शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

Cyclone Nisarga: ‘निसर्ग’पुढे सारे नमले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 00:03 IST

श्रीवर्धन तालुक्याचा विचार करता येथील लोकांचा उदरनिर्वाह मुख्यत्वे शेती व पर्यटनावर अवलंबून आहे. कोरोना विषाणूंमुळे पर्यटनाला मोठा फटका बसला आहे.

- संतोष सापतेमहाराष्ट्राच्या इतर प्रांतांच्या तुलनेत कोकणाची भौगोलिक परिस्थिती भिन्न आहे. एका ‘निसर्ग’ चक्रीवादळाने अवघ्या सहा तासांत सर्वसामान्यांच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्ने आणि भविष्य यांचा अक्षरश: चुराडा केला. ३ जून २०२० पूर्वीचा व सद्य:स्थितीतील रायगड जिल्हा यात प्रचंड तफावत पडली आहे. ताशी १२० चा वेगवान वारा व जोरदार पाऊस यामुळे नारळ, सुपारी, केळी व आंबा या पिकांना जमीनदोस्त केले.श्रीवर्धन तालुक्याचा विचार करता येथील लोकांचा उदरनिर्वाह मुख्यत्वे शेती व पर्यटनावर अवलंबून आहे. कोरोना विषाणूंमुळे पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. त्यातच, ‘निसर्ग’ चक्रीवादळाने शेतीची अगणित व कधीही भरून न येणारी हानी केली आहे. आज सर्वसामान्य माणसासमोर जीविताचा प्रश्न निर्माण झाला आहे. पर्यटनवृद्धीसाठी बँकांकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे, ही चिंता त्यांना सतावत आहे. पारंपरिक पद्धतीने शेती करत असलेल्या व्यक्तीला प्रतिवर्र्ष नारळ, सुपारी, केळी व फणस याद्वारे साधारणत: ६० हजारांच्या आसपास उत्पन्न मिळते. मात्र, आगामी आठ वर्षांसाठी या उत्पन्नास शेतकरी मुकेल, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.आंब्यासारखे डेरेदार अनेक पिढीचे साक्ष देणारे वृक्ष अस्तित्वासाठी चक्रीवादळात झुंजताना दिसले. आता आंबा दिसेनासा झाला आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अशावेळी त्याला सर्वतोपरी सहकार्य करणे गरजेचे आहे. राज्य सरकारने दिलेले १०० कोटींचे आर्थिक पॅकेज चक्रीवादळग्रस्त लोकांच्या दु:खावर फुंकर घालण्यापर्यंत ठीक आहे. मात्र, त्या मदतीतून वादळग्रस्त लोकांच्या जीवनाला नवीन दिशा व स्फूर्ती देणे प्रथमदर्शनी तरी अशक्य वाटत आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, माणगाव, म्हसळा, मुरूड, अलिबाग या तालुक्यांतील जनतेचे आर्थिक नुकसान झालेले आहे. रायगड प्रशासनाने केलेल्या योग्य आपत्तीपूर्व नियोजनामुळे सुदैवाने मोठ्या स्वरूपातील जीवितहानी टळली. त्याबद्दल, प्रशासनाचे कौतुक करणे योग्य ठरेल.आपत्तीपूर्व श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर, भरडखोल, दिघी व श्रीवर्धन शहरांतील जीवना कोळीवाडा या गावातील लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. मात्र, मोबाइलसेवा, इंटरनेट यास पर्याय शोधण्यास प्रशासकीय यंत्रणा कमी पडली. वादळामुळे महावितरणच्या सर्व वीजखांबांची वाताहत झाली. त्यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यातील सर्व विद्युतपुरवठा अनिश्चित काळासाठी खंडित झाला.श्रीवर्धनमध्ये चक्रीवादळामुळे घरावरची कौले, पत्रे, घराच्या भिंती आणि असंख्य वृक्ष लोकांच्या डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झाले. घरातील अन्नधान्य, कपडे, जीवनावश्यक वस्तू यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. रायगड प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार श्रीवर्धन तालुक्यातील जवळपास ७० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेला वादळाने पूर्णत: जेरीस आणले आहे. सर्वसामान्य लोकांनी शासनाची मदत येण्यापूर्वीच आपल्या घराच्या डागडुजीला सुरुवात केली आहे. त्यात अनेक दुकानदारांनी वाजवी किमतीपेक्षा जास्त दराने मालाची विक्री केली. मात्र, पावसाळा डोक्यावर आला असताना सर्वसामान्य जनतेने मिळेल त्या किमतीत घरबांधणीसाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी केली आहे.श्रीवर्धन शहरात जवळपास २१० सुपारी व नारळाच्या वाड्या होत्या. तालुक्यातील हरिहरेश्वर, दिवेआगार, मारळ, बागमांडला, नागळोली अशा अनेक गावांत नारळ, सुपारीचे पीक घेतले जात होते. आजमितीस हे सारे पीक जमीनदोस्त झाले आहे. त्यात पावसाळा दारात उभा ठाकला असताना या संकटातून कोकणवासीय सावरलेले नाहीत, तेव्हा शेतीचा हंगाम किती यशस्वी होणार, लागवड किती होणार, हा मोठा प्रश्न आहे.पारंपरिक पद्धतीने शेती करणाºया येथील शेतकऱ्यांना योग्य भाव व सवलतीत बियाणे व साहित्य आगामी कालावधीसाठी देणे गरजेचे आहे. कोकणातील शेती ही हेक्टरात नसून गुंठ्यांत आहे. एका सातबाºयावर चारचार व्यक्तींची नावे आहेत. सरकारने मदत करताना किंवा सवलत देताना या बाबींचा विचार होणे आवश्यक आहे.कोळी समाजाची अवस्था बिकटरायगड जिल्ह्यात कोळी समाज मोठ्या संख्येने आहे. चक्रीवादळात अनेकांच्या बोटी फुटल्या, नष्ट झाल्या. सरकारने कोळी समाजाच्या बिघडलेल्या आर्थिक स्थितीसाठी अभ्यासपूर्ण व निर्णायक भूमिका घेणे आवश्यक आहे.