शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पालीमध्ये पशुधन अधिकाऱ्यांची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 02:44 IST

तापमानाचा पारा वाढत असल्याने गुरेही आजारी पडत आहे, अशा वेळी त्यांना उपचारासाठी न्यायचे कुठे, असा प्रश्न सध्या गुरांच्या मालकाला पडला आहे.

राबगाव /पाली : सुधागड तालुक्यात पाली, चव्हाणवाडी आणि जांभूळपाडा या ठिकाणी श्रेणी एकचा गुरांचा दवाखाना तर वाघोशी, खवली आणि नांदगावमध्ये श्रेणी दोनचा गुरांचा दवाखाना आहे; परंतु येथील गुरांच्या दवाखान्यात गेल्या अनेक दिवसांपासून पशुवैद्यकीय अधिकारी व अन्य पदे रिक्त आहेत.पाली या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या गुरांच्या दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी, विस्तार अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षक ही तीनही पदे रिक्त असून, फक्त शिपाई पदावर एक कर्मचारी हजर आहे. तर तालुक्यातील सर्वच दवाखान्यात आठ जागांपैकी फक्त दोनच जागांवर कर्मचारी आहेत. यामुळे सुधागड तालुक्यातील जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तापमानाचा पारा वाढत असल्याने गुरेही आजारी पडत आहे, अशा वेळी त्यांना उपचारासाठी न्यायचे कुठे, असा प्रश्न सध्या गुरांच्या मालकाला पडला आहे.पाली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनायक म्हात्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार पाली येथील श्रेणी एकच्या गुरांच्या दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी व विस्तार अधिकारी या दोन्ही पदांचा भार अतिरिक्त कार्यभार नागोठणे येथील पशुवैद्यकीय अधिकारी सोमनाथ भोजने यांना देण्यात आला आहे. मंगळवार आणि शुक्रवारी ते या दवाखान्यात हजर असतात, तर वाघोशी येथील पशुधन पर्यवेक्षकांना अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे.चव्हाणवाडी येथील श्रेणी एकच्या दवाखान्यात पेण येथील पशुवैद्यकीय अधिकारी तर जांभूळपाडा येथे खालापूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात आल्याने मनुष्यबळाअभावी त्यांच्यावरील ताण वाढला आहे.चारा व पाण्याच्या शोधात अनेक जनावरांना उन्हाचा फटका बसत असून वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जनावरांसाठी पशुधन विभागाकडून लसीकरण व पशुपालकांना मार्गदर्शनाची गरज निर्माण झाली आहे.जनावरांनाही ऋतुमानानुसार काही आजार जडतात, तसेच हवामान बदलाचा त्यांच्या प्रकृतीवरही परिणाम होतो. त्यात वेळीच उपचार न मिळाल्यास जनावरे दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकºयांचे नुकसान होते. येथे असलेल्या दवाखान्यांत सध्या पशुवैद्यकीय अधिकारी नाहीत, शिवाय लसी, इंजेक्शन उपलब्ध नाहीत. त्यामुळे दुभती जनावरे डोळ्यांसमोर मरताना पाहवी लागतात. शासनाने लक्ष दिल्यास पशुधन वाचेल आणि शेतकºयांचे नुकसान टळेल.- शरद गोळे, शेतकरी, शिळोशीसध्या जिल्ह्यातील वाढत्या पाºयामुळे नागरिक हैराण झाले आहेत. उन्हापासून माणसे विविध मार्गांनी आपला बचाव करू शकतात; मात्र जनावरांना कडक उन्हाचा फटका बसत आहे. गायवर्गीय गुरे आणि प्रजननक्षम असलेल्या गुरांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. चारा व पाणीटंचाईमुळे जिल्ह्यातील जनावरांची भटकंती सुरू आहे. त्यात पाण्याची कमतरता असल्याने जनावरांवर विपरीत परिणाम होत आहे.उन्हाच्या तीव्रतेमुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. जनावरे उष्माघाताचे बळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उष्माघातामध्ये जनावरांच्या शरीराचे तापमान १०३ ते १०७ अंश पर्यंत वाढते. यामुळे श्वसनाचा वेग व हृदयाचे ठोके वाढणे, जीभ बाहेर काढून तोंडाने श्वसन करणे, लाळ गाळणे, नाकातून स्राव येणे, भरपूर तहान लागणे, अस्वस्थता येणे, तोल जाऊन जनावरे कोसळणे, झटके येणे आदीची भीती वाढली आहे.

टॅग्स :cowगाय