शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

जातींच्या दाखल्याबाबत ठोस निर्णय द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 02:23 IST

तालुक्यातील नवगाव ग्रामपंचायतीमधील कोळी समाजातील व्यक्तींकडे असणाºया अनुसूचित जमातीचे दाखले अवैध ठरवले जात असल्याने त्यांना निवडणूक लढवता येत नाही

अलिबाग : तालुक्यातील नवगाव ग्रामपंचायतीमधील कोळी समाजातील व्यक्तींकडे असणाºया अनुसूचित जमातीचे दाखले अवैध ठरवले जात असल्याने त्यांना निवडणूक लढवता येत नाही. लोकशाहीचा मूळ उद्देशच सफल होत नसल्याने तेथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसह पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभेच्या सर्वच निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. ग्रामस्थांनी घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे प्रशासनासह राज्यकर्त्यांना जाग येणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जातींच्या दाखल्याबाबत ठोस निर्णय घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. ग्रामस्थांनी त्यांचे म्हणणे खरे ठरवल्यास ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची ही दुसरी घटना ठरणार आहे.नवगाव ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जमातीचे सात, नागरिकांचा मागास प्रवर्गचे तीन आणि सर्वसाधारण प्रवर्गातील एक असे एकूण ११ सदस्य निवडून द्यायचे असतात. अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाची (हिंदू महादेव कोळी) येथे लोकसंख्या जास्त असल्यामुळे साहजिकच त्यांच्या प्रवर्गाच्या प्रतिनिधींची संख्या जास्त आहे. यातील महत्त्वाची बाब म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये मोडणाºया कोळी समाजातील लोकांकडे अनुसूचित जमातीचे दाखले आहेत, परंतु जात पडताळणीच्या वेळी हे दाखले अवैध ठरवले जातात. त्यामुळे निवडणुकीचा काहीच उपयोग होत नाही. कोळी समाजातील १९५० पूर्वीचे पूर्वज अथवा हयात असलेल्या व्यक्ती या शिक्षित नाहीत. त्यामुळे ५० वर्षांपूर्वीचे पुरावे सादर करता येत नाहीत. त्यामुळे या गावातील नागरिकांनी निवडणूक लढवली, तरी सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. पुरावेच नसल्याने त्यांचे दाखले अवैध ठरवले जातात. त्यानंतर त्याचे ग्रामपंचायतीमधील सदस्यत्व रद्द होते. ३ नोव्हेंबर २००७ साली ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती. त्यावेळी सरपंचपदी बसलेल्या सदस्याचे जातीचे दाखले अवैध ठरवले होते. त्यामुळे त्याचा कारभार १५ मे २०१० पर्यंत उपसरपंचांनी चालवला होता. त्यानंतर ग्रामपंचायतीवर १८ मे २०१० रोजी प्रशासकाची नेमणूक करण्यात आली.त्यानंतर २०१२ साली झालेल्या निवडणुकीमध्ये हीच परिस्थिती असल्याने ग्रामस्थांनी निवडणुकीवरच बहिष्कार टाकला. त्यामुळे आजपर्यंत ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकच पाहत आहे.