शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

माणगाव काळ नदीचे पाणी दूषित

By admin | Updated: April 28, 2017 00:20 IST

माणगाव शहरातून जाणाऱ्या काळ नदीमध्ये निवासी संकुलांचे सांडपाणी थेट गटाराद्वारे सोडण्यात आल्याने काळ नदी दूषित झाली आहे.

माणगाव : माणगाव शहरातून जाणाऱ्या काळ नदीमध्ये निवासी संकुलांचे सांडपाणी थेट गटाराद्वारे सोडण्यात आल्याने काळ नदी दूषित झाली आहे. या गंभीर प्रकाराकडे माणगांव नगरपंचायत जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असल्याने नागरिकांच्या आरोग्याकडे नगरपंचायतीचे लक्ष वेधण्यासाठी माणगावमधील ग्रामस्थांनी मोर्चा काढून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या आशयाचे निवेदन गुरु वारी माणगाव तहसीलदार ऊर्मिला पाटील यांना राष्ट्रीय काँग्रेसचे नेते ज्ञानदेव पवार व सहकाऱ्यांनी दिले आहे.माणगावमधील अनेक निवासी संकुल गृहप्रकल्पांचे सांडपाणी थेट काळ नदीत सोडले आहे. या काळ नदीचे पाणी शहरातील ग्रामस्थांबरोबरच तालुक्यातील सुमारे शंभर ते सव्वाशे गावांतील नागरिकांना काळ नदीतील पाण्याचा पुरवठा केला जातो. सद्यपरिस्थितीत हे पाणी अत्यंत दूषित झाले असून साथीचे अनेक रोग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. सन २०१० मध्ये महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाने माणगाव काळ नदीतील दूषित पाणी हे पिण्यासाठी अयोग्य असल्याचा दाखला दिला होता. याकडे नगरपंचायत डोळेझाक करीत आहेत. या समस्येची रायगड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती ज्ञानदेव पवार, भाजपाचे बाळशेठ घोणे, सुरेंद्र साळी, खांदाड पोलीस पाटील नथुराम पवार, सामाजिक कार्यकर्ते अकबर परदेशी आदींसह समिती प्रशासन अधिकारी, माणगाव पंचायत समिती विस्तार अधिकारी यांनी पाहणी करून नगरपंचायत प्रशासनावर व बिल्डर्स मालकांवर तीव्र संताप व्यक्त केला.या गहन समस्येबाबत माणगावकर ग्रामस्थांनी माणगाव तहसीलदार ऊर्मिला पाटील यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनाची प्रत माहितीकरिता माणगाव प्रांताधिकारी, माणगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी व नगरपंचायत माणगाव यांना देण्यात आली आहे. (वार्ताहर)