शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
3
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
4
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
5
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
6
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
7
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
8
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
9
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
10
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
11
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
12
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
13
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
14
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
15
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
16
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
17
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
18
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
19
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
20
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी

कडाडणाऱ्या विजेलाही बदलावी लागणार दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 00:58 IST

जिल्ह्यात ९८० ठिकाणी बसवणार वीज प्रतिरोधक यंत्रणा : मनुष्य आणि वित्तहानी टाळता येणार

- आविष्कार देसाईरायगड : मान्सूनपूर्व कालावधीत अथवा पावसाळ्यामध्ये वीज अंगावर पडून मृत्यू पावणे, हे नित्याचेच झाले आहे. हकनाक होणारे मृत्यू, तसेच मालमत्तेचे होणारे नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्यातील ९८० ठिकाणी वीज प्रतिरोधक यंत्रणा बसविण्यात येणार आहे. राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत ही योजना आखण्यात आली आहे.जिल्ह्यात सरासरी साडेतीन हजार मिमी पावसाची नोंद होते. मान्सूनपूर्व पडणाºया पावसाच्या वेळी जिल्ह्यातील विविध भागांमध्ये वीज पडण्याच्या घटना सातत्याने घडताना दिसून येतात. त्यामध्ये दरवर्षी सरासरी दोन नागरिकांचा बळी जात आहे, तर गुरे-ढोरे मृत होण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. वीज पडून होणाºया आपत्तीमध्ये सार्वजनिक, तसेच खासगीही मालमत्तेचेही लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे.जिल्ह्याची लोकसंख्या २६ लाखांच्या आसपास आहे. विविध प्रकल्पांमुळे नागरिकरणामध्ये झपाट्याने वाढ होत आहे.दाटीवाटीच्या शहर-गावांमध्ये वीज पडल्यास हानी होण्याची अधिक शक्यता आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील १३ विभागांतील ९८० ठिकाणी वीज प्रतिरोधक यंत्रणा बसविण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय स्तरावर पाठविण्यात आला आहे.सर्वसाधारणपणे उंच इमारती, मोबाइल टॉवर, कंपन्यांच्या चिमण्या, वेधशाळा, उच्च दाबाच्या वीज वाहिनी टॉवर या ठिकाणी वीज प्रतिरोधक यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. या ठिकाणच्या परिसरामध्ये वीज कोसळली, तर वीज प्रतिरोधक यंत्रणा आपल्याकडे वीज खेचून घेते. त्यानंतर, तिच्या प्रणालीच्या माध्यमातून जमिनीखाली वळविली जाते. त्यामुळे वीज पडण्याच्या घटना कमी होऊन मनुष्य आणि वित्तहानी टाळता येते. यासाठीच जिल्ह्यात वीज प्रतिरोधक यंत्रणा बसविण्यात येणार आहे.या ठिकाणी बसविण्यात येणार वीज प्रतिरोधक यंत्रणाजिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग-१, जिल्हा परिषद मुख्यालय, रायगड-अलिबाग-१, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, रायगड-अलिबाग-१, जिल्हा सामान्य रुग्णालय, रायगड अलिबाग-१, उपविभागीय अधिकारी कार्यालय (सर्व)-८, तहसीलदार कार्यालय (सर्व)-१५, गटविकास अधिकारी कार्यालये (सर्व)-१५, नगरपालिका/नगरपंचायत कार्यालये (सर्व)-१५, उपजिल्हा रुग्णालये/ग्रामीण रुग्णालये (सर्व)-१६, प्राथमिक आरोग्य केंद्र (सर्व)-५२, पोलीस स्टेशन्स (सर्व)-३६, बसस्थानके-१५, ग्रामपंचायत कार्यालये (सर्व)-८०४, एकूण वीजप्रतिरोधक संख्या-९८०सरकारने दीपस्तंभाची डागडुजी करावीब्रिटिशांच्या कालावधीत अलिबाग-तालुक्यातील रेवस आणि मांडवा या ठिकाणी सुमारे १०० फूट उंचीचे दीपस्तंभ उभारण्यात आले होते. पूर्वी समुद्रामार्गे धरमतरची खाडी ते अगदी श्रीवर्धन ते गोवा, कर्नाटकपर्यंत व्यापार चालायचा. त्यांना हे दीपस्तंभ दिशादर्शक ठरायचे. त्याचप्रमाणे, मुघल कालखंडात रात्रीच्या वेळी भर समुद्रातून ऐखादे जहाज कोकण प्रांतात येत असेल, तर टेहळणी बुरुज म्हणूनही या दीपस्तंभाचा उपयोग केला जात होता. या दोन्ही दीपस्तंभांवर वीजरोधक प्रणाली बसविली होती. त्यामुळे अलिबाग तालुक्यांमध्ये वीज पडत नव्हती, असे अ‍ॅड.रत्नाकर पाटील यांनी सांगितले. साध्या तांब्याच्या साहित्याची सुमारे ५० वर्षांपूर्वी चोरी झाली आहे. सरकारने या दीपस्तंभाची डागडुजी करून वीज प्रतिरोधक यंत्रणा नव्याने कार्यान्वित करावी, अशी मागणी पाटील यांनी केली.वीज प्रतिरोधक बसविण्याबाबतचा प्रकल्प प्राथमिक अवस्थेत आहे. केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. प्रत्यक्षात प्रकल्प सुरू झाल्यावर वीज पडण्याच्या घटना रोखता येतील.- अभय यावलकर, संचालक, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग