शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या दीर्घ विश्रांतीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली; बळीराजा संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 23:42 IST

कर्जत तालुक्यात सरासरी के वळ ३० टक्के नोंद; मुख्य महिना कोरडा

कर्जत : पावसाची खºया अर्थाने बॅटिंग सुरू झालेली नाही आणि त्यामुळे कर्जत तालुक्यातील शेतकरी हताश होऊन बसला आहे. जून महिन्यात सरासरी पाऊस पडला नसल्याने, त्यावेळी भाताची रोपे सुकून गेली होती आणि आता हातात असलेल्या रोपांची लावणी शेतकऱ्यांनी केली आहे, पण पाऊस नाही. श्रावण महिन्यापर्यंत लावणी लांबणे ही अनेक वर्षांनंतर आलेली वेळ आहे. यामुळे या वर्षी पुन्हा एकदा दुष्काळी स्थिती बनली असून, तालुक्यात पावसाचा दीड महिना संपायला आला आणि मुख्य महिना कोरडा जात असल्याने, पावसाची सरासरी केवळ ३० टक्के इतकीच असल्याने बळीराजा संकटात आला आहे.

२१ जुलैपर्यंत कर्जत तालुक्यात अवघा ९९३ मिली इतका पाऊस झाला आहे. त्या पावसाची वार्षिक सरासरी ३० टक्के इतकी असून, पावसाळा सुरू झाल्यानंतर दरवर्षी जुलै महिना हा भरपूर पाऊस आणि त्यात महापूर अशी स्थिती या महिन्यात असते. मात्र, यंदा कर्जत तालुक्यात अद्याप महापूर आला नाही की, नद्या दुथडी वाहून गेल्या नाहीत. दुसरीकडे गतवर्षी या काळात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता आणि या वर्षीप्रमाणे गतवर्षीही जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली होती. मात्र आता कडक ऊन पडलेले दिसत असून, जुलै महिन्यात दोन आठवडे पाऊस सुरू होता. मात्र, त्यातून नद्या दुथडी भरून वाहिल्या नाहीत. त्यानंतर, पावसाने घेतलेली विश्रांती चिंता वाढविणारी आहे.

यंदा पावसाने फारच निराशा केली आहे. लावणी पूर्ण करण्याकरिता खूप मेहनत घ्यावी लागली. आधीच भातशेतीचा व्यवसाय म्हणजे आतबट्ट्याचा व्यवसाय. त्यातच कोरोनाचे संकट. पावसाची स्थिती अशीच राहिली तर शेतकºयांची स्थिती फारच बिकट होईल. - रवींद्र मांडे, शेतकरी, दहीगाव, कर्जत

टॅग्स :Farmerशेतकरी