शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

Lockdown News: पनवेलहून ओडिशाला जाणारी रेल्वे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 03:59 IST

रायगड जिल्ह्यातील परप्रांतीयांना घेऊन गुरु वारी रात्री विशेष रेल्वे पनवेलहून सोडण्यात येणार होती

अलिबाग : लॉकडाउनमध्ये अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात परत पाठविण्याबाबत अडचणी वाढल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील पनवेलहून एक हजार २०० मजुरांना ओडिशा राज्यात घेऊन जाणारी विशेष रेल्वे गुरुवारी राज्य सरकारला रद्द करावी लागलीे. ओडिशा उच्च न्यायालयाने परराज्यातून येणाऱ्यांना थांबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ओडिशा सरकारकडून परवानगी न मिळाल्याने आपापल्या गावी निघालेल्या नागरिकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये तब्बल ६० हजाराहून अधिक नागरिकांनी आॅनलाईन अर्ज करुन आपापल्या राज्यात जाण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे. आतापर्यंत मध्यप्रदेशसाठी दोन रेल्वे आणि बिहारसाठी एक रेल्वे सोडण्यात आली आहे. त्यामध्ये अनुक्रमे दोन हजार ४०० आणि एक हजार २०० अशा एकूण तीन हजार ६०० नागरिकांचा समावेश आहे.

गुरुवारी रात्री आठ वाजता पनवेल रेल्वे स्टेशनहून ओडिशात रेल्वे सोडण्यात येणार होती. रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील ६३०, पेण तालुक्यातील ४१६ आणि अलिबागमधील १५६ नागरिकांना घेऊन रेल्वे पनवेलहून रवाना होणार होती.त्यासाठी अलिबागमधील १५६ नागरिकांना दुपारीच एसटीने पनवेलला नेण्यात आले होते. त्यांना आता परत आणावे लागत असल्याचे अतिरीक्त जिल्हाधिकारी भरत शितोळे यांनी सांगितले. पेण, पनवेल येथील नागरिक रेल्वे स्थानकात पोचले नसल्याने प्रशासनाचा त्रास वाचला आहे. हा निर्णय दुपारी दोन वाजता कळल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा प्रशासनाने बिहार आणि उत्तर प्रदेश राज्यात जाणाºया नागरिकांची सर्व तयारी पूर्ण केली आहे. परंतु बिहार राज्यानेही ११ मे पर्यंत अन्य राज्यातून येणाऱ्यांना मनाई केली आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश सरकारची अशीच भूमिका असल्याने अडचण वाढली आहे. गुरु वारी तीन रेल्वे पाठवण्याचे नियोजन होते असेही त्यांनी स्पष्ट केले.रायगड जिल्ह्यातील परप्रांतीयांना घेऊन गुरु वारी रात्री विशेष रेल्वे पनवेलहून सोडण्यात येणार होती. मात्र ओडिशा उच्च न्यायालयाने परराज्यातून येणाºयांना थांबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ओडिशाकडे जाणारी रेल्वे सरकारला रद्द करावी लागली आहे. एकट्या महाराष्ट्र राज्यासाठी हा निर्णय नाही, तर सर्व राज्यांसाठी हा नियम लागू होतो. तसेच उत्तर प्रदेश सरकारने तर तपासणी करूनच पाठविण्याबाबत सांगितले आहे. - आदिती तटकरे, पालकमंत्री, रायगड 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस