शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
2
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
3
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
4
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
5
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
6
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
7
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
8
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
9
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
10
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
11
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
12
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
13
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
14
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
15
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
16
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात
17
Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य
18
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
19
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
20
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?

रायगड जिल्ह्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2019 11:55 PM

नागरिकांची मोठ्या संख्येने हजेरी : पोलीस परेड मैदानावर पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

अलिबाग : आगरी, कोळी, आदिवासी समाज यांनी येथील सांस्कृतिक परंपरा आणि वैशिष्ट्य टिकवून ठेवले आहे. विविध जाती-धर्माचे नागरिक येथे सलोख्याने आणि शांततामय वातावरणात राहतात. हेच रायगड जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे, असे प्रतिपादन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. चव्हाण यांनी या वेळी जागतिक कामगार दिनाच्या कामगारवर्गाला शुभेच्छाही दिल्या.महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी सकाळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पोलीस परेड मैदान येथे ध्वजारोहण करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला आणि महाराष्ट्राचा मानबिंदू असलेला रायगड किल्ला याच जिल्ह्यात आहे. केवळ गड-किल्ले नाही, तर या जिल्ह्याला निसर्गाने मुक्तहस्ताने वरदान दिले आहे. येथील विस्तीर्ण समुद्रकिनारे, बहरलेली जंगले, नयनरम्य धबधबे, थंड हवेची ठिकाणे, प्राचीन धार्मिक स्थळे, यामुळे ही भूमी खऱ्या अर्थाने कोकणचीच राजधानी म्हटले तर वावगे ठरणार नसल्याचे त्यांनी सांगितले. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे केलेला चवदार तळ्याचा ऐतिहासिक लढा म्हणजे या भूमीतून झालेली सामाजिक न्यायाची अभूतपूर्व क्रांती होती. कान्होजी आंग्रे, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, महान विचारवंत विनोबा भावे, सी.डी. देशमुख यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे, असेही ते म्हणाले. ध्वजारोहणानंतर चव्हाण यांनी ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्यसैनिक, विद्यार्थी, कर्मचारी यांची भेट घेतली.

जिल्हाधिकारी कार्यालयातही ध्वजारोहणतत्पूर्वी सकाळी ७ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथेदेखील जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी भरत शितोळे, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :RaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्र