शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

Cyclone Nisarga: ‘निसर्ग’पुढे सारे नमले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 00:03 IST

श्रीवर्धन तालुक्याचा विचार करता येथील लोकांचा उदरनिर्वाह मुख्यत्वे शेती व पर्यटनावर अवलंबून आहे. कोरोना विषाणूंमुळे पर्यटनाला मोठा फटका बसला आहे.

- संतोष सापतेमहाराष्ट्राच्या इतर प्रांतांच्या तुलनेत कोकणाची भौगोलिक परिस्थिती भिन्न आहे. एका ‘निसर्ग’ चक्रीवादळाने अवघ्या सहा तासांत सर्वसामान्यांच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्ने आणि भविष्य यांचा अक्षरश: चुराडा केला. ३ जून २०२० पूर्वीचा व सद्य:स्थितीतील रायगड जिल्हा यात प्रचंड तफावत पडली आहे. ताशी १२० चा वेगवान वारा व जोरदार पाऊस यामुळे नारळ, सुपारी, केळी व आंबा या पिकांना जमीनदोस्त केले.श्रीवर्धन तालुक्याचा विचार करता येथील लोकांचा उदरनिर्वाह मुख्यत्वे शेती व पर्यटनावर अवलंबून आहे. कोरोना विषाणूंमुळे पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. त्यातच, ‘निसर्ग’ चक्रीवादळाने शेतीची अगणित व कधीही भरून न येणारी हानी केली आहे. आज सर्वसामान्य माणसासमोर जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे. पर्यटनवृद्धीसाठी बँकांकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे, ही चिंता त्यांना सतावत आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करत असलेल्या व्यक्तीला प्रतिवर्र्ष नारळ, सुपारी, केळी व फणस याद्वारे साधारणत: ६० हजारांच्या आसपास उत्पन्न मिळते. मात्र, आगामी आठ वर्षांसाठी या उत्पन्नास शेतकरी मुकेल, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.आंब्यासारखे डेरेदार अनेक पिढीचे साक्ष देणारे वृक्ष अस्तित्वासाठी चक्रीवादळात झुंजताना दिसले. आता आंबा दिसेनासा झाला आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अशावेळी त्याला सर्वतोपरी सहकार्य करणे गरजेचे आहे. राज्य सरकारने दिलेले १०० कोटींचे आर्थिक पॅकेज चक्रीवादळग्रस्त लोकांच्या दु:खावर फुंकर घालण्यापर्यंत ठीक आहे. मात्र, त्या मदतीतून वादळग्रस्त लोकांच्या जीवनाला नवीन दिशा व स्फूर्ती देणे प्रथमदर्शनी तरी अशक्य वाटत आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, माणगाव, म्हसळा, मुरूड, अलिबाग या तालुक्यांतील जनतेचे आर्थिक नुकसान झालेले आहे. रायगड प्रशासनाने केलेल्या योग्य आपत्तीपूर्व नियोजनामुळे सुदैवाने मोठ्या स्वरूपातील जीवितहानी टळली. त्याबद्दल, प्रशासनाचे कौतुक करणे योग्य ठरेल.आपत्तीपूर्व श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर, भरडखोल, दिघी व श्रीवर्धन शहरांतील जीवना कोळीवाडा या गावातील लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. मात्र, मोबाइलसेवा, इंटरनेट यास पर्याय शोधण्यास प्रशासकीय यंत्रणा कमी पडली. वादळामुळे महावितरणच्या सर्व वीजखांबांची वाताहत झाली. त्यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यातील सर्व विद्युतपुरवठा अनिश्चित काळासाठी खंडित झाला.श्रीवर्धनमध्ये चक्रीवादळामुळे घरावरची कौले, पत्रे, घराच्या भिंती आणि असंख्य वृक्ष लोकांच्या डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झाले. घरातील अन्नधान्य, कपडे, जीवनावश्यक वस्तू यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. रायगड प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार श्रीवर्धन तालुक्यातील जवळपास ७० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेला वादळाने पूर्णत: जेरीस आणले आहे. सर्वसामान्य लोकांनी शासनाची मदत येण्यापूर्वीच आपल्या घराच्या डागडुजीला सुरुवात केली आहे. त्यात अनेक दुकानदारांनी वाजवी किमतीपेक्षा जास्त दराने मालाची विक्री केली. मात्र, पावसाळा डोक्यावर आला असताना सर्वसामान्य जनतेने मिळेल त्या किमतीत घरबांधणीसाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी केली आहे.श्रीवर्धन शहरात जवळपास २१० सुपारी व नारळाच्या वाड्या होत्या. तालुक्यातील हरिहरेश्वर, दिवेआगार, मारळ, बागमांडला, नागळोली अशा अनेक गावांत नारळ, सुपारीचे पीक घेतले जात होते. आजमितीस हे सारे पीक जमीनदोस्त झाले आहे. त्यात पावसाळा दारात उभा ठाकला असताना या संकटातून कोकणवासीय सावरलेले नाहीत, तेव्हा शेतीचा हंगाम किती यशस्वी होणार, लागवड किती होणार, हा मोठा प्रश्न आहे.पारंपरिक पद्धतीने शेती करणाºया येथील शेतकऱ्यांना योग्य भाव व सवलतीत बियाणे व साहित्य आगामी कालावधीसाठी देणे गरजेचे आहे. कोकणातील शेती ही हेक्टरात नसून गुंठ्यांत आहे. एका सातबाºयावर चारचार व्यक्तींची नावे आहेत. सरकारने मदत करताना किंवा सवलत देताना या बाबींचा विचार होणे आवश्यक आहे.कोळी समाजाची अवस्था बिकटरायगड जिल्ह्यात कोळी समाज मोठ्या संख्येने आहे. चक्रीवादळात अनेकांच्या बोटी फुटल्या, नष्ट झाल्या. सरकारने कोळी समाजाच्या बिघडलेल्या आर्थिक स्थितीसाठी अभ्यासपूर्ण व निर्णायक भूमिका घेणे आवश्यक आहे.