शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
2
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
3
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
4
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
5
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
6
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
7
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
8
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
9
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
10
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
11
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
12
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
13
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
14
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
15
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
16
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
17
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
18
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
19
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
20
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान

पालीमध्ये पशुधन अधिकाऱ्यांची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 02:44 IST

तापमानाचा पारा वाढत असल्याने गुरेही आजारी पडत आहे, अशा वेळी त्यांना उपचारासाठी न्यायचे कुठे, असा प्रश्न सध्या गुरांच्या मालकाला पडला आहे.

राबगाव /पाली : सुधागड तालुक्यात पाली, चव्हाणवाडी आणि जांभूळपाडा या ठिकाणी श्रेणी एकचा गुरांचा दवाखाना तर वाघोशी, खवली आणि नांदगावमध्ये श्रेणी दोनचा गुरांचा दवाखाना आहे; परंतु येथील गुरांच्या दवाखान्यात गेल्या अनेक दिवसांपासून पशुवैद्यकीय अधिकारी व अन्य पदे रिक्त आहेत.पाली या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या गुरांच्या दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी, विस्तार अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षक ही तीनही पदे रिक्त असून, फक्त शिपाई पदावर एक कर्मचारी हजर आहे. तर तालुक्यातील सर्वच दवाखान्यात आठ जागांपैकी फक्त दोनच जागांवर कर्मचारी आहेत. यामुळे सुधागड तालुक्यातील जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तापमानाचा पारा वाढत असल्याने गुरेही आजारी पडत आहे, अशा वेळी त्यांना उपचारासाठी न्यायचे कुठे, असा प्रश्न सध्या गुरांच्या मालकाला पडला आहे.पाली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनायक म्हात्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार पाली येथील श्रेणी एकच्या गुरांच्या दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी व विस्तार अधिकारी या दोन्ही पदांचा भार अतिरिक्त कार्यभार नागोठणे येथील पशुवैद्यकीय अधिकारी सोमनाथ भोजने यांना देण्यात आला आहे. मंगळवार आणि शुक्रवारी ते या दवाखान्यात हजर असतात, तर वाघोशी येथील पशुधन पर्यवेक्षकांना अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे.चव्हाणवाडी येथील श्रेणी एकच्या दवाखान्यात पेण येथील पशुवैद्यकीय अधिकारी तर जांभूळपाडा येथे खालापूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात आल्याने मनुष्यबळाअभावी त्यांच्यावरील ताण वाढला आहे.चारा व पाण्याच्या शोधात अनेक जनावरांना उन्हाचा फटका बसत असून वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जनावरांसाठी पशुधन विभागाकडून लसीकरण व पशुपालकांना मार्गदर्शनाची गरज निर्माण झाली आहे.जनावरांनाही ऋतुमानानुसार काही आजार जडतात, तसेच हवामान बदलाचा त्यांच्या प्रकृतीवरही परिणाम होतो. त्यात वेळीच उपचार न मिळाल्यास जनावरे दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकºयांचे नुकसान होते. येथे असलेल्या दवाखान्यांत सध्या पशुवैद्यकीय अधिकारी नाहीत, शिवाय लसी, इंजेक्शन उपलब्ध नाहीत. त्यामुळे दुभती जनावरे डोळ्यांसमोर मरताना पाहवी लागतात. शासनाने लक्ष दिल्यास पशुधन वाचेल आणि शेतकºयांचे नुकसान टळेल.- शरद गोळे, शेतकरी, शिळोशीसध्या जिल्ह्यातील वाढत्या पाºयामुळे नागरिक हैराण झाले आहेत. उन्हापासून माणसे विविध मार्गांनी आपला बचाव करू शकतात; मात्र जनावरांना कडक उन्हाचा फटका बसत आहे. गायवर्गीय गुरे आणि प्रजननक्षम असलेल्या गुरांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. चारा व पाणीटंचाईमुळे जिल्ह्यातील जनावरांची भटकंती सुरू आहे. त्यात पाण्याची कमतरता असल्याने जनावरांवर विपरीत परिणाम होत आहे.उन्हाच्या तीव्रतेमुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. जनावरे उष्माघाताचे बळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उष्माघातामध्ये जनावरांच्या शरीराचे तापमान १०३ ते १०७ अंश पर्यंत वाढते. यामुळे श्वसनाचा वेग व हृदयाचे ठोके वाढणे, जीभ बाहेर काढून तोंडाने श्वसन करणे, लाळ गाळणे, नाकातून स्राव येणे, भरपूर तहान लागणे, अस्वस्थता येणे, तोल जाऊन जनावरे कोसळणे, झटके येणे आदीची भीती वाढली आहे.

टॅग्स :cowगाय