शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आपत्तीचा सामना करण्यासाठी कणे ग्रामस्थांनी कसली कंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 23:57 IST

१५० ग्रामस्थ फुटलेला संरक्षक बांध बांधण्यासाठी लागले कामाला

- दत्ता म्हात्रेपेण : ‘गाव करील ते राव करील काय’ या उक्तीप्रमाणे रविवारी महापुरात वेढलेल्या पेणमधील कणे गावातील ग्रामस्थांनी एकजुटीने कंबर कसली असून आपत्तीचा सामना करण्यास सज्ज झाले आहेत. खाडीतील पाण्याची पातळी कमी होताक्षणी पद्धतशीर नियोजन आराखडा करून हाती मिळेल ते साधनसामग्री घेऊन १५० ग्रामस्थ बांधावर धडकले. खाडीचा फुटलेला संरक्षक बांध बांधण्यासाठी जीवाचे रान करून आलेल्या संकटाला मागे हटविण्यात सज्ज झाले आहेत. आपत्तीच्या काळात लोकसहभाग कसा असावा, याचे कणे ग्रामस्थांनी सर्वांसमोर उत्तम उदाहरण ठेवले आहे. शासकीय यंत्रणेच्या मदतीची वाट न पाहता तातडीने काम हाती घेतले आहे.रविवार ते मंगळवार असे तीन दिवस पुराचे पाणी सभोवार होते. मंगळवारी रात्री समुद्रात ओहोटी लागून पाणी ओसरल्यावर ग्रामस्थांनी जिद्दीला पेटून उठत काम हाती घेतले आहे. आपत्ती व्यवस्थापनात लोकसहभाग असल्याशिवाय काम होत नसत, हे कणे गावातील ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे. गावातील पूर्व बाजूने भोगावती नदीचा प्रवाह अंतोरे गावमार्गे कणे खाडीत येऊन मिळतो. उधाण भरती व अतिवृष्टीच्या काळात खाडीकिनारी हायटाइड परिस्थिती निर्माण होऊन खाडीचे बांध ओव्हरफ्लो होऊन चिखल मातीचे असल्याने लगेच फुटतात. यावर्षी पेणमध्ये विक्रमी पाऊस पडल्याने सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली. पूर्व व दक्षिण बाजूकडील पुराचे लोंढे आल्यावर मातीचे बांध पत्त्याप्रमाणे कोसळले. ही दयनीय अवस्था झाल्यावर ग्रामस्थांची झोप उडाली. या संरक्षक बंधाऱ्यावर गामस्थांची तब्बल ९०० एकर भातशेती अवलंबून आहे. जर फुटलेले बांध दुरुस्त न केल्यास प्रत्येक उधाण भरतीच्या वेळेस गावात पाणी तर येणारच; पण पिकती भातशेती नापीक होणार; अशा या संकटापासून वाचण्यासाठी गाव एकत्र आले आहे.पूर्वांपार चालत आलेली चावडीवरची बैठक घेऊन बांध बांधण्यासाठी नियोजन केले. बुधवारी ओहोटी असल्याने काम करण्याची संधी मिळाली. पुढील येणारी नारळी पौर्णिमेची मोठी उधाण भरती लक्षात घेऊन १५ आॅगस्टपूर्वी जागोजागी फुटलेले संरक्षक बांध बांधण्यासाठी १५० ग्रामस्थ खाडीचे बांध बंदिस्त करण्यात एकवटले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत संवाद व समन्वय महत्त्वाचा आहे. यामध्ये जोपर्यंत ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे व नागरिकांचा १०० टक्के सहभाग असल्याशिवाय कोणतेही काम यशस्वी ठरत नाही. पूर्वजांनी प्रगत तंत्रज्ञान विकसित नसताना एकमेकांच्या सहकार्याने या खारभूमी संरक्षक बंधाऱ्यांची देखभाल सामुदायिक पद्धतीने केली होती आणि त्याप्रमाणे नजरेसमोर ठेवून कणे ग्रामस्थ कामात व्यस्त आहेत. १९ कि.मी. लांब खाडीचा बांध असून तो जागोजागी पूरपरिस्थितीमुळे फुटला असून येत्या १२ आॅगस्टपूर्वी बांधण्याचा निर्णय घेतला आहे.