शहरं
Join us  
Trending Stories
1
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
2
आधुनिक तंत्रज्ञान, पूर्णपणे मेड इन इंडिया; भारतीय नौदलात ‘INS माहे’ची धमाकेदार एन्ट्री...
3
प्रेमात धोका! मिस कॉलने जोडले नाते, प्रियकराने तोडले! गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करून स्टेशनवर सोडून पळाला
4
डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू अनैसर्गिक; डॉक्टरांच्या खुलाशाने खळबळ, शवविच्छेदन अहवालात कोणत्या नोंदी?
5
IND vs SA: टीम इंडियाच्या फलंदाजांची घसरगुंडी, दुसरीकडे करूण नायरची सूचक पोस्ट, म्हणाला...
6
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
7
'३० कॉटेजचे एक आलिशान रिसॉर्ट बांधायचेच राहिले...'; बिझनेसमन धर्मेंद्रची शेवटची इच्छा होती...
8
महिंद्रा-टाटासह 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले! बाजारात अचानक का वाढला विक्रीचा दबाव?
9
दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला; अफगाणिस्तानातून आलेल्या विमानाची चुकीच्या रनवेवर लँडिंग
10
IND vs SA 2nd Test Day 3 Stumps : बावुमानं टीम इंडियाला फॉलोऑन देणं टाळलं; कारण...
11
नगरपरिषद निवडणूक होण्यापूर्वीच भाजपाच्या १०० सदस्यांची बिनविरोध निवड; विरोधकांचा हल्लाबोल
12
शर्टच्या आतून लावला बॉम्ब, गेटजवळ पोहचताच दाबले डेटोनेटर, पाकिस्तानातील आत्मघाती हल्ल्याचा फोटो
13
सावधान! सरकार नवीन काहीतरी आणते, लोक फसतात; आता 'SIR फॉर्म' स्कॅमचे जाळे टाकू लागले सायबर भामटे
14
डॉक्टर, सुशिक्षित तरुणांना पाकिस्तानी 'आका'ने दिली ट्रेनिंग; लाल किल्ला स्फोटातील आरोपींचे जैश-ए-मोहम्मदशी थेट कनेक्शन!
15
“मेट्रोसारखी सुंदर लोकल ट्रेन मुंबईकरांना देणार, लवकरच कायापालट”; CM फडणवीसांचे आश्वासन
16
'अरुणाचल'मध्ये जन्मलेल्या भारतीय महिलेला शांघाय विमानतळावर १८ तास डांबले; 'हा' पासपोर्ट अवैध असल्याचे चीनचे फर्मान
17
"भारतीय सिनेमातील एका युगाचा अंत..."; पंतप्रधान मोदी, शरद पवार, राज ठाकरेंनी धर्मेंद्र यांना वाहिली श्रद्धांजली
18
Dharmendra Passed Away: डोळ्यांत अश्रू अन् निस्तेज चेहरा! धर्मेंद्र यांच्या निधनाने पत्नी हेमा मालिनी व्यथित
19
'शोले'चा 'वीरू' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, बॉलिवूड शोकमग्न
20
IND vs SA : मार्कोचा 'सिक्सर'! १५ वर्षांत पहिल्यांदा असं घडलं! टीम इंडिया २०१ धावांत ऑलआउट
Daily Top 2Weekly Top 5

आपत्तीचा सामना करण्यासाठी कणे ग्रामस्थांनी कसली कंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 23:57 IST

१५० ग्रामस्थ फुटलेला संरक्षक बांध बांधण्यासाठी लागले कामाला

- दत्ता म्हात्रेपेण : ‘गाव करील ते राव करील काय’ या उक्तीप्रमाणे रविवारी महापुरात वेढलेल्या पेणमधील कणे गावातील ग्रामस्थांनी एकजुटीने कंबर कसली असून आपत्तीचा सामना करण्यास सज्ज झाले आहेत. खाडीतील पाण्याची पातळी कमी होताक्षणी पद्धतशीर नियोजन आराखडा करून हाती मिळेल ते साधनसामग्री घेऊन १५० ग्रामस्थ बांधावर धडकले. खाडीचा फुटलेला संरक्षक बांध बांधण्यासाठी जीवाचे रान करून आलेल्या संकटाला मागे हटविण्यात सज्ज झाले आहेत. आपत्तीच्या काळात लोकसहभाग कसा असावा, याचे कणे ग्रामस्थांनी सर्वांसमोर उत्तम उदाहरण ठेवले आहे. शासकीय यंत्रणेच्या मदतीची वाट न पाहता तातडीने काम हाती घेतले आहे.रविवार ते मंगळवार असे तीन दिवस पुराचे पाणी सभोवार होते. मंगळवारी रात्री समुद्रात ओहोटी लागून पाणी ओसरल्यावर ग्रामस्थांनी जिद्दीला पेटून उठत काम हाती घेतले आहे. आपत्ती व्यवस्थापनात लोकसहभाग असल्याशिवाय काम होत नसत, हे कणे गावातील ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे. गावातील पूर्व बाजूने भोगावती नदीचा प्रवाह अंतोरे गावमार्गे कणे खाडीत येऊन मिळतो. उधाण भरती व अतिवृष्टीच्या काळात खाडीकिनारी हायटाइड परिस्थिती निर्माण होऊन खाडीचे बांध ओव्हरफ्लो होऊन चिखल मातीचे असल्याने लगेच फुटतात. यावर्षी पेणमध्ये विक्रमी पाऊस पडल्याने सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली. पूर्व व दक्षिण बाजूकडील पुराचे लोंढे आल्यावर मातीचे बांध पत्त्याप्रमाणे कोसळले. ही दयनीय अवस्था झाल्यावर ग्रामस्थांची झोप उडाली. या संरक्षक बंधाऱ्यावर गामस्थांची तब्बल ९०० एकर भातशेती अवलंबून आहे. जर फुटलेले बांध दुरुस्त न केल्यास प्रत्येक उधाण भरतीच्या वेळेस गावात पाणी तर येणारच; पण पिकती भातशेती नापीक होणार; अशा या संकटापासून वाचण्यासाठी गाव एकत्र आले आहे.पूर्वांपार चालत आलेली चावडीवरची बैठक घेऊन बांध बांधण्यासाठी नियोजन केले. बुधवारी ओहोटी असल्याने काम करण्याची संधी मिळाली. पुढील येणारी नारळी पौर्णिमेची मोठी उधाण भरती लक्षात घेऊन १५ आॅगस्टपूर्वी जागोजागी फुटलेले संरक्षक बांध बांधण्यासाठी १५० ग्रामस्थ खाडीचे बांध बंदिस्त करण्यात एकवटले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत संवाद व समन्वय महत्त्वाचा आहे. यामध्ये जोपर्यंत ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे व नागरिकांचा १०० टक्के सहभाग असल्याशिवाय कोणतेही काम यशस्वी ठरत नाही. पूर्वजांनी प्रगत तंत्रज्ञान विकसित नसताना एकमेकांच्या सहकार्याने या खारभूमी संरक्षक बंधाऱ्यांची देखभाल सामुदायिक पद्धतीने केली होती आणि त्याप्रमाणे नजरेसमोर ठेवून कणे ग्रामस्थ कामात व्यस्त आहेत. १९ कि.मी. लांब खाडीचा बांध असून तो जागोजागी पूरपरिस्थितीमुळे फुटला असून येत्या १२ आॅगस्टपूर्वी बांधण्याचा निर्णय घेतला आहे.