शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

पावसाच्या दीर्घ विश्रांतीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली; बळीराजा संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 23:42 IST

कर्जत तालुक्यात सरासरी के वळ ३० टक्के नोंद; मुख्य महिना कोरडा

कर्जत : पावसाची खºया अर्थाने बॅटिंग सुरू झालेली नाही आणि त्यामुळे कर्जत तालुक्यातील शेतकरी हताश होऊन बसला आहे. जून महिन्यात सरासरी पाऊस पडला नसल्याने, त्यावेळी भाताची रोपे सुकून गेली होती आणि आता हातात असलेल्या रोपांची लावणी शेतकऱ्यांनी केली आहे, पण पाऊस नाही. श्रावण महिन्यापर्यंत लावणी लांबणे ही अनेक वर्षांनंतर आलेली वेळ आहे. यामुळे या वर्षी पुन्हा एकदा दुष्काळी स्थिती बनली असून, तालुक्यात पावसाचा दीड महिना संपायला आला आणि मुख्य महिना कोरडा जात असल्याने, पावसाची सरासरी केवळ ३० टक्के इतकीच असल्याने बळीराजा संकटात आला आहे.

२१ जुलैपर्यंत कर्जत तालुक्यात अवघा ९९३ मिली इतका पाऊस झाला आहे. त्या पावसाची वार्षिक सरासरी ३० टक्के इतकी असून, पावसाळा सुरू झाल्यानंतर दरवर्षी जुलै महिना हा भरपूर पाऊस आणि त्यात महापूर अशी स्थिती या महिन्यात असते. मात्र, यंदा कर्जत तालुक्यात अद्याप महापूर आला नाही की, नद्या दुथडी वाहून गेल्या नाहीत. दुसरीकडे गतवर्षी या काळात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता आणि या वर्षीप्रमाणे गतवर्षीही जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली होती. मात्र आता कडक ऊन पडलेले दिसत असून, जुलै महिन्यात दोन आठवडे पाऊस सुरू होता. मात्र, त्यातून नद्या दुथडी भरून वाहिल्या नाहीत. त्यानंतर, पावसाने घेतलेली विश्रांती चिंता वाढविणारी आहे.

यंदा पावसाने फारच निराशा केली आहे. लावणी पूर्ण करण्याकरिता खूप मेहनत घ्यावी लागली. आधीच भातशेतीचा व्यवसाय म्हणजे आतबट्ट्याचा व्यवसाय. त्यातच कोरोनाचे संकट. पावसाची स्थिती अशीच राहिली तर शेतकºयांची स्थिती फारच बिकट होईल. - रवींद्र मांडे, शेतकरी, दहीगाव, कर्जत

टॅग्स :Farmerशेतकरी