शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

मुरुड शहरात बीएसएनएलच्या इंटरनेट सेवेचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 00:07 IST

संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; टपाल खात्याचा कारभार ठप्प

मुरुड जंजिरा : मुरुडमधील बीएसएनएल सेवा वारंवार खंडित पडल्याने एका राष्ट्रीयकृत बँकेला याचा चांगलाच फटका बसला होता. त्यामुळे त्यांनी खासगी कंपनीची सेवा सुरू केली. रायगड जिल्ह्यात बीएसएनएल सेवा वारंवार खंडित होत असताना वरिष्ठ अधिकारी लक्षच देत नसल्याने ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहेत.मरुडमध्ये ११ नोव्हेंबरपासून बीएसएनएलची नेट सेवा बंद असल्याने मुरुड टपाल कार्यालयातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. रजिस्टर एडी व्यतिरिक्त इतर कोणतेही काम नेट नसल्याने होत नसल्याने टपाल खात्यातील पैसे लोकांना काढता व भरतासुद्धा येत नाहीत.सध्या लग्नसराईचे दिवस असून लोकांना पैशाची गरज आहे. मात्र, नेटसेवा बंद असल्याने हक्काचे पैसे मिळत नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. टपाल आल्यावर त्याची नोंद करण्याचे कामसुद्धा नेटवर आधारित असल्याने टपाल वितरण व्यवस्थेला मोठा फटका सहन करावा लागत आहे. असंख्य लोकांनी या गलथान कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली असून बीएसएनएलने कारभार न सुधारल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.रायगडचे खासदार सुनील तटकरे लवकरच मुरुड दौºयावर येत असून बीएसएनएलचा कारभार सुधारण्याबाबत लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याचे काही ग्राहकांनी सांगितले. बीएसएनएल टॉवरला रेंज नसल्याने शेकडोच्या संख्येने मोबाइल बंद अवस्थेत आहेत. तर नेट नसल्याने बँक महसूल कार्यालये आदीचा कारभार गेल्या अनेक दिवसांपासून ठप्प आहे.याबाबत मुरुड नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा कल्पना पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, बीएसएनएल नेट व भ्रमणध्वनी सेवा वारंवार बंद असल्याने असंख्य ग्राहक त्रस्त आहेत. तक्रार करूनसुद्धा तक्रारींचे निवारण होत नसल्याने स्थानिकांमधून संताप व्यक्त होत आहे. बीएसएनएल कंपनीने आपला कारभार लवकरात लवकर सुधारावा, अन्यथा जनआंदोलन करण्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :BSNLबीएसएनएल