदर्शन गायकवाड,सहायक पोलीस निरीक्षक, म्हसळा

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या