शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पारा १८ अंशांवर; हुडहुडी भरलेले जिल्हावासीय शोधताहेत शेकोटीचा आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 13:17 IST

दिवसाही वातावरण थंड असल्याने उबदार कपड्यांसह शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे. जिल्ह्यात पडलेल्या थंडीमुळे रायगडकर सध्या गारव्याचा आस्वाद घेत आहेत.

अलिबाग : राज्यात तापमानाचा पारा घसरला असल्याने गेल्या चार दिवसांपासून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. रायगड जिल्ह्यातही तापमानाचा पारा हा १८ अंशांवर आल्याने रायगडकरांना हुडहुडी भरली आहे. दिवसाही वातावरण थंड असल्याने उबदार कपड्यांसह शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे. जिल्ह्यात पडलेल्या थंडीमुळे रायगडकर सध्या गारव्याचा आस्वाद घेत आहेत.

जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून वातावरणात गारवा वाढल्याने रायगडकर थंडीने कुडकुडत आहेत. हवेत गार वारा वाहत असल्याने जिल्ह्यातील वातावरण गारेगार झाले आहे. त्यामुळे दिवसरात्र रायगडकर हे उबदार कपडे घालून थंडीपासून बचाव करीत आहेत. रात्रीच्या सुमारास थंडीचा कडाका वाढत असल्याने ठिकठिकाणी शेकोटी पेटवून नागरिक ऊब घेताना दिसत आहेत. सायंकाळनंतर पारा घसरत आहे. जिल्ह्यात कमाल तापमान हे २८, तर पहाटेच्या सुमारास पारा १८ ते १९ अंशांवर उतरत आहे. त्यामुळे रायगडकरांसह जिल्ह्यात पर्यटनासाठी आलेले पर्यटक थंडीचा आस्वाद घेत आहेत.

चार दिवसांपासून जोर वाढलाडिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात थंडी पडण्यास सुरुवात झाली होती; मात्र दिवसभर वातावरण गरम असले, तरी सायंकाळनंतर थंडी पडण्यास सुरुवात होत होती. त्यामुळे थंडीचा काही प्रमाणात आस्वाद रायगडकर घेत होते. जानेवारीत या थंडीचा आस्वाद घेत असताना दुसऱ्या आठवड्यात थंडी गायब होऊन अवेळी पावसाचे आगमन झाले होते. त्यामुळे ऊन, पाऊस आणि काहीशी थंडी असे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे थंडी गायब होऊन उकाडा सुरू झाला होता; मात्र गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यातील पारा हा उतरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उबदार कपडे दिवसभर घालण्याची वेळ रायगडकरांवर आली आहे.

गारवा कायम राहणार    चार दिवसांपासून गार वारे वाहत आहेत. त्यामुळे दिवसभर वातावरणात थंडावा जाणवत आहे. सायंकाळनंतर तर पारा खाली घसरतो.     थंडी अधिक पडली असल्याने दिवसाही शेकोट्या पेटवून थंडी घालविण्याचा प्रयत्न केला जात आहे. रात्रीच्या सुमारास ग्रामीण भागात तर हुडहुडी भरत असल्याने शेकोट्या पेटलेल्या दिसतात.     त्यामुळे रायगडकर सध्या पडलेल्या थंडीचा चांगलाच आस्वाद घेत आहेत. वातावरणात गारवा हा काही दिवस राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

टॅग्स :Raigadरायगड