शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सलाम तुमच्या जिद्दीला! एक किमीवरून पाणी आणून शेतकरी महिलेनं जगवली आंब्याची कलमं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 22:58 IST

१०० कलमांची केली लागवड; शासनाकडून कुंपण, ठिबक सिंचनसाठी मदतीची अपेक्षा

- प्रकाश कदम पोलादपूर : पोलादपूर तालुक्यातील खडकवणे-दत्तवाडी येथील महिला शेतकरी कलावती एकनाथ कदम यांनी कृषी विभागामार्फत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून १०० कलम आंबा लागवड केली आहे. यासाठी शासनाचे ३ वर्षे अनुदान देय आहे.मात्र कलावती कदम व पती एकनाथ कदम या दाम्पत्याने हा परिसर दुर्गम, डोंगराळ असतानाही अथक मेहनत व परिश्रम घेत आंबा लागवडीनंतर सुमारे एक किमी अंतरावरून हंड्याने पाणी आणून, तसेच गतवर्षी पडलेल्या पावसाचे पाणी ३ टाक्यांमध्ये साठवूनसर्वच १०० झाडे जगविण्याचा विक्रम केला आहे.तालुका कृषी विभाग यांच्याकडून, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत त्यांना विनामूल्य १०० आंबा कलमांची झाडे मिळाली. शासनाच्या निकषानुसार ०.२५ क्षेत्रात माळरानावर शेतात ३ बाय ३ आकाराचे खड्डे खोदून त्यात शेण, पालापाचोळा टाकून, ते कुजवून ५ बाय ५ मीटर अंतरावर त्यांनी लागवड केली आहे.पहिल्या वर्षी हंड्याने डोक्यावर सुमारे १ कि.मी. अंतरावरून पाणी आणून प्रत्येक दिवशी प्रति झाड १ ते २ लीटरप्रमाणे कदम यांनी पाणी दिले. त्यानंतर गेल्या पावसाळ्यात शेतात एक प्लॅस्टिक छप्पर तयार करून पनेल लावून पावसाचे तीन टाक्यांमध्ये सुमारे १० हजार लीटर पाणी साठवले. सद्यस्थितीत प्रति झाड १ ते २ लीटर पाणी झाडांना दिले जाते, आणि वेळप्रसंगी बिसलरी कॅन भरून आणि हंड्याने पाणी आणून रोपांचे संवर्धन केले जाते.आंबा कलमांच्या लागवडीसाठी तालुका कृषी अधिकारी कैलास धुमाळ व कृषी सहायक दत्तात्रेय नरुटे यांचे मार्गदर्शन लाभल्याचे कदम सांगतात. सध्या वणवा लागण्याचे प्रकार परिसरात वाढले आहे. अशा वेळी रोपांच्या सुरक्षेसाठी त्यांना विविध उपाययोजना कराव्या लागतात. त्यांनी शेतातील गवत साफ करून, आजूबाजूचा परिसरही स्वच्छ केला आहे. बाहेरील वणव्याची झळ रोपांना बसू नये म्हणून आधीच कुंपणाच्या आजूबाजूचा परिसर जाळून घेतला आहे.काम सांभाळून संवर्धनशासनाने बोअरवेल मारल्यास ठिबक सिंचनद्वारे झाडांचे संवर्धन करता येईल, अशी अपेक्षा कदम दांपत्याने व्यक्त केली आहे. कलावती या आशा सेविका असून वरिष्ठांनी नेमून दिलेली कामे गावोगावी फिरून घर व शेतीची कामे सांभाळून झाडांची मुलांप्रमाणे काळजी घेत आहेत. तर त्यांचे पती एकनाथ दिव्यांग असूनही परिस्थितीवर मात करून पत्नीसोबत झाडांना पाणी घालणे, निगा राखणे यासाठी मेहनत घेत आहेत.