शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

माथेरानची वनसंपदा संकटात; जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 23:06 IST

ग्याबियन वॉल करणे गरजेचे; विकासकामांसाठी अडचणी

माथेरान : माथेरानच्या पर्यावरणाचा समतोल आणि येथील पूर्वापार मूळ ओळख असणारी वनसंपदा कायमस्वरूपी अबाधित राहण्यासाठी पर्यावरणवाद्यांची नेहमीच आग्रही भूमिका राहिलेली आहे. त्यामुळे पुढील काळातही पर्यटकांना आकर्षित करणारे पॉइंट्स सुशोभित करण्यासाठी येथील वनसंपदेचा ºहास होऊ नये.

१५० ते २०० वर्षांपूर्वीच्या जुनाट वृक्षांची जोपासना करण्यासाठी त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. माथेरानमध्ये दरवर्षी २०० इंचच्या वर पाऊस पडतो. या वर्षी ३०० इंच पाऊस झाला, यामुळे मातीची धूप प्रचंड प्रमाणात झाली, यामुळे येथील वनसंपदा धोक्यात आली आहे. येथील पॉइंट्स तसेच इतर ठिकाणी होणारी जमिनीची धूप रोखण्यासाठी ग्याबियन वॉल करणे गरजेचे झाले आहे. ही वॉलची कामे येत्या तीन ते चार वर्षांत झाली नाही तर माथेरानला माळीण गावाची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही.

ग्याबियन वॉलसाठी लागणार काळा अथवा जांभा दगड घोड्यावर जात नाही, तसेच एका हातगाडीमध्ये १२ ते १४ दगडांचीच वाहतूक केली जाते, त्यामुळे ही पद्धत वेळ, श्रम खर्चिक तर आहेच; परंतु अशा पद्धतीने काम करण्यासाठी १५ ते २० वर्षांचा कालावधी लागू शकतो. या दरम्यान पर्यावरणाचा ºहास मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो.

हा संपूर्ण परिसर बिनशेतीचा भाग असून, प्रदूषणमुक्त पर्यटनस्थळ अशीच ओळख असलेल्या माथेरानमध्ये रुग्णवाहिका आणि अग्निशमन गाडीच्या व्यतिरिक्त अन्य वाहनांना परवानगी नाही. त्यामुळे येथील एकंदरच संपूर्ण पर्यटन हे येणाऱ्या पर्यटकांवर अवलंबून असते. येणारे पर्यटक हे विविध पॉइंट्सवरील नयनरम्य देखावे पाहण्यासाठी आवर्जून भेटी देत असतात.

पर्यटक आले तर येथील व्यापारी, दुकानदार, घोडा, हातरिक्षा, हॉटेल्स, लॉजधारक यांसह मोलमजुरी करणाºया श्रमिकांना रोजगार उपलब्ध होतो. तेव्हा येथील निसर्गसंपदा अबाधित राखणे गरजेचे आहे.

एमएमआयडीएकडून सुशोभीकरणाचे काम

सध्या एमएमआरडीएच्या माध्यमातून विविध पॉइंट्सच्या सुशोभीकरणाची कामे सुरू केली आहेत. त्यासाठी महत्त्वाच्या पॉइंट्सवर जुन्या झाडांचे संरक्षण करण्यासाठी आणि वनसंपदा हीच ओळख टिकवण्यासाठी पॉइंट्सवरील झाडांसभोवताली काळ्या दगडांची ग्याबियन वॉल बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काळा दगड लागणार आहे. त्यातच दस्तुरी नाक्यापासून जवळपास चार ते पाच किलोमीटरची वाहतूक मानवी हातगाडी मधून करणे अशक्यप्राय बाब आहे.

त्यासाठी येथील पर्यटनाच्या दृष्टीने विकासकामे होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मर्यादित वेळेसाठी ट्रॅक्टरला परवानगी दिली होती; परंतु काही मंडळींनी ठेकेदारास ट्रॅक्टरला परवानगी दिली आहे तर आम्हालाही जीवनावश्यक वस्तूंकरिता टेम्पो अथवा ट्रॅक्टर गावात आणण्यासाठी परवानगी देण्यात यावी, असा हट्ट धरला. मात्र, यामुळे अनेक विकासकामांमध्ये अडथळा येत आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक गावाचा विकास करण्यासाठी पर्यावरणवाद्यांनी, जिल्हाधिकाºयांनी आता यातून सुवर्णमध्य काढून आलेला निधी परत जाऊ नये यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी माथेरानकरांकडून होत आहे.

टॅग्स :MatheranमाथेरानRaigadरायगड