शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

गोरेगावातील शेतीचे नुकसान; पीक कुजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 23:04 IST

महसूल, कृषी विभागाने पंचनामे करण्याची मागणी

- गिरीश गोरेगावकर माणगाव : मागील आठवडाभरात झालेल्या प्रचंड पावसामुळे गोरेगाव शहर आणि परिसरातील शेतीला सलग आठ दिवस पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसल्यामुळे भातशेतीसह शेतकरी संकटात सापडला आहे. शेकडो हेक्टर शेतजमिनीवर पाणी तुंबलेले राहिल्याने भाताचे पीक कुजून तसेच करपून गेले आहे, त्यामुळे महसूल तसेच कृषी विभागाने या भागाची तातडीने पाहणी करून ओला दुष्काळाच्या धर्तीवर शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी गोरेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच जुबेर अब्बासी यांनी केली आहे.दक्षिण रायगड या भागाला भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. बहुसंख्य जनता ही पावसाळ्यात शेतीवरती अवलंबून असते. मागील आठवड्यात गोरेगाव विभागात विक्रमी पाऊस झाल्याने शेकडो हेक्टर भात लागवडीची शेती सलग आठ दिवस पुराच्या पाण्याखाली होती. सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने भात लावणी वेळेवरती आटोपली होती तर भातपिकांची रोपेही चांगली झाल्याने शेतकरी सुखावला होता. गोरेगावातील संत रोहिदास नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, हौदाची आळी, टेकडीची आळी, गवळआळी, गोरोबानगर येथील नागरिक आजही शेतीवरतीच आपली उपजीविका करत आहेत. काळनदीला पूर आल्याने आठवडाभर पुराचे पाणी शेतामध्येच राहिले होते. महापुराचा तडाखा बसल्यानंतरही सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, शेतीच्या रूपाने मोठी वित्तहानी झाल्याचे निदर्शनास आले आहे.गोरेगावचे सरपंच जुबेरअब्बासी, उपसरपंच चंद्रकांत गोरेगावकर यांच्यासह ग्रामविकास अधिकारी पोलेकर, विनोद बागडे, सचिन बागडे, सुरज पवार या ग्रामपंचायत सदस्यांसह विजयराज खुळे, मुख्तार वेळासकर, विकास गायकवाड यांनी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शेतीची पाहणी केली असता शेतकऱ्यांनीआपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली. यानंतर महसूल तसेच कृषी विभागाने तातडीने पाहणी करून पंचनामे करावे व शेतकºयांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सरपंच जुबेर अब्बासी यांनी केली आहे.सध्या पूरपरिस्थितीमुळे पाणी दूषित होण्याची शक्यता असते. यामुळे नागरिकांनी पाणी उकळून प्यावे. रस्त्यावर चिखल आणि माती आल्याने अशा ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. जनावरांचे मलमूत्र पाण्यात मिसळून लेप्टो स्पायरोसिससारखे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर व्हायरल फिवर, मलेरिया, डेंग्यू हे आजारही उद्भवू शकतात. ज्यांच्या घरात पाणी शिरले त्यांनी घर स्वच्छ करून घेणे गरजेचे आहे. भाजीपाला, फळभाज्या स्वच्छ धुऊन घेणे गरजेचे आहे. अशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे.- डॉ. दिगंबर गीतेरसायनमिश्रीत पाणी शेतातमहाड भागातील सावित्री आणि गांधारी या दोन नद्यांच्या पुरामुळे रासायनिक पाण्याचा मोठा फटका शेतीला बसला. शेतामध्ये रसायनमिश्रित पाणी शेतात थांबून राहिल्याने रोपे मोठ्या प्रमाणात करपलेली पाहायला मिळत आहेत. पावसाने यंदाचे पीक घालविल्यामुळे वर्षभर जगायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.