शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

रायगड जिल्ह्यात दोन दिवस आधीच उठवला लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 03:21 IST

रुग्णांत घट नाही । पुनश्च हरिओमचे निर्बंध लागू; पहिल्या दिवशी तुरळक दुकानेच सुरू

आविष्कार देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्करायगड : लॉकडाऊननंतरही रुग्णसंख्येत घट होत नसल्याने रायगडातील लॉकडाऊन दोन दिवस आधीच उठवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी घेतला आहे. शुक्रवारी रात्री १२ वाजल्यापासून लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय अंमलात आला आहे. मात्र, यापुढे पुनश्च हरिओम २ अगेन अंतर्गत लागू असलेल नियम लागू राहणार आहेत, असे चौधरी यांनी आदेशात म्हटले आहे.जिल्ह्यात १५ जुलैपासून लॉकडाऊन करत असल्याची घोषणा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केली होती. या लॉकाडाऊनला काही नागरिकांनी विरोध केला होता, तसेच लॉकडाऊन उठवण्याबाबत व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना निवेदनही दिले होते. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी चौधरी यांनी दोन वेळा थोडी शिथिलता देत लॉकडाऊन सुरू ठेवले होते. मात्र, शेवटी दोन दिवस आधीच त्यांनी लॉकडाऊन उठवला आहे. २४ जुलैच्या रात्रीच असे आदेश काढण्यात आल्याने व्यापारी, व्यावसायिक, तसेच नागरिकांना माहिती मिळाली नाही. त्यामुळे बाजारपेठांमध्ये व्यवहाराला विशेष गती आल्याचे दिसून आले नाही. अचानक लॉकडाऊन उठवल्याने काही नागरिकांनी नाराजीही व्यक्त केली.लॉकडाऊन केल्यानंतरही जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये घट झालेली नाही. त्यामुळे शुक्रवारी रात्री १२ वाजल्यापासून लॉकडाऊन उठवण्यात आल्याने सर्व व्यवहार सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस