शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पालीमध्ये पशुधन अधिकाऱ्यांची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 02:44 IST

तापमानाचा पारा वाढत असल्याने गुरेही आजारी पडत आहे, अशा वेळी त्यांना उपचारासाठी न्यायचे कुठे, असा प्रश्न सध्या गुरांच्या मालकाला पडला आहे.

राबगाव /पाली : सुधागड तालुक्यात पाली, चव्हाणवाडी आणि जांभूळपाडा या ठिकाणी श्रेणी एकचा गुरांचा दवाखाना तर वाघोशी, खवली आणि नांदगावमध्ये श्रेणी दोनचा गुरांचा दवाखाना आहे; परंतु येथील गुरांच्या दवाखान्यात गेल्या अनेक दिवसांपासून पशुवैद्यकीय अधिकारी व अन्य पदे रिक्त आहेत.पाली या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या गुरांच्या दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी, विस्तार अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षक ही तीनही पदे रिक्त असून, फक्त शिपाई पदावर एक कर्मचारी हजर आहे. तर तालुक्यातील सर्वच दवाखान्यात आठ जागांपैकी फक्त दोनच जागांवर कर्मचारी आहेत. यामुळे सुधागड तालुक्यातील जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तापमानाचा पारा वाढत असल्याने गुरेही आजारी पडत आहे, अशा वेळी त्यांना उपचारासाठी न्यायचे कुठे, असा प्रश्न सध्या गुरांच्या मालकाला पडला आहे.पाली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनायक म्हात्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार पाली येथील श्रेणी एकच्या गुरांच्या दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी व विस्तार अधिकारी या दोन्ही पदांचा भार अतिरिक्त कार्यभार नागोठणे येथील पशुवैद्यकीय अधिकारी सोमनाथ भोजने यांना देण्यात आला आहे. मंगळवार आणि शुक्रवारी ते या दवाखान्यात हजर असतात, तर वाघोशी येथील पशुधन पर्यवेक्षकांना अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे.चव्हाणवाडी येथील श्रेणी एकच्या दवाखान्यात पेण येथील पशुवैद्यकीय अधिकारी तर जांभूळपाडा येथे खालापूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात आल्याने मनुष्यबळाअभावी त्यांच्यावरील ताण वाढला आहे.चारा व पाण्याच्या शोधात अनेक जनावरांना उन्हाचा फटका बसत असून वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जनावरांसाठी पशुधन विभागाकडून लसीकरण व पशुपालकांना मार्गदर्शनाची गरज निर्माण झाली आहे.जनावरांनाही ऋतुमानानुसार काही आजार जडतात, तसेच हवामान बदलाचा त्यांच्या प्रकृतीवरही परिणाम होतो. त्यात वेळीच उपचार न मिळाल्यास जनावरे दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकºयांचे नुकसान होते. येथे असलेल्या दवाखान्यांत सध्या पशुवैद्यकीय अधिकारी नाहीत, शिवाय लसी, इंजेक्शन उपलब्ध नाहीत. त्यामुळे दुभती जनावरे डोळ्यांसमोर मरताना पाहवी लागतात. शासनाने लक्ष दिल्यास पशुधन वाचेल आणि शेतकºयांचे नुकसान टळेल.- शरद गोळे, शेतकरी, शिळोशीसध्या जिल्ह्यातील वाढत्या पाºयामुळे नागरिक हैराण झाले आहेत. उन्हापासून माणसे विविध मार्गांनी आपला बचाव करू शकतात; मात्र जनावरांना कडक उन्हाचा फटका बसत आहे. गायवर्गीय गुरे आणि प्रजननक्षम असलेल्या गुरांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. चारा व पाणीटंचाईमुळे जिल्ह्यातील जनावरांची भटकंती सुरू आहे. त्यात पाण्याची कमतरता असल्याने जनावरांवर विपरीत परिणाम होत आहे.उन्हाच्या तीव्रतेमुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. जनावरे उष्माघाताचे बळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उष्माघातामध्ये जनावरांच्या शरीराचे तापमान १०३ ते १०७ अंश पर्यंत वाढते. यामुळे श्वसनाचा वेग व हृदयाचे ठोके वाढणे, जीभ बाहेर काढून तोंडाने श्वसन करणे, लाळ गाळणे, नाकातून स्राव येणे, भरपूर तहान लागणे, अस्वस्थता येणे, तोल जाऊन जनावरे कोसळणे, झटके येणे आदीची भीती वाढली आहे.

टॅग्स :cowगाय