शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

रायगड जिल्ह्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 23:56 IST

नागरिकांची मोठ्या संख्येने हजेरी : पोलीस परेड मैदानावर पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

अलिबाग : आगरी, कोळी, आदिवासी समाज यांनी येथील सांस्कृतिक परंपरा आणि वैशिष्ट्य टिकवून ठेवले आहे. विविध जाती-धर्माचे नागरिक येथे सलोख्याने आणि शांततामय वातावरणात राहतात. हेच रायगड जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे, असे प्रतिपादन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. चव्हाण यांनी या वेळी जागतिक कामगार दिनाच्या कामगारवर्गाला शुभेच्छाही दिल्या.महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी सकाळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पोलीस परेड मैदान येथे ध्वजारोहण करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला आणि महाराष्ट्राचा मानबिंदू असलेला रायगड किल्ला याच जिल्ह्यात आहे. केवळ गड-किल्ले नाही, तर या जिल्ह्याला निसर्गाने मुक्तहस्ताने वरदान दिले आहे. येथील विस्तीर्ण समुद्रकिनारे, बहरलेली जंगले, नयनरम्य धबधबे, थंड हवेची ठिकाणे, प्राचीन धार्मिक स्थळे, यामुळे ही भूमी खऱ्या अर्थाने कोकणचीच राजधानी म्हटले तर वावगे ठरणार नसल्याचे त्यांनी सांगितले. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे केलेला चवदार तळ्याचा ऐतिहासिक लढा म्हणजे या भूमीतून झालेली सामाजिक न्यायाची अभूतपूर्व क्रांती होती. कान्होजी आंग्रे, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, महान विचारवंत विनोबा भावे, सी.डी. देशमुख यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली आहे, असेही ते म्हणाले. ध्वजारोहणानंतर चव्हाण यांनी ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्यसैनिक, विद्यार्थी, कर्मचारी यांची भेट घेतली.

जिल्हाधिकारी कार्यालयातही ध्वजारोहणतत्पूर्वी सकाळी ७ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथेदेखील जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी भरत शितोळे, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :RaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्र