शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

पावसाच्या दीर्घ विश्रांतीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली; बळीराजा संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 23:42 IST

कर्जत तालुक्यात सरासरी के वळ ३० टक्के नोंद; मुख्य महिना कोरडा

कर्जत : पावसाची खºया अर्थाने बॅटिंग सुरू झालेली नाही आणि त्यामुळे कर्जत तालुक्यातील शेतकरी हताश होऊन बसला आहे. जून महिन्यात सरासरी पाऊस पडला नसल्याने, त्यावेळी भाताची रोपे सुकून गेली होती आणि आता हातात असलेल्या रोपांची लावणी शेतकऱ्यांनी केली आहे, पण पाऊस नाही. श्रावण महिन्यापर्यंत लावणी लांबणे ही अनेक वर्षांनंतर आलेली वेळ आहे. यामुळे या वर्षी पुन्हा एकदा दुष्काळी स्थिती बनली असून, तालुक्यात पावसाचा दीड महिना संपायला आला आणि मुख्य महिना कोरडा जात असल्याने, पावसाची सरासरी केवळ ३० टक्के इतकीच असल्याने बळीराजा संकटात आला आहे.

२१ जुलैपर्यंत कर्जत तालुक्यात अवघा ९९३ मिली इतका पाऊस झाला आहे. त्या पावसाची वार्षिक सरासरी ३० टक्के इतकी असून, पावसाळा सुरू झाल्यानंतर दरवर्षी जुलै महिना हा भरपूर पाऊस आणि त्यात महापूर अशी स्थिती या महिन्यात असते. मात्र, यंदा कर्जत तालुक्यात अद्याप महापूर आला नाही की, नद्या दुथडी वाहून गेल्या नाहीत. दुसरीकडे गतवर्षी या काळात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता आणि या वर्षीप्रमाणे गतवर्षीही जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली होती. मात्र आता कडक ऊन पडलेले दिसत असून, जुलै महिन्यात दोन आठवडे पाऊस सुरू होता. मात्र, त्यातून नद्या दुथडी भरून वाहिल्या नाहीत. त्यानंतर, पावसाने घेतलेली विश्रांती चिंता वाढविणारी आहे.

यंदा पावसाने फारच निराशा केली आहे. लावणी पूर्ण करण्याकरिता खूप मेहनत घ्यावी लागली. आधीच भातशेतीचा व्यवसाय म्हणजे आतबट्ट्याचा व्यवसाय. त्यातच कोरोनाचे संकट. पावसाची स्थिती अशीच राहिली तर शेतकºयांची स्थिती फारच बिकट होईल. - रवींद्र मांडे, शेतकरी, दहीगाव, कर्जत

टॅग्स :Farmerशेतकरी