शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

औषध निर्माण प्रकल्पासाठी सिडकाेचे नियम लावा- आमदार जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 23:52 IST

रोहा तालुक्यातील सात आणि मुरूड तालुक्यातील १३ गावांमध्ये औषध निर्माण प्रकल्प विकसित करण्यासाठी राज्य सरकारने अधिसूचना काढली आहे.

रायगड /मुरुड : राेहा आणि मुरूड तालुक्यामध्ये प्रस्तावित असलेल्या औषध निर्माण प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्यात येणार आहे. हा भाग आता सिडकाेच्या अखत्यारीत येत आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या जमिनी सिडकाेच्या नियमानुसारच खरेदी कराव्यात, अशी मागणी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना केली.

रोहा तालुक्यातील सात आणि मुरूड तालुक्यातील १३ गावांमध्ये औषध निर्माण प्रकल्प विकसित करण्यासाठी राज्य सरकारने अधिसूचना काढली आहे. आम्हाला विकास हवा आहे, पण स्थानिकांना भकास करणारा विकास काय कामाचा? असा सवाल आमदार पाटील यांनी व्यक्त केला. आपला कुठल्याही विकासाला विरोध नाही. पण स्थानिकांना देशोधडीला लावणारा विकास होणार असेल तर मात्र संघर्ष करावाच लागेल.

फडणवीस सरकारच्या काळात जेव्हा सर्वप्रथम हा प्रस्ताव विधान परिषदेत आला त्या वेळेसदेखील मी सांगितले की, सिडकोला विरोध नाही. पण सिडकोने यापूर्वी ज्या नियमांच्या आधारे जमिनी अधिग्रहित केल्या आहेत त्याच नियमांच्या आधारे रोहा, मुरूड तालुक्यातील जमिनी अधिग्रहित करा. तसे झाल्यास शेतकऱ्यांना साडेबावीस टक्के विकसित भूखंड मिळू शकेल. मागील दोन-तीन वर्षांत मातीमोल किमतीने येथील जमिनी खरेदी करण्यात आल्या आहेत. 

गोरगरीब शेतकऱ्यांची दिशाभूल करून या जमिनी खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ज्यांनी जमिनी घेतल्या आहेत ते आता चढ्या दराने जमिनी विकणार आहेत. त्यामुळे त्यातील ५० टक्के हिस्सा हा शेतकऱ्यांना द्या, तसेच ज्यांनी जमिनी खरेदी केल्या आहेत त्यांचे आर्थिक स्रोत तपासले पाहिजेत, अशी मागणीही आमदार पाटील यांनी केली.

जमिनी अधिग्रहित करण्यात येतील तेव्हा सदर जमिनीच्या मूळ मालकाला पन्नास टक्के मोबदला दिलाच पाहिजे ही सर्वप्रथम मागणी असणार आहे. या विभागात अनेक जमिनींचे खोटे व्यवहार झाले आहेत त्यांची देखील चौकशी करण्यात यावी. कुशल-अकुशल मनुष्यबळ स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हावे यासाठी सरकारने प्रशिक्षण संस्था उभारून येथील युवकांना मोफत प्रशिक्षण द्यावे. वाढीव गावठाण, वाढीव एफएसआय, रोजगार, प्रदूषण, जमिनीचा मोबदला यापैकी कुठल्याही विषयावर चर्चा न करता, येथील जनतेला विश्वासात न घेता प्रकल्प लादला जाणार असेल तर हे स्थानिकांना फसविण्याचे सरकारचे षड्यंत्र आहे. आपल्या हक्काचा लाभ मिळविण्यासाठी सर्वांनी एकत्र या, असे आवाहनदेखील आमदार पाटील  यांनी केले.

टॅग्स :Raigadरायगड