शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अधिक काळ प्रशासक असणे हे लोकशाहीला घातक: खासदार सुनील तटकरे

By राजेश भोस्तेकर | Updated: January 20, 2023 20:23 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नव्या सत्तांतरानंतर रखडल्या असून वर्ष भरापासून प्रशासकाच्या हातात चाव्या आहेत.

अलिबाग :

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नव्या सत्तांतरानंतर रखडल्या असून वर्ष भरापासून प्रशासकाच्या हातात चाव्या आहेत. मात्र सध्या प्रशासक स्तरावर सुरू असलेले काम कशा पद्धतीने सुरू आहे हे सर्वज्ञात आहे. त्यामुळे निवडणुका म घेता जनतेच्या विकासाच्या चाव्या प्रशासनाच्या हातात ठेवणे हे लोकशाहीला घातक आणि घटनेच्या विरोधात असल्याचे मत रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले आहे. 

खा. सुनिल तटकरे यांनी शुक्रवारी अलिबाग येेथे राष्ट्रवादी काँग्रेस भवन कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शासनाच्या कार्यपद्धतीवर त्यांनी निशाना साधला. महा विकास आघाडी काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका बाबत सर्व प्रक्रिया पूर्ण केली होती. फक्त निवडणुका जाहीर करणे राहिले होते. मात्र राज्यात सत्तांतर झाले आणि आघाडी सरकारने घेतलेले निर्णय नव्या सरकारने बदलले. त्यामुळे गेल्या वर्षभर मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासकाच्या हातात आहेत. प्रशासक हे सहा महिन्यांसाठी योग्य आहे. मात्र अधिक काळ प्रशासक ठेवणे हे लोकशाहीस मारक असल्याचे खासदार तटकरे यांनी मत व्यक्त केले आहे.

 पंतप्रधान सडक योजनेच्या कामांची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. गेल्या तिन वर्षांत जिल्ह्यातील या योजनेतील सर्व कामे थांबवण्यात आली होती. ही काम मंजूर करण्यासाठी राज्यातील ३५ खासदारांनी केंद्रीय मंत्री निरंजनादेवी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ही कामे मंजूर करवून घेतल्याचे सांगितले. यावेळी ग्रामविकास राज्य मंत्री कपील पाटील हेदेखील उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील अलिबागसह ११ तालुक्यांत पंतप्रधान सडक योजनेतील ६१ किलोमिटरचे रस्ते मंजूर झाले आहेत. यासाठी ४८ कोटी ६२ लाख रुपये मंजूर झाले असल्याचे खा. तटकरे यांनी सांगितले. हि कामे खांसदारांनी केलेल्या शिफारीसीनंतर मंजूर करण्यात आली आहेत. १ फेब्रुवारीला केंद्राचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पुन्हा उर्वरीत कामांची मांगणी करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.