शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गोरेगावातील शेतीचे नुकसान; पीक कुजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 23:04 IST

महसूल, कृषी विभागाने पंचनामे करण्याची मागणी

- गिरीश गोरेगावकर माणगाव : मागील आठवडाभरात झालेल्या प्रचंड पावसामुळे गोरेगाव शहर आणि परिसरातील शेतीला सलग आठ दिवस पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसल्यामुळे भातशेतीसह शेतकरी संकटात सापडला आहे. शेकडो हेक्टर शेतजमिनीवर पाणी तुंबलेले राहिल्याने भाताचे पीक कुजून तसेच करपून गेले आहे, त्यामुळे महसूल तसेच कृषी विभागाने या भागाची तातडीने पाहणी करून ओला दुष्काळाच्या धर्तीवर शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी गोरेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच जुबेर अब्बासी यांनी केली आहे.दक्षिण रायगड या भागाला भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. बहुसंख्य जनता ही पावसाळ्यात शेतीवरती अवलंबून असते. मागील आठवड्यात गोरेगाव विभागात विक्रमी पाऊस झाल्याने शेकडो हेक्टर भात लागवडीची शेती सलग आठ दिवस पुराच्या पाण्याखाली होती. सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने भात लावणी वेळेवरती आटोपली होती तर भातपिकांची रोपेही चांगली झाल्याने शेतकरी सुखावला होता. गोरेगावातील संत रोहिदास नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, हौदाची आळी, टेकडीची आळी, गवळआळी, गोरोबानगर येथील नागरिक आजही शेतीवरतीच आपली उपजीविका करत आहेत. काळनदीला पूर आल्याने आठवडाभर पुराचे पाणी शेतामध्येच राहिले होते. महापुराचा तडाखा बसल्यानंतरही सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, शेतीच्या रूपाने मोठी वित्तहानी झाल्याचे निदर्शनास आले आहे.गोरेगावचे सरपंच जुबेरअब्बासी, उपसरपंच चंद्रकांत गोरेगावकर यांच्यासह ग्रामविकास अधिकारी पोलेकर, विनोद बागडे, सचिन बागडे, सुरज पवार या ग्रामपंचायत सदस्यांसह विजयराज खुळे, मुख्तार वेळासकर, विकास गायकवाड यांनी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शेतीची पाहणी केली असता शेतकऱ्यांनीआपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली. यानंतर महसूल तसेच कृषी विभागाने तातडीने पाहणी करून पंचनामे करावे व शेतकºयांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सरपंच जुबेर अब्बासी यांनी केली आहे.सध्या पूरपरिस्थितीमुळे पाणी दूषित होण्याची शक्यता असते. यामुळे नागरिकांनी पाणी उकळून प्यावे. रस्त्यावर चिखल आणि माती आल्याने अशा ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. जनावरांचे मलमूत्र पाण्यात मिसळून लेप्टो स्पायरोसिससारखे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर व्हायरल फिवर, मलेरिया, डेंग्यू हे आजारही उद्भवू शकतात. ज्यांच्या घरात पाणी शिरले त्यांनी घर स्वच्छ करून घेणे गरजेचे आहे. भाजीपाला, फळभाज्या स्वच्छ धुऊन घेणे गरजेचे आहे. अशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे.- डॉ. दिगंबर गीतेरसायनमिश्रीत पाणी शेतातमहाड भागातील सावित्री आणि गांधारी या दोन नद्यांच्या पुरामुळे रासायनिक पाण्याचा मोठा फटका शेतीला बसला. शेतामध्ये रसायनमिश्रित पाणी शेतात थांबून राहिल्याने रोपे मोठ्या प्रमाणात करपलेली पाहायला मिळत आहेत. पावसाने यंदाचे पीक घालविल्यामुळे वर्षभर जगायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.