शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

रायगड जिल्ह्यात दोन दिवस आधीच उठवला लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 03:21 IST

रुग्णांत घट नाही । पुनश्च हरिओमचे निर्बंध लागू; पहिल्या दिवशी तुरळक दुकानेच सुरू

आविष्कार देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्करायगड : लॉकडाऊननंतरही रुग्णसंख्येत घट होत नसल्याने रायगडातील लॉकडाऊन दोन दिवस आधीच उठवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी घेतला आहे. शुक्रवारी रात्री १२ वाजल्यापासून लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय अंमलात आला आहे. मात्र, यापुढे पुनश्च हरिओम २ अगेन अंतर्गत लागू असलेल नियम लागू राहणार आहेत, असे चौधरी यांनी आदेशात म्हटले आहे.जिल्ह्यात १५ जुलैपासून लॉकडाऊन करत असल्याची घोषणा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केली होती. या लॉकाडाऊनला काही नागरिकांनी विरोध केला होता, तसेच लॉकडाऊन उठवण्याबाबत व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना निवेदनही दिले होते. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी चौधरी यांनी दोन वेळा थोडी शिथिलता देत लॉकडाऊन सुरू ठेवले होते. मात्र, शेवटी दोन दिवस आधीच त्यांनी लॉकडाऊन उठवला आहे. २४ जुलैच्या रात्रीच असे आदेश काढण्यात आल्याने व्यापारी, व्यावसायिक, तसेच नागरिकांना माहिती मिळाली नाही. त्यामुळे बाजारपेठांमध्ये व्यवहाराला विशेष गती आल्याचे दिसून आले नाही. अचानक लॉकडाऊन उठवल्याने काही नागरिकांनी नाराजीही व्यक्त केली.लॉकडाऊन केल्यानंतरही जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये घट झालेली नाही. त्यामुळे शुक्रवारी रात्री १२ वाजल्यापासून लॉकडाऊन उठवण्यात आल्याने सर्व व्यवहार सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस