शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

आंबा, काजू बागायतदारांना मिळणार विमा संरक्षण

By admin | Updated: October 16, 2014 22:51 IST

आंबा, काजू नुकसानभरपाईसाठीची नियमावली

ओरोस : प्रायोगिक तत्त्वावरील हवामानावर आधारीत पथदर्शक फळपीक विमा योजना २०१५ साठी आंबा बागायतदारांना १ लाख विमा संरक्षण तर काजू बागायतदारांना ७५ हजार विमा संरक्षण देण्यात येणार आहे. विमा हप्ता भरण्याची मुदत आंबा बागायतदारांसाठी ३१ डिसेंबर २०१५ तर काजू बागायतदारांसाठी ३० नोव्हेंबर २०१५ असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी ए. एल. नातू यांनी दिली.आंबा व काजू बागायतदारांसाठी शासनाने १० सप्टेंबर २०१४ पासून फळपीक विमा योजना सुरू केली आहे. कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना सक्तीची असून बिगर कर्जदारांना ती ऐच्छिक स्वरूपाची आहे. आंबा बागायतदारांसाठी प्रति हेक्टरी वर्षाला ६ हजार रुपये तर काजू बागायतदारांना वर्षाला ४ हजार ५०० रूपये विमा हप्ता आहे.१ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०१५ या कालावधीत १०.५ अंश सेल्सिअस एवढे कमी तापमान असेल तर अशा बागायतदारांना नुकसान भरपाई मिळणार आहे. १ डिसेंबर ते ३१ जानेवारी २०१५ या कालावधीत ११ अंश सेल्सिअस इतके कमी तापमान असेल तर काजू बागायतदारांना नुकसान भरपाई मिळणार आहे. १ मार्च ते ३१ मे २०१५ या कालावधीत ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असेल तर आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई मिळणार आहे. विमा हप्ता भरण्यासंदर्भात कृषी विभागाचे मंडळ अधिकारी, तालुका अधिकारी, उपविभागीय कार्यालय व जिल्हा कार्यालय या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र वाकडे यांनी केले आहे. (वार्ताहर)आंबा, काजू नुकसानभरपाईसाठीची नियमावली१ जानेवारी ते १५ मे २००५ या कालावधीत अवेळी पाऊस पडला तर आंबा बागायतदारांना नुकसानभरपाई मिळणार आहे. ही नुकसानभरपाई एका दिवसात जर ५ मि.मी. पाऊस पडला तर ८ हजार, २ दिवस पाऊस पडला तर १२ हजार व ३ दिवस पडला तर २० हजार अशी मिळणार आहे. जर एक दिवस ५ मि.मी. पाऊस पडला तर काजू बागायतदारांना १० हजार, दोन दिवस पडला तर २० हजार, तीन दिवस पाऊस पडला तर ३५ हजार व चार दिवस पाऊस पडला तर ५० हजार रूपये नुकसान भरपाई मिळणार आहे. ही नुकसान भरपाई हेक्टरी मिळणार आहे. १ डिसेंबर ते ३१ जानेवारी या कालावधीत पाऊस पडला तर काजू बागायतदारांना नुकसान भरपाई मिळेल.