शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
2
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
4
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
5
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
6
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
7
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
8
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
9
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
10
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
11
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
12
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
13
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
14
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
15
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
16
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
17
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
18
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
19
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
20
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं

औषध निर्माण प्रकल्पासाठी सिडकाेचे नियम लावा- आमदार जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 23:52 IST

रोहा तालुक्यातील सात आणि मुरूड तालुक्यातील १३ गावांमध्ये औषध निर्माण प्रकल्प विकसित करण्यासाठी राज्य सरकारने अधिसूचना काढली आहे.

रायगड /मुरुड : राेहा आणि मुरूड तालुक्यामध्ये प्रस्तावित असलेल्या औषध निर्माण प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्यात येणार आहे. हा भाग आता सिडकाेच्या अखत्यारीत येत आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या जमिनी सिडकाेच्या नियमानुसारच खरेदी कराव्यात, अशी मागणी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना केली.

रोहा तालुक्यातील सात आणि मुरूड तालुक्यातील १३ गावांमध्ये औषध निर्माण प्रकल्प विकसित करण्यासाठी राज्य सरकारने अधिसूचना काढली आहे. आम्हाला विकास हवा आहे, पण स्थानिकांना भकास करणारा विकास काय कामाचा? असा सवाल आमदार पाटील यांनी व्यक्त केला. आपला कुठल्याही विकासाला विरोध नाही. पण स्थानिकांना देशोधडीला लावणारा विकास होणार असेल तर मात्र संघर्ष करावाच लागेल.

फडणवीस सरकारच्या काळात जेव्हा सर्वप्रथम हा प्रस्ताव विधान परिषदेत आला त्या वेळेसदेखील मी सांगितले की, सिडकोला विरोध नाही. पण सिडकोने यापूर्वी ज्या नियमांच्या आधारे जमिनी अधिग्रहित केल्या आहेत त्याच नियमांच्या आधारे रोहा, मुरूड तालुक्यातील जमिनी अधिग्रहित करा. तसे झाल्यास शेतकऱ्यांना साडेबावीस टक्के विकसित भूखंड मिळू शकेल. मागील दोन-तीन वर्षांत मातीमोल किमतीने येथील जमिनी खरेदी करण्यात आल्या आहेत. 

गोरगरीब शेतकऱ्यांची दिशाभूल करून या जमिनी खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ज्यांनी जमिनी घेतल्या आहेत ते आता चढ्या दराने जमिनी विकणार आहेत. त्यामुळे त्यातील ५० टक्के हिस्सा हा शेतकऱ्यांना द्या, तसेच ज्यांनी जमिनी खरेदी केल्या आहेत त्यांचे आर्थिक स्रोत तपासले पाहिजेत, अशी मागणीही आमदार पाटील यांनी केली.

जमिनी अधिग्रहित करण्यात येतील तेव्हा सदर जमिनीच्या मूळ मालकाला पन्नास टक्के मोबदला दिलाच पाहिजे ही सर्वप्रथम मागणी असणार आहे. या विभागात अनेक जमिनींचे खोटे व्यवहार झाले आहेत त्यांची देखील चौकशी करण्यात यावी. कुशल-अकुशल मनुष्यबळ स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हावे यासाठी सरकारने प्रशिक्षण संस्था उभारून येथील युवकांना मोफत प्रशिक्षण द्यावे. वाढीव गावठाण, वाढीव एफएसआय, रोजगार, प्रदूषण, जमिनीचा मोबदला यापैकी कुठल्याही विषयावर चर्चा न करता, येथील जनतेला विश्वासात न घेता प्रकल्प लादला जाणार असेल तर हे स्थानिकांना फसविण्याचे सरकारचे षड्यंत्र आहे. आपल्या हक्काचा लाभ मिळविण्यासाठी सर्वांनी एकत्र या, असे आवाहनदेखील आमदार पाटील  यांनी केले.

टॅग्स :Raigadरायगड