शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown News: पनवेलहून ओडिशाला जाणारी रेल्वे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 03:59 IST

रायगड जिल्ह्यातील परप्रांतीयांना घेऊन गुरु वारी रात्री विशेष रेल्वे पनवेलहून सोडण्यात येणार होती

अलिबाग : लॉकडाउनमध्ये अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात परत पाठविण्याबाबत अडचणी वाढल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील पनवेलहून एक हजार २०० मजुरांना ओडिशा राज्यात घेऊन जाणारी विशेष रेल्वे गुरुवारी राज्य सरकारला रद्द करावी लागलीे. ओडिशा उच्च न्यायालयाने परराज्यातून येणाऱ्यांना थांबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ओडिशा सरकारकडून परवानगी न मिळाल्याने आपापल्या गावी निघालेल्या नागरिकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये तब्बल ६० हजाराहून अधिक नागरिकांनी आॅनलाईन अर्ज करुन आपापल्या राज्यात जाण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे. आतापर्यंत मध्यप्रदेशसाठी दोन रेल्वे आणि बिहारसाठी एक रेल्वे सोडण्यात आली आहे. त्यामध्ये अनुक्रमे दोन हजार ४०० आणि एक हजार २०० अशा एकूण तीन हजार ६०० नागरिकांचा समावेश आहे.

गुरुवारी रात्री आठ वाजता पनवेल रेल्वे स्टेशनहून ओडिशात रेल्वे सोडण्यात येणार होती. रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील ६३०, पेण तालुक्यातील ४१६ आणि अलिबागमधील १५६ नागरिकांना घेऊन रेल्वे पनवेलहून रवाना होणार होती.त्यासाठी अलिबागमधील १५६ नागरिकांना दुपारीच एसटीने पनवेलला नेण्यात आले होते. त्यांना आता परत आणावे लागत असल्याचे अतिरीक्त जिल्हाधिकारी भरत शितोळे यांनी सांगितले. पेण, पनवेल येथील नागरिक रेल्वे स्थानकात पोचले नसल्याने प्रशासनाचा त्रास वाचला आहे. हा निर्णय दुपारी दोन वाजता कळल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा प्रशासनाने बिहार आणि उत्तर प्रदेश राज्यात जाणाºया नागरिकांची सर्व तयारी पूर्ण केली आहे. परंतु बिहार राज्यानेही ११ मे पर्यंत अन्य राज्यातून येणाऱ्यांना मनाई केली आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश सरकारची अशीच भूमिका असल्याने अडचण वाढली आहे. गुरु वारी तीन रेल्वे पाठवण्याचे नियोजन होते असेही त्यांनी स्पष्ट केले.रायगड जिल्ह्यातील परप्रांतीयांना घेऊन गुरु वारी रात्री विशेष रेल्वे पनवेलहून सोडण्यात येणार होती. मात्र ओडिशा उच्च न्यायालयाने परराज्यातून येणाºयांना थांबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ओडिशाकडे जाणारी रेल्वे सरकारला रद्द करावी लागली आहे. एकट्या महाराष्ट्र राज्यासाठी हा निर्णय नाही, तर सर्व राज्यांसाठी हा नियम लागू होतो. तसेच उत्तर प्रदेश सरकारने तर तपासणी करूनच पाठविण्याबाबत सांगितले आहे. - आदिती तटकरे, पालकमंत्री, रायगड 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस