शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

सांबर कुंड धरणाबाबत उद्या मंत्रालयात बैठक! शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यास सरकार सकारात्मक

By राजेश भोस्तेकर | Updated: October 31, 2022 13:51 IST

शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत सकारात्मक भूमिका पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतली आहे.

अलिबाग : गेली अनेक वर्ष रखडलेल्या सांबर कुंड धरणाच्या कामाला गती देण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. वन विभागाच्या अखत्यारीत रखडलेल्या प्रस्ताव बाबत मंत्रालयात वन मंत्री याच्याकडे १ नोव्हेंबर रोजी बैठक घेतली जाणार आहे. बैठकीनंतर राज्य शासनाकडे आलेला प्रस्ताव तातडीने दिल्लीला घेऊन जाण्याच्या सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत. शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत सकारात्मक भूमिका पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतली आहे. त्यामुळे सांबर कुंड धरण उभारणी दृष्टिक्षेपात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

अलिबाग तालुक्यातील अनेक वर्ष रखडलेल्या सांबर कुंड धरणाबाबत पालकमंत्री उदय सामंत याच्याकडे पत्रकारांनी पाठपुरावा केला होता. त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयात राजस्व सभागृहात सांबर कुंड प्रश्नाबाबत अधिकाऱ्यांची आढावा बैठक पालकमंत्री उदय सामंत याच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सांबर कुंड धरण बाबत रखडलेल्या प्रश्नाबाबत सकारात्मक चर्चा करून हा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न शासनाचा राहील असे पालकमंत्री सामंत यांनी म्हटले आहे. आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील यासह अधिकारी वर्ग उपस्थित होते. 

अलिबाग तालुक्यातील रामराज महान भागात सांबर कुंड धरण प्रस्तावित आहे. गेली साठ वर्षापासून हे धरण प्रलंबित आहे. त्यामुळे धरण कधी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. धरणासाठी साडे चारशे एकर जमीन भुसंपदीत केली जाणार आहे. शेतकऱ्यांनीही धरण हवे आहे. मात्र वन विभागाची मंजुरी रखडल्याने आणि शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला हे अत्यल्प असल्याने धरण काम रखडले आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा सुरू आहे. मात्र काम पुढे सरकले नाही. 

उदय सामंत यांनी रायगडचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर सांबरकुंड धरण काम मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. वन विभागाच्या परवानगी साठी मंत्रालयात प्रस्ताव सादर केला असून केंद्राकडे पाठविला जाणार आहे. अशी माहिती कार्यकारी अभियता संजय जाधव यांनी पालकमंत्री यांना दिली. पालकमंत्री यांनी १ नोव्हेंबर रोजी वन मंत्री यांच्याकडे बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू आणि प्रस्ताव त्वरित दिल्लीला घेऊन जा अशा सूचना अधिकारी याना दिल्या आहेत. 

शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यास सकारात्मक विचारधरणात शेतकऱ्याच्या जमिनी जात आहेत. मात्र शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला हा अत्यल्प असल्याने तो घेतला गेला नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत सकारात्मक चर्चा या बैठकीत झाली आहे. याबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना पालकमंत्री यांनी केल्या आहेत.

...तर धरणाचा खर्च हजार कोटीवर जाईल२००१ साली सांबर कुंड धरणाचे काम ५० कोटी मध्ये होणार होते. मात्र काम रखडल्याने आता २०२२ साली या धरणाचा बांधकाम खर्च साडे सातशे कोटींवर पोहचला आहे. दोन वर्ष अजून काम रखडले तर एक हजार कोटींवर जाईल अशी चिंताही पालकमंत्री उदय सामंत यांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे सांबर कुंड धरणाचे काम हे लवकरात लवकर सुरू होणे आवश्यक असल्याचेही पालकमंत्री यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :alibaugअलिबागRaigadरायगडUday Samantउदय सामंत