शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

सांबर कुंड धरणाबाबत उद्या मंत्रालयात बैठक! शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यास सरकार सकारात्मक

By राजेश भोस्तेकर | Updated: October 31, 2022 13:51 IST

शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत सकारात्मक भूमिका पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतली आहे.

अलिबाग : गेली अनेक वर्ष रखडलेल्या सांबर कुंड धरणाच्या कामाला गती देण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. वन विभागाच्या अखत्यारीत रखडलेल्या प्रस्ताव बाबत मंत्रालयात वन मंत्री याच्याकडे १ नोव्हेंबर रोजी बैठक घेतली जाणार आहे. बैठकीनंतर राज्य शासनाकडे आलेला प्रस्ताव तातडीने दिल्लीला घेऊन जाण्याच्या सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत. शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत सकारात्मक भूमिका पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतली आहे. त्यामुळे सांबर कुंड धरण उभारणी दृष्टिक्षेपात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

अलिबाग तालुक्यातील अनेक वर्ष रखडलेल्या सांबर कुंड धरणाबाबत पालकमंत्री उदय सामंत याच्याकडे पत्रकारांनी पाठपुरावा केला होता. त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयात राजस्व सभागृहात सांबर कुंड प्रश्नाबाबत अधिकाऱ्यांची आढावा बैठक पालकमंत्री उदय सामंत याच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सांबर कुंड धरण बाबत रखडलेल्या प्रश्नाबाबत सकारात्मक चर्चा करून हा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न शासनाचा राहील असे पालकमंत्री सामंत यांनी म्हटले आहे. आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील यासह अधिकारी वर्ग उपस्थित होते. 

अलिबाग तालुक्यातील रामराज महान भागात सांबर कुंड धरण प्रस्तावित आहे. गेली साठ वर्षापासून हे धरण प्रलंबित आहे. त्यामुळे धरण कधी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. धरणासाठी साडे चारशे एकर जमीन भुसंपदीत केली जाणार आहे. शेतकऱ्यांनीही धरण हवे आहे. मात्र वन विभागाची मंजुरी रखडल्याने आणि शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला हे अत्यल्प असल्याने धरण काम रखडले आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा सुरू आहे. मात्र काम पुढे सरकले नाही. 

उदय सामंत यांनी रायगडचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर सांबरकुंड धरण काम मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. वन विभागाच्या परवानगी साठी मंत्रालयात प्रस्ताव सादर केला असून केंद्राकडे पाठविला जाणार आहे. अशी माहिती कार्यकारी अभियता संजय जाधव यांनी पालकमंत्री यांना दिली. पालकमंत्री यांनी १ नोव्हेंबर रोजी वन मंत्री यांच्याकडे बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू आणि प्रस्ताव त्वरित दिल्लीला घेऊन जा अशा सूचना अधिकारी याना दिल्या आहेत. 

शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यास सकारात्मक विचारधरणात शेतकऱ्याच्या जमिनी जात आहेत. मात्र शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला हा अत्यल्प असल्याने तो घेतला गेला नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत सकारात्मक चर्चा या बैठकीत झाली आहे. याबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना पालकमंत्री यांनी केल्या आहेत.

...तर धरणाचा खर्च हजार कोटीवर जाईल२००१ साली सांबर कुंड धरणाचे काम ५० कोटी मध्ये होणार होते. मात्र काम रखडल्याने आता २०२२ साली या धरणाचा बांधकाम खर्च साडे सातशे कोटींवर पोहचला आहे. दोन वर्ष अजून काम रखडले तर एक हजार कोटींवर जाईल अशी चिंताही पालकमंत्री उदय सामंत यांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे सांबर कुंड धरणाचे काम हे लवकरात लवकर सुरू होणे आवश्यक असल्याचेही पालकमंत्री यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :alibaugअलिबागRaigadरायगडUday Samantउदय सामंत