शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

माथेरानची वनसंपदा संकटात; जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 23:06 IST

ग्याबियन वॉल करणे गरजेचे; विकासकामांसाठी अडचणी

माथेरान : माथेरानच्या पर्यावरणाचा समतोल आणि येथील पूर्वापार मूळ ओळख असणारी वनसंपदा कायमस्वरूपी अबाधित राहण्यासाठी पर्यावरणवाद्यांची नेहमीच आग्रही भूमिका राहिलेली आहे. त्यामुळे पुढील काळातही पर्यटकांना आकर्षित करणारे पॉइंट्स सुशोभित करण्यासाठी येथील वनसंपदेचा ºहास होऊ नये.

१५० ते २०० वर्षांपूर्वीच्या जुनाट वृक्षांची जोपासना करण्यासाठी त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. माथेरानमध्ये दरवर्षी २०० इंचच्या वर पाऊस पडतो. या वर्षी ३०० इंच पाऊस झाला, यामुळे मातीची धूप प्रचंड प्रमाणात झाली, यामुळे येथील वनसंपदा धोक्यात आली आहे. येथील पॉइंट्स तसेच इतर ठिकाणी होणारी जमिनीची धूप रोखण्यासाठी ग्याबियन वॉल करणे गरजेचे झाले आहे. ही वॉलची कामे येत्या तीन ते चार वर्षांत झाली नाही तर माथेरानला माळीण गावाची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही.

ग्याबियन वॉलसाठी लागणार काळा अथवा जांभा दगड घोड्यावर जात नाही, तसेच एका हातगाडीमध्ये १२ ते १४ दगडांचीच वाहतूक केली जाते, त्यामुळे ही पद्धत वेळ, श्रम खर्चिक तर आहेच; परंतु अशा पद्धतीने काम करण्यासाठी १५ ते २० वर्षांचा कालावधी लागू शकतो. या दरम्यान पर्यावरणाचा ºहास मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो.

हा संपूर्ण परिसर बिनशेतीचा भाग असून, प्रदूषणमुक्त पर्यटनस्थळ अशीच ओळख असलेल्या माथेरानमध्ये रुग्णवाहिका आणि अग्निशमन गाडीच्या व्यतिरिक्त अन्य वाहनांना परवानगी नाही. त्यामुळे येथील एकंदरच संपूर्ण पर्यटन हे येणाऱ्या पर्यटकांवर अवलंबून असते. येणारे पर्यटक हे विविध पॉइंट्सवरील नयनरम्य देखावे पाहण्यासाठी आवर्जून भेटी देत असतात.

पर्यटक आले तर येथील व्यापारी, दुकानदार, घोडा, हातरिक्षा, हॉटेल्स, लॉजधारक यांसह मोलमजुरी करणाºया श्रमिकांना रोजगार उपलब्ध होतो. तेव्हा येथील निसर्गसंपदा अबाधित राखणे गरजेचे आहे.

एमएमआयडीएकडून सुशोभीकरणाचे काम

सध्या एमएमआरडीएच्या माध्यमातून विविध पॉइंट्सच्या सुशोभीकरणाची कामे सुरू केली आहेत. त्यासाठी महत्त्वाच्या पॉइंट्सवर जुन्या झाडांचे संरक्षण करण्यासाठी आणि वनसंपदा हीच ओळख टिकवण्यासाठी पॉइंट्सवरील झाडांसभोवताली काळ्या दगडांची ग्याबियन वॉल बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काळा दगड लागणार आहे. त्यातच दस्तुरी नाक्यापासून जवळपास चार ते पाच किलोमीटरची वाहतूक मानवी हातगाडी मधून करणे अशक्यप्राय बाब आहे.

त्यासाठी येथील पर्यटनाच्या दृष्टीने विकासकामे होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मर्यादित वेळेसाठी ट्रॅक्टरला परवानगी दिली होती; परंतु काही मंडळींनी ठेकेदारास ट्रॅक्टरला परवानगी दिली आहे तर आम्हालाही जीवनावश्यक वस्तूंकरिता टेम्पो अथवा ट्रॅक्टर गावात आणण्यासाठी परवानगी देण्यात यावी, असा हट्ट धरला. मात्र, यामुळे अनेक विकासकामांमध्ये अडथळा येत आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक गावाचा विकास करण्यासाठी पर्यावरणवाद्यांनी, जिल्हाधिकाºयांनी आता यातून सुवर्णमध्य काढून आलेला निधी परत जाऊ नये यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी माथेरानकरांकडून होत आहे.

टॅग्स :MatheranमाथेरानRaigadरायगड