शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

गोरेगावातील शेतीचे नुकसान; पीक कुजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 23:04 IST

महसूल, कृषी विभागाने पंचनामे करण्याची मागणी

- गिरीश गोरेगावकर माणगाव : मागील आठवडाभरात झालेल्या प्रचंड पावसामुळे गोरेगाव शहर आणि परिसरातील शेतीला सलग आठ दिवस पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसल्यामुळे भातशेतीसह शेतकरी संकटात सापडला आहे. शेकडो हेक्टर शेतजमिनीवर पाणी तुंबलेले राहिल्याने भाताचे पीक कुजून तसेच करपून गेले आहे, त्यामुळे महसूल तसेच कृषी विभागाने या भागाची तातडीने पाहणी करून ओला दुष्काळाच्या धर्तीवर शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी गोरेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच जुबेर अब्बासी यांनी केली आहे.दक्षिण रायगड या भागाला भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. बहुसंख्य जनता ही पावसाळ्यात शेतीवरती अवलंबून असते. मागील आठवड्यात गोरेगाव विभागात विक्रमी पाऊस झाल्याने शेकडो हेक्टर भात लागवडीची शेती सलग आठ दिवस पुराच्या पाण्याखाली होती. सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने भात लावणी वेळेवरती आटोपली होती तर भातपिकांची रोपेही चांगली झाल्याने शेतकरी सुखावला होता. गोरेगावातील संत रोहिदास नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, हौदाची आळी, टेकडीची आळी, गवळआळी, गोरोबानगर येथील नागरिक आजही शेतीवरतीच आपली उपजीविका करत आहेत. काळनदीला पूर आल्याने आठवडाभर पुराचे पाणी शेतामध्येच राहिले होते. महापुराचा तडाखा बसल्यानंतरही सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, शेतीच्या रूपाने मोठी वित्तहानी झाल्याचे निदर्शनास आले आहे.गोरेगावचे सरपंच जुबेरअब्बासी, उपसरपंच चंद्रकांत गोरेगावकर यांच्यासह ग्रामविकास अधिकारी पोलेकर, विनोद बागडे, सचिन बागडे, सुरज पवार या ग्रामपंचायत सदस्यांसह विजयराज खुळे, मुख्तार वेळासकर, विकास गायकवाड यांनी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शेतीची पाहणी केली असता शेतकऱ्यांनीआपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली. यानंतर महसूल तसेच कृषी विभागाने तातडीने पाहणी करून पंचनामे करावे व शेतकºयांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सरपंच जुबेर अब्बासी यांनी केली आहे.सध्या पूरपरिस्थितीमुळे पाणी दूषित होण्याची शक्यता असते. यामुळे नागरिकांनी पाणी उकळून प्यावे. रस्त्यावर चिखल आणि माती आल्याने अशा ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. जनावरांचे मलमूत्र पाण्यात मिसळून लेप्टो स्पायरोसिससारखे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर व्हायरल फिवर, मलेरिया, डेंग्यू हे आजारही उद्भवू शकतात. ज्यांच्या घरात पाणी शिरले त्यांनी घर स्वच्छ करून घेणे गरजेचे आहे. भाजीपाला, फळभाज्या स्वच्छ धुऊन घेणे गरजेचे आहे. अशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे.- डॉ. दिगंबर गीतेरसायनमिश्रीत पाणी शेतातमहाड भागातील सावित्री आणि गांधारी या दोन नद्यांच्या पुरामुळे रासायनिक पाण्याचा मोठा फटका शेतीला बसला. शेतामध्ये रसायनमिश्रित पाणी शेतात थांबून राहिल्याने रोपे मोठ्या प्रमाणात करपलेली पाहायला मिळत आहेत. पावसाने यंदाचे पीक घालविल्यामुळे वर्षभर जगायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.