शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

नावीन्यपूर्ण योजनेतील विकासकामांना प्राधान्य, जिल्हा नियोजन समितीची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 02:54 IST

रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी २४७ कोटी ५६ लाख रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे.

अलिबाग : रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी २४७ कोटी ५६ लाख रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या तळागाळातील सर्वांगीण विकासाला गती येणार असल्याची माहिती रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी येथे दिली. आदिती तटकरे या पालकमंत्री झाल्यानंतरची त्यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पहिलीच बैठक पार पडली. त्याप्रसंगी त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.कोकण विभागात मंजूर निधी खर्च करण्यात रायगड जिल्हा आघाडीवर आहे. त्या दृष्टीने फेब्रुवारी महिन्याअखेर शंभर टक्के निधी खर्च होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असे निर्देशही सर्व यंत्रणेच्या प्रमुखांना त्यांनी दिले. २०२०-२१ या वर्षाकरीता २४७ कोटी ५६ लाख रुपयांबरोबरच ४५ कोटी रुपयांच्या वाढीव निधीसाठीही सरकारकडे मागणी करण्यात येणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते, नाले, पाणीपुरवठा असे विविध प्रश्न सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आला आहे. आता नावीन्यपूर्ण योजनेतून तब्बल एक हजार २०० स्मशानभूमींसाठी शेड बांधणे यांना प्राधान्य देण्यात येणार आहे, असे तटकरे यांनी सांगितेले.त्याचप्रमाणे, आंगणवाडीच्या दुरुस्तीसाठी पूर्वी एक लाख रुपयांचा निधी देण्यात येत होता. त्यामध्ये आता वाढ करण्यात येणार आहे.मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये मोठ्या प्रमाणात कचऱ्याची समस्या वाढत आहे. त्या कचºयाचे व्यवस्थापन करण्यासाठी अशा ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांसाठी निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचे सांगितले. नगरपंचायतींना सीसीटीव्ही बसविणे, तसेच सरकारी माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनींची गळती रोखण्यासाठी आठ ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सायकल देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे सहा हजार विद्यार्थिनींचा समावेश करण्याचा विचार असल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव उपस्थित होते.अर्थमंत्र्यांकडे निधीची मागणीजिल्हा सरकारी रुग्णालयातून मोठ्या संख्येने रुग्णांना अधिक उपचारासाठी मुंबईच्या सरकारी रुग्णालयात न्यावे लागते. रस्ते मार्गानी जाणे अतिशय खर्चिक, तसेच वेळेचाही अपव्यय होत असतो.रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी वेळ अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे मांडवा ते भाऊचा धक्का अशी समुद्रमार्गे बोट अ‍ॅम्ब्युलन्स सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे पाच कोटी रुपयांची मागणी राज्याचे अर्थ व नियोजनमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.बोट अ‍ॅम्ब्युलन्समध्ये असणा-या सुविधाया अ‍ॅम्ब्युलन्स बोटीमध्ये अत्याधुनिक सुविधांबरोबरच वैद्यकीय अधिकारी, मेडिकल रूम, मेडिकल स्टोर, आॅक्सिजन सिलिंडर, पिण्याचे पाणी, जनरल स्टोर, वॉश रूम, टॉयलेटची सुविधा राहणार आहे. त्याचप्रमाणे, ही बोट संपूर्ण वातानुकूलित असणार आहे.किमान सात व्यक्तींची सोय यामध्ये आहे. या बोटीवर जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाइसही बसविण्यात येणार आहेत, तसेच जनरेटची सुविधाही देण्यात येणार आहे. या बोट अ‍ॅम्ब्युलन्सला १०८ अ‍ॅम्ब्युलन्सची जोड देण्यात येणार असल्याने कनेक्टिव्हिटीचा प्रश्न सुटणार आहे.जिल्हा रु ग्णालयातून मुंबईत पाठविलेले रु ग्णसरकारी रु ग्णालयातून मुंबई येथे अधिक उपचारासाठी दिवसाला किमान चार अत्यवस्थ रु ग्ण पाठविले जातात. २०१२-१३ या कालावधीत १,१७६ रु ग्ण मुंबईतील रु ग्णालयात नेले होते.२०१३-१४ या कालावधीत १,२२४, २०१४-१५ मध्ये १,२६२, २०१५-१६ मध्ये १,४१७ आणि २०१६-१७ मध्ये १,२४३, २०१७-१८ मध्ये १,३५४ तर २०१८-१९ या कालावधीत १,२७८ असे एकूण आठ हजार ९५४ रु ग्णांचा समावेश होता.गेल्या काही वर्षामध्ये रुग्णांना अधिक उपचारासाठी मुंबईला नेण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसते. 

टॅग्स :RaigadरायगडNavi Mumbaiनवी मुंबई