शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
7
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
8
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
9
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
10
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
11
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
12
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
13
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
14
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
15
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
16
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
17
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
19
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
20
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा

वादळाचे थैमान, जिल्ह्यात १४८० हेक्टरवरील भात पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 03:48 IST

चक्रिवादळाचा ३,१९६ शेतकऱ्यांना फटका : अलिबागमध्ये ३ घरे पूर्ण, १०८८ घरे अंशत: कोसळली

अलिबाग : चक्रिवादळासह झालेल्या अतिवृष्टीचा सर्वाधिक तडाखा अलिबाग व पेण तालुक्यास बसला आहे. महसूल व कृषी विभागाकडून होत असलेल्या नुकसानभरपाईच्या पंचनाम्यांवरून हे दिसून येत आहे. पंचनाम्यांकरिता तलाठी व कृषी निरीक्षक यांची विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. पेण तालुक्यात शनिवारी झालेल्या सरकारी पंचनाम्यांनुसार १४४ गावांतील तीन हजार १९६ शेतकºयांची एक हजार ४८० हेक्टर क्षेत्रातील भातशेती चक्रिवादळात उद्ध्वस्त झाली आहे, तर ४१ गावांतील एक हजार १४४ घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अलिबाग तालुक्यात तीन घरे पूर्णपणे कोसळली आहेत, तर १, ०८८ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. सारळ महसूल मंडळात सर्वाधिक ३८१ घरांचे, तर किहिम महसूल मंडळात ३०६ घरांचे नुकसान झाले असून, या पैकी दोन घरे पूर्णपणे कोसळली आहेत. उर्वरित महसूल मंडळात अलिबागमध्ये एक घर पूर्णपणे कोसळले, तर १२७ घरांचे अंशत: नुकसान झाले, चरी मध्ये १८३, चौलमध्ये ७९, पोयनाडमध्ये ११, तर रामराजमध्ये ११ घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अलिबाग तालुक्यात भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, कृषी विभागाकडून महसूल विभागास अद्याप पंचनामे प्राप्त झाले नसल्याने नेमक्या किती हेक्टरातील किती शेतकºयांचे नुकसान झाले, याची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.आपत्ती निवारणात तरुणाईची आघाडी१अलिबाग : चक्रिवादळाच्या तडाख्याने निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत ग्रामस्थ आणि नागरिकांच्या मदतीकरिता गावागावांतील तरुणाईने पुढाकार घेतला आहे. गुरुवारी चक्रिवादळामुळे वीज वितरण कंपनीचे अलिबाग तालुक्यात ९० तर पेण तालुक्यात २५० वीज खांब जमीनदोस्त झाले होते.२शुक्रवारी हे सर्व वीज खांब पुन्हा उभे करून वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्याचे मोठे आव्हान वितरण कंपनीचे अभियंते, कर्मचारी आणि कंत्राटदार यांच्या समोर होते. गुरुवारी रात्रभर अंधारात राहिलेल्या अलिबाग व पेणवासीयांचा संभाव्य रोष आणि अपुरे मनुष्यबळ या पार्श्वभूमीवर हे सर्व काम कसे होणार, अशी चिंता वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांना असतानाच सर्वच ठिकाणी तरुण मंडळी स्वेच्छेने सहकार्य करण्यास पुढे आली, त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा सुरळीत झाला.३अलिबाग जवळच्या पवेळे गावात मुख्य विद्युत वाहिनीवर पडलेली झाडे तोडल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत सुरू करता येणार नाही आणि त्याकरिता वितरण कंपनीकडे मनुष्यबळ उपलब्ध नव्हते, त्यामुळे परिसरात वीजपुरवठा पूर्ववत होण्याकरिता तीन दिवस जातील, अशी परिस्थिती होती.रोह्यात घर कोसळल्याने सहा जण किरकोळ जखमीच्रोहा तालुक्यात तलाठी सजा खांब मधील मौजे वैजनाथ व खांब येथे रविवारी परतीच्या पावसामुळे घरांचे नुकसान झाले. मात्रकुठलीही जीवितहानी झालेली नाहीच्तळा येथे वादळी पाऊसामुळे तीन घरांचे पत्रे व कौल उडाली. माणगाव तालुक्यातील निजामपूर बोरवाडी रस्त्यावर वादळामुळे झाडे कोसळली, जेसीबीद्वारे झाडे हटविण्यात येत आहेत.च्रोहा तालुक्यात किल्ला गावात घर कोसळून सहा जणांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर खाजगी रु ग्णालयात उपचार सुरू आहे.च्पवेळे गावातील भरत मानकोले, प्रशांत वारीक, संकेत पाटील, शुभम मानकोले, प्रतीक पाटील, प्रसाद मानकोले, अनिल नेमण, विकास मानकोले, विनिकेत मानकोले, हर्षल बिहरोलकर, प्रणित मळेकर या ११ तरुणांनी कुºहाडी-कोयते आणून,च्सकाळी १० ते दुपारी २ अशा चार तासांत वीजवाहिनीवर पडलेली मोठी २० ते २२ झाडे तोडली. त्यामुळे वितरण कंपनीच्या लाइनमनला काम करणे सोयीचे झाले आणि दुपारी तीन वाजता पवेळे गाव परिसरातील सर्व घरांत वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाला.

टॅग्स :RaigadरायगडCrop Loanपीक कर्ज