शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

निर्माल्यापासून खतनिर्मिती; म्हसळा तालुक्यातून पाच टन निर्माल्याचे केले संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 22:59 IST

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या आदर्श उपक्रमामुळे गणेश उत्सवात वाहण्यात आलेली फुले, दूर्वा, हार हे दरवर्षी पाण्यामध्ये विसर्जित केले जात होते

म्हसळा : गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवशी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने म्हसळा तालुक्यात पाच टनापेक्षा अधिक निर्माल्य संकलन केले आहे. या निर्माल्यातून सेंद्रिय खतनिर्मिती करण्यात येणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले. या निर्माल्यासाठी म्हसळा तालुक्यातील खेडेगाव-वस्तीमध्येही प्रतिष्ठानच्या सदस्याने निर्माल्य संकलन केले आहे.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या आदर्श उपक्रमामुळे गणेश उत्सवात वाहण्यात आलेली फुले, दूर्वा, हार हे दरवर्षी पाण्यामध्ये विसर्जित केले जात होते; परंतु प्रतिष्ठानच्या उपक्रमांतर्गत वाया जाणारी हार, फुले आज वृक्षाच्या खतासाठी उपयुक्त ठरणार आहेत. प्रतिष्ठानने अशा प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम राबवत संपूर्ण मानवतेला एक निसर्गनिष्ठा काय असते याचे प्रत्यक्षदर्शी साक्ष दिले आहे.म्हसळा तालुक्यात दोन पाणपोई, बस थांबे, पाझर तलावातील गाळउपसा, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण तसेच २५०० पेक्षा विविध धर्म-जातीचे दाखले वाटप, शहरासह तालुक्यात स्वच्छता मोहीम असे विविध उपक्रम राबवत तालुक्यात कार्य केले आहे. त्यामुळे आजच्या या निर्माल्य संकलन उपक्रमामुळे तालुक्यात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सर्वस्तरातून विशेष कौतुक होत आहे.

आमच्या म्हसळा तालुक्यामध्ये डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी प्रतिष्ठान मार्फत गणेश चतुर्थीच्या काळात गणेशाला वाहण्यात आलेली फुले, दूर्वा, हार हे वाया जाण्याऐवजी आज त्यांचे कुंडींमध्ये नियोजन करून संकलन केले होते, त्यामुळे या पर्यावरण संरक्षणाकरिता निर्माल्याचा उपयोग सेंद्रिय खतामध्ये होणार असल्याने आम्हाला आज या उपक्रमाचा मनस्वी आनंद होत आहे. त्यामुळे प्रतिष्ठानचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. - गौरव पोतदार, गणेशभक्त