शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

निर्माल्यापासून खतनिर्मिती; म्हसळा तालुक्यातून पाच टन निर्माल्याचे केले संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 22:59 IST

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या आदर्श उपक्रमामुळे गणेश उत्सवात वाहण्यात आलेली फुले, दूर्वा, हार हे दरवर्षी पाण्यामध्ये विसर्जित केले जात होते

म्हसळा : गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवशी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने म्हसळा तालुक्यात पाच टनापेक्षा अधिक निर्माल्य संकलन केले आहे. या निर्माल्यातून सेंद्रिय खतनिर्मिती करण्यात येणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले. या निर्माल्यासाठी म्हसळा तालुक्यातील खेडेगाव-वस्तीमध्येही प्रतिष्ठानच्या सदस्याने निर्माल्य संकलन केले आहे.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या आदर्श उपक्रमामुळे गणेश उत्सवात वाहण्यात आलेली फुले, दूर्वा, हार हे दरवर्षी पाण्यामध्ये विसर्जित केले जात होते; परंतु प्रतिष्ठानच्या उपक्रमांतर्गत वाया जाणारी हार, फुले आज वृक्षाच्या खतासाठी उपयुक्त ठरणार आहेत. प्रतिष्ठानने अशा प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम राबवत संपूर्ण मानवतेला एक निसर्गनिष्ठा काय असते याचे प्रत्यक्षदर्शी साक्ष दिले आहे.म्हसळा तालुक्यात दोन पाणपोई, बस थांबे, पाझर तलावातील गाळउपसा, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण तसेच २५०० पेक्षा विविध धर्म-जातीचे दाखले वाटप, शहरासह तालुक्यात स्वच्छता मोहीम असे विविध उपक्रम राबवत तालुक्यात कार्य केले आहे. त्यामुळे आजच्या या निर्माल्य संकलन उपक्रमामुळे तालुक्यात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सर्वस्तरातून विशेष कौतुक होत आहे.

आमच्या म्हसळा तालुक्यामध्ये डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी प्रतिष्ठान मार्फत गणेश चतुर्थीच्या काळात गणेशाला वाहण्यात आलेली फुले, दूर्वा, हार हे वाया जाण्याऐवजी आज त्यांचे कुंडींमध्ये नियोजन करून संकलन केले होते, त्यामुळे या पर्यावरण संरक्षणाकरिता निर्माल्याचा उपयोग सेंद्रिय खतामध्ये होणार असल्याने आम्हाला आज या उपक्रमाचा मनस्वी आनंद होत आहे. त्यामुळे प्रतिष्ठानचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. - गौरव पोतदार, गणेशभक्त