शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: मोदी यांनी दहशतवादाविरूद्धचे धोरण जगासमोर ठेवले- राजनाथ सिंह
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 02:36 IST

गेल्या काही दिवसांपूर्वी ओढ दिलेल्या पर्जन्यराजाचे गेल्या पाच दिवसांपासून झालेल्या पुनरागमनाने बळीराजा सुखावला आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वी पावसाअभावी

- जयंत धुळप । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : गेल्या काही दिवसांपूर्वी ओढ दिलेल्या पर्जन्यराजाचे गेल्या पाच दिवसांपासून झालेल्या पुनरागमनाने बळीराजा सुखावला आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वी पावसाअभावी ५० टक्क्यांवर रखडलेल्या भात लावण्यांना चांगलाच वेग आला असून रविवारी संध्याकाळपर्यंत जिल्ह्यातील ७५ टक्के भात लावण्या पूर्ण झाल्या आहेत. येत्या दोन दिवसांत १०० टक्के भात लावण्या पूर्ण होतील आणि बुधवारी १९ जुलै रोजी उंदीर या आपल्या वाहनावरून येणाऱ्या पुष्य नक्षत्राचा मध्यम स्वरूपाचा पाऊस भात लावण्यांना पोषक ठरू शकेल असा अंदाज शेतकरी बाळकृष्ण जोशी यांनी व्यक्त केला आहे.सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सर्वाधिक १३० मि.मी. पावसाची नोंद म्हसळा येथे झाली आहे. महाड १२९, पेण १२५.३०, माणगाव १११,तळा १०१,पोलादपूर ९५, श्रीवर्धन ९०, सुधागड ७९, मुरुड ७२, खालापूर ७०,रोहा ६९, अलिबाग ६७,पनवेल ४९.८०, उरण ४७, कर्जत ४२.६० आणि गिरिस्थान माथेरान येथे ८१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांतील जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ८७.९२ मिमी आहे. सोमवारी सकाळी ८ वाजता जिल्ह्यातील नद्यांची जलपातळी नियंत्रणात होती, मात्र जलप्रवाहात वाढ झाली आहे. वीजनिर्मितीत महत्त्वपूर्ण असणाऱ्या जिल्ह्यातील भिरा धरण क्षेत्रात सोमवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत ६९ मिमी पावसाची नोंद झाली असून, १ जून २०१७ पासून येथे एकूण २१४५.६०मिमी पाऊस झाल्याने धरणाच्या जलपातळीत वाढ झाली आहे. धरणाची संकल्पित जलसंचय क्षमता ९.०९० दलघमी असून सद्यस्थितीत जलसंचय ४.७५५ दलघमी झाला आहे. सोमवारी सकाळी आठ वाजता धरणातील जलपातळी ९४.६५ मीटर होती. धरणातील जलपातळी नियंत्रणात ठेवण्याकरिता रविवारी ०.४११९ दलघमीचा जलविसर्ग सोडण्यात आला तर यंदाच्या पावसाळ््यात आतापर्यंत १९.४६२३ दलघमीचा जलविसर्ग सोडण्यात आला. सद्यस्थितीत धरणाचे तीनही दरवाजे बंद असल्याची माहिती कोलाड पाटबंधारे विभाग कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.२८ लघुपाटबंधारे धरणांपैकी २० धरणे १०० टक्के भरली जिल्ह्यातील एकूण २८ लघुपाटबंधारे धरणांपैकी २० धरणे १०० टक्के पूर्ण क्षमतेने भरली असून वाहू लागली आहेत. पूर्ण क्षमतेने भरलेल्या या २० धरणांमध्ये फणसाड (मुरुड), वावा (तळा), सुतारवाडी (रोहा), सुधागड तालुक्यात कोंडगाव, घोटवड, ढोकशेत, कवेळे, उन्हेरे, कुडकी (श्रीवर्धन), म्हसळा तालुक्यात पाभरे व संदेरी, महाड तालुक्यात वरंध, खिंडवाडी, कोथुर्डे आणि खैरे, खालापूर तालुक्यात भिलवले, कलोते-मोकाशी, डोणवट, पनवेल तालुक्यातील मोरबे व उसरण यांचा समावेश आहे. उर्वरित आठ धरणांमध्ये अंबेघर (पेण) ३२ टक्के, श्रीगाव (अलिबाग) ३० टक्के, कार्ले (श्रीवर्धन) ४४ टक्के, रानिवली (श्रीवर्धन) ३६ टक्के, साळोख (कर्जत) ५३ टक्के, अवसरे (कर्जत) ८६ टक्के, बामणोली (पनवेल) ६८ टक्के, पुनाडे (उरण) ५५ टक्के भरली आहेत.