शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

समुद्राला उधाण आल्याने खारबंदिस्ती फुटून नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 23:07 IST

चार गावांना फटका : शेकडो एकर शेतजमीन नापिकी होण्याची भीती

उरण : समुद्राच्या उधाणात खोपटे गावाजवळ खारबंदिस्ती फुटून खारे पाणी शेतजमिनीत शिरल्यामुळे शेकडो एकर शेतजमीन नापिकी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. लवकरात लवकर ही खारबंदिस्ती दुरुस्त केली नाही तर आणखी शेतजमीन नापिकी होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

उरण तालुक्याला मोठा समुद्रकिनारा आहे. समुद्राचे पाणी शेतीमध्ये शिरू नये यासाठी मोठमोठे बांध बांधले आहेत. त्याची काळजी घेणे ही खारभूमी विकास मंडळाची आहे. मात्र अनेक ठिकाणी खारबंदिस्तीची कामे अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाची झाल्यामुळे उरण पूर्व भागात अनेक ठिकाणी खाडीची बांधबंदिस्ती फुटून शेतजमिनीत पाणी शिरते. खोपटे परिसरात ज्या ठिकाणी खारबंदिस्ती फुटली आहे त्या ठिकाणची खारबंदिस्तीची कामे कित्येक वर्षे झाली नसल्यामुळे खाडीचा बांध कमकुवत झाला आहे. या ठिकाणी पूर्वी मिठागरे होती. त्या वेळी नियमितपणे खारबंदिस्तीची दुरुस्ती त्यांच्याकडून करण्यात येत होती. मात्र सध्या या ठिकाणची मिठागरे बंद झाल्यामुळे खारबंदिस्तीची दुरुस्ती केली जात नाही. ही खारबंदिस्ती दुरुस्त करण्याची जबाबदारी खारभूमी विकास विभागाची आहे. खारभूमी विकास योजनेमध्ये समुद्रकिनारी किंवा खाडीकिनारी उच्चतम भरतीच्या पातळीवर मातीचा बांध घालून भरतीचे पाणी उथळ जमिनीवर पसरणार नाही, याची काळजी घेतली जाते. त्यामुळे समुद्राच्या पाण्यापासून संरक्षण होते.

मात्र गेल्या कित्येक वर्षांत उरणच्या खारबंदिस्तीची दुरुस्ती केली नसल्यामुळे कमकुवत झालेली खारबंदिस्ती फुटून खारे पाणी शेतजमिनीत शिरून शेतजमीन नापीक होते. एकदा खारे पाणी शेतीत गेल्यास कमीत कमी चार वर्षे त्या शेतीत भातपीक उगवत नाही. दोन वर्षांपूर्वी पुनाडे-केळवणेची खारबंदिस्ती फुटून हजारो एकर शेतजमीन नापिकी झाली आहे. या शेतीमध्ये अद्यापपर्यंत पीक उगवत नाही. खोपटे गावाची शेतीही नापिकी होण्याचा धोका आहे. त्यातच होळीला भरती येत असल्याने ही बंदिस्ती फुटण्याचा धोका असतो. सध्या हे पाणी शेता-शेतातून खोपटे गावापर्यंत पोहोचले आहे. लवकरात लवकर ही बंदिस्ती दुरुस्त केली नाही तर गोवठणे, कोप्रोली, आवरेतील नापीक होण्याची शक्यता आहे.