शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
4
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
6
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
9
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
10
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
11
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
12
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
13
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
14
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
15
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
16
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
17
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
18
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
19
...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार
20
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग

माणगाव काळ नदीचे पाणी दूषित

By admin | Updated: April 28, 2017 00:20 IST

माणगाव शहरातून जाणाऱ्या काळ नदीमध्ये निवासी संकुलांचे सांडपाणी थेट गटाराद्वारे सोडण्यात आल्याने काळ नदी दूषित झाली आहे.

माणगाव : माणगाव शहरातून जाणाऱ्या काळ नदीमध्ये निवासी संकुलांचे सांडपाणी थेट गटाराद्वारे सोडण्यात आल्याने काळ नदी दूषित झाली आहे. या गंभीर प्रकाराकडे माणगांव नगरपंचायत जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असल्याने नागरिकांच्या आरोग्याकडे नगरपंचायतीचे लक्ष वेधण्यासाठी माणगावमधील ग्रामस्थांनी मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या आशयाचे निवेदन गुरु वारी माणगाव तहसीलदार ऊर्मिला पाटील यांना राष्ट्रीय काँग्रेसचे नेते ज्ञानदेव पवार व सहकाऱ्यांनी दिले आहे.माणगावमधील अनेक निवासी संकुल गृहप्रकल्पांचे सांडपाणी थेट काळ नदीत सोडले आहे. या काळ नदीचे पाणी शहरातील ग्रामस्थांबरोबरच तालुक्यातील सुमारे शंभर ते सव्वाशे गावांतील नागरिकांना काळ नदीतील पाण्याचा पुरवठा केला जातो. सद्यपरिस्थितीत हे पाणी अत्यंत दूषित झाले असून साथीचे अनेक रोग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. सन २०१० मध्ये महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाने माणगाव काळ नदीतील दूषित पाणी हे पिण्यासाठी अयोग्य असल्याचा दाखला दिला होता. याकडे नगरपंचायत डोळेझाक करीत आहेत. या समस्येची रायगड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती ज्ञानदेव पवार, भाजपाचे बाळशेठ घोणे, सुरेंद्र साळी, खांदाड पोलीस पाटील नथुराम पवार, सामाजिक कार्यकर्ते अकबर परदेशी आदींसह समिती प्रशासन अधिकारी, माणगाव पंचायत समिती विस्तार अधिकारी यांनी पाहणी करून नगरपंचायत प्रशासनावर व बिल्डर्स मालकांवर तीव्र संताप व्यक्त केला.या गहन समस्येबाबत माणगावकर ग्रामस्थांनी माणगाव तहसीलदार ऊर्मिला पाटील यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनाची प्रत माहितीकरिता माणगाव प्रांताधिकारी, माणगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी व नगरपंचायत माणगाव यांना देण्यात आली आहे. (वार्ताहर)