शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषित बालके पुन्हा स्वगृही; कर्जत तालुक्यात आरोग्य विभागाने बाल चिकित्सा केंद्र सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 06:29 IST

तालुक्यातील वाढते कुपोषण लक्षात घेता त्यांच्यावर जिल्हा रु ग्णालयातील बाल चिकित्सा केंद्रात उपचार करावेत, असा प्रयत्न ३१ आॅक्टोबर रोजी केला गेला. कर्जत तालुक्यातील कुपोषित २६ आणि अन्य ४ बालकांना अलिबाग येथे चिकित्सा केंद्रात दाखल करण्यासाठी नेले.

- विजय मांडेकर्जत : तालुक्यातील वाढते कुपोषण लक्षात घेता त्यांच्यावर जिल्हा रु ग्णालयातील बाल चिकित्सा केंद्रात उपचार करावेत, असा प्रयत्न ३१ आॅक्टोबर रोजी केला गेला. कर्जत तालुक्यातील कुपोषित २६ आणि अन्य ४ बालकांना अलिबाग येथे चिकित्सा केंद्रात दाखल करण्यासाठी नेले. मात्र, दुपारी १२ वाजता अलिबागला पोहोचलेली बालके सायंकाळी ७ वाजता पुन्हा कर्जतला परत आली. अलिबागचे वातावरण मानवत नसल्याने सर्व बालके आपल्या घरी पोहोचली असून, मोठ्या प्रमाणात कुपोषण असलेल्या कर्जत तालुक्यात आरोग्य विभागाने बाल चिकित्सा केंद्र सुरू करण्याच्या मागणीचा विचार प्रशासन करीत आहे.सप्टेंबर अखेरच्या सर्व्हेनुसार कर्जत तालुक्यात २७ ‘सॅम’ श्रेणीमधील म्हणजे अतिकुपोषित आणि ७४ तीव्र कुपोषित, म्हणजे आरोग्य विभागाच्या भाषेत ‘मॅम’ श्रेणीची बालके आहेत. २० आॅक्टोबरच्या घटनेनंतर कुपोषित बालकांची जिल्हा रु ग्णालयात उभारण्यात आलेल्या बाल चिकित्सा केंद्रात तपासणी व्हावी, असा प्रयत्न जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागाने केला. त्यानंतर ३१ आॅक्टोबर रोजी तालुक्यातील अतिकुपोषित अशा २६ आणि अन्य ४ अशा ३० बालकांना संबंधित कुपोषित बालकांच्या पालकांसह अलिबाग येथे नेण्यात आले. त्या त्या अंगणवाडी केंद्राच्या सेविका, एकात्मिक बालविकासच्या प्रकल्प अधिकारी निशिगंधा भवार, पर्यवेक्षिका एस. ए. तांबे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर काटे यांची टीम कुपोषित बालकांसोबत होती.या सर्व बालकांची आरोग्य तपासणी सुरू असताना, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे यांनी बाल चिकित्सा केंद्राला भेट देऊन माहिती घेतली. त्या वेळी आरोग्य समितीचे सभापती नरेश पाटील, महिला बालकल्याण समिती सभापती उमा मुंढे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई हे सोबत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा तटकरे यांनी त्या ठिकाणी सर्वाधिक आजाराने त्रस्त नेरळ भाकरीपाडा येथील बालकाला उचलून घेत त्याची प्रकृती किती गंभीर आहे, याची माहिती करून घेतली.या बाल चिकित्सा केंद्रात सर्व बालकांचे १५ टक्के वजन वाढल्यानंतर त्यांना केंद्रातून घरी सोडण्यात येते. मात्र, दुपारी ३ वाजता रु ग्णालयात दाखल केलेल्या सर्व ३० बालकांच्या पालकांनी अलिबाग येथे राहायचे नसून आपल्याला कर्जतला घरी जायचे असल्याचा तगादा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे लावला. तपासणीत जी तीन बालके वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त आहेत, त्यांनीही घरी जाण्याची परवानगी मागितली. शेवटी त्या सर्वांकडून आपल्या मर्जीने घरी परत जात असल्याचे लिहून घेण्यात आले.आम्ही बाल चिकित्सा केंद्रात दररोज वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त असलेल्या बालकांवर उपचार करतो आणि त्यांच्या आवश्यकतेनुसार मुंबईत हलवून उपचार करून त्यांना सुदृढ करतो. कर्जतमधील ती ३ कुपोषित बालके कर्जतला परत गेली असली, तरी त्यांना कर्जत येथून मुंबईत नेण्याची व्यवस्था केली जाईल.- डॉ. अजित गवळी, जिल्हा शल्य चिकित्सकजिल्हा परिषद कुपोषणाबद्दल अत्यंत संवेदनशील असून, कर्जत तालुक्यातील त्या बालकांना तत्काळ अलिबाग येथे आणले आहे. त्या बालकांना सुदृढ करण्यासाठी सर्व आवश्यक काळजी प्रशासन घेत आहे.- अदिती तटकरे, अध्यक्षा रायगड जिल्हा परिषदअलिबाग येथील समुद्राजवळील खारे वारे हे कर्जतच्या लोकांना मानवत नाहीत, त्यामुळे कर्जतचे रु ग्ण अलिबागला येत नाही. अलिबागपेक्षा मुंबई जवळ असल्याने कर्जतचे रु ग्ण तिकडे सहज पोहोचतात. मात्र, कुपोषित सारखी लहान बालके मुंबईमध्ये नेऊन उपचार घेऊ शकत नसल्याने आम्ही येथील कुपोषण लक्षात घेऊन, गेली अनेक वर्षे बाल चिकित्सा केंद्र कर्जतमध्ये सुरू व्हावे, अशी मागणी आरोग्य विभागाकडे करीत आहोत.- सुरेश लाड, आमदार कर्जत

टॅग्स :Raigadरायगड