शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

वादळाचे थैमान, जिल्ह्यात १४८० हेक्टरवरील भात पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 03:48 IST

चक्रिवादळाचा ३,१९६ शेतकऱ्यांना फटका : अलिबागमध्ये ३ घरे पूर्ण, १०८८ घरे अंशत: कोसळली

अलिबाग : चक्रिवादळासह झालेल्या अतिवृष्टीचा सर्वाधिक तडाखा अलिबाग व पेण तालुक्यास बसला आहे. महसूल व कृषी विभागाकडून होत असलेल्या नुकसानभरपाईच्या पंचनाम्यांवरून हे दिसून येत आहे. पंचनाम्यांकरिता तलाठी व कृषी निरीक्षक यांची विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. पेण तालुक्यात शनिवारी झालेल्या सरकारी पंचनाम्यांनुसार १४४ गावांतील तीन हजार १९६ शेतकºयांची एक हजार ४८० हेक्टर क्षेत्रातील भातशेती चक्रिवादळात उद्ध्वस्त झाली आहे, तर ४१ गावांतील एक हजार १४४ घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अलिबाग तालुक्यात तीन घरे पूर्णपणे कोसळली आहेत, तर १, ०८८ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. सारळ महसूल मंडळात सर्वाधिक ३८१ घरांचे, तर किहिम महसूल मंडळात ३०६ घरांचे नुकसान झाले असून, या पैकी दोन घरे पूर्णपणे कोसळली आहेत. उर्वरित महसूल मंडळात अलिबागमध्ये एक घर पूर्णपणे कोसळले, तर १२७ घरांचे अंशत: नुकसान झाले, चरी मध्ये १८३, चौलमध्ये ७९, पोयनाडमध्ये ११, तर रामराजमध्ये ११ घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अलिबाग तालुक्यात भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, कृषी विभागाकडून महसूल विभागास अद्याप पंचनामे प्राप्त झाले नसल्याने नेमक्या किती हेक्टरातील किती शेतकºयांचे नुकसान झाले, याची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.आपत्ती निवारणात तरुणाईची आघाडी१अलिबाग : चक्रिवादळाच्या तडाख्याने निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत ग्रामस्थ आणि नागरिकांच्या मदतीकरिता गावागावांतील तरुणाईने पुढाकार घेतला आहे. गुरुवारी चक्रिवादळामुळे वीज वितरण कंपनीचे अलिबाग तालुक्यात ९० तर पेण तालुक्यात २५० वीज खांब जमीनदोस्त झाले होते.२शुक्रवारी हे सर्व वीज खांब पुन्हा उभे करून वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्याचे मोठे आव्हान वितरण कंपनीचे अभियंते, कर्मचारी आणि कंत्राटदार यांच्या समोर होते. गुरुवारी रात्रभर अंधारात राहिलेल्या अलिबाग व पेणवासीयांचा संभाव्य रोष आणि अपुरे मनुष्यबळ या पार्श्वभूमीवर हे सर्व काम कसे होणार, अशी चिंता वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांना असतानाच सर्वच ठिकाणी तरुण मंडळी स्वेच्छेने सहकार्य करण्यास पुढे आली, त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा सुरळीत झाला.३अलिबाग जवळच्या पवेळे गावात मुख्य विद्युत वाहिनीवर पडलेली झाडे तोडल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत सुरू करता येणार नाही आणि त्याकरिता वितरण कंपनीकडे मनुष्यबळ उपलब्ध नव्हते, त्यामुळे परिसरात वीजपुरवठा पूर्ववत होण्याकरिता तीन दिवस जातील, अशी परिस्थिती होती.रोह्यात घर कोसळल्याने सहा जण किरकोळ जखमीच्रोहा तालुक्यात तलाठी सजा खांब मधील मौजे वैजनाथ व खांब येथे रविवारी परतीच्या पावसामुळे घरांचे नुकसान झाले. मात्रकुठलीही जीवितहानी झालेली नाहीच्तळा येथे वादळी पाऊसामुळे तीन घरांचे पत्रे व कौल उडाली. माणगाव तालुक्यातील निजामपूर बोरवाडी रस्त्यावर वादळामुळे झाडे कोसळली, जेसीबीद्वारे झाडे हटविण्यात येत आहेत.च्रोहा तालुक्यात किल्ला गावात घर कोसळून सहा जणांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर खाजगी रु ग्णालयात उपचार सुरू आहे.च्पवेळे गावातील भरत मानकोले, प्रशांत वारीक, संकेत पाटील, शुभम मानकोले, प्रतीक पाटील, प्रसाद मानकोले, अनिल नेमण, विकास मानकोले, विनिकेत मानकोले, हर्षल बिहरोलकर, प्रणित मळेकर या ११ तरुणांनी कुºहाडी-कोयते आणून,च्सकाळी १० ते दुपारी २ अशा चार तासांत वीजवाहिनीवर पडलेली मोठी २० ते २२ झाडे तोडली. त्यामुळे वितरण कंपनीच्या लाइनमनला काम करणे सोयीचे झाले आणि दुपारी तीन वाजता पवेळे गाव परिसरातील सर्व घरांत वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाला.

टॅग्स :RaigadरायगडCrop Loanपीक कर्ज