शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
4
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
5
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
6
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
7
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
8
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
9
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
10
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
11
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
12
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
13
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
14
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
15
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
16
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
17
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
18
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
19
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
20
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!

रायगड जिल्ह्यात दोन दिवस आधीच उठवला लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 03:21 IST

रुग्णांत घट नाही । पुनश्च हरिओमचे निर्बंध लागू; पहिल्या दिवशी तुरळक दुकानेच सुरू

आविष्कार देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्करायगड : लॉकडाऊननंतरही रुग्णसंख्येत घट होत नसल्याने रायगडातील लॉकडाऊन दोन दिवस आधीच उठवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी घेतला आहे. शुक्रवारी रात्री १२ वाजल्यापासून लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय अंमलात आला आहे. मात्र, यापुढे पुनश्च हरिओम २ अगेन अंतर्गत लागू असलेल नियम लागू राहणार आहेत, असे चौधरी यांनी आदेशात म्हटले आहे.जिल्ह्यात १५ जुलैपासून लॉकडाऊन करत असल्याची घोषणा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केली होती. या लॉकाडाऊनला काही नागरिकांनी विरोध केला होता, तसेच लॉकडाऊन उठवण्याबाबत व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना निवेदनही दिले होते. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी चौधरी यांनी दोन वेळा थोडी शिथिलता देत लॉकडाऊन सुरू ठेवले होते. मात्र, शेवटी दोन दिवस आधीच त्यांनी लॉकडाऊन उठवला आहे. २४ जुलैच्या रात्रीच असे आदेश काढण्यात आल्याने व्यापारी, व्यावसायिक, तसेच नागरिकांना माहिती मिळाली नाही. त्यामुळे बाजारपेठांमध्ये व्यवहाराला विशेष गती आल्याचे दिसून आले नाही. अचानक लॉकडाऊन उठवल्याने काही नागरिकांनी नाराजीही व्यक्त केली.लॉकडाऊन केल्यानंतरही जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये घट झालेली नाही. त्यामुळे शुक्रवारी रात्री १२ वाजल्यापासून लॉकडाऊन उठवण्यात आल्याने सर्व व्यवहार सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस