शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

पावसामुळे जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 01:21 IST

वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या अतिवृष्टीने श्रीवर्धन तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

श्रीवर्धन : वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या अतिवृष्टीने श्रीवर्धन तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळात अनेकांच्या घरांचे मोठे नुकसान झाल्याने संसार उघड्यावर आले आहेत. सतत पडणाºया पावसामुळे वाहतूक व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहेत.श्रीवर्धन तालुक्याच्या तिन्ही बाजूने समुद्र असून पावसाबरोबरच उधाणाच्या भरतीचाही किनारी गावांना धोका आहे. शहरातील मुख्य रस्त्यावरील खोलगट भागात पाणी साचते. नगरपालिका ते तहसील कार्यालयादरम्यानचा रस्ता चिखलमय झाला आहे. एसटी स्टँडच्या समोरील बाजूस पाणी साचते. अवघ्या काही दिवसांपूर्वी श्रीवर्धनच्या जीवना बंदराजवळ झालेल्या वादळाने अनेक लोकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सरकारकडून नुकसानभरपाई मिळण्यासाठी पंचनामे करण्यात आले आहेत.श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी मार्गावर कोंडविल, तर समुद्र किनाºयाच्या आदगाव, सर्वा, नानवेली व दिघी या गावातील हद्दीत दरडण्याची शक्यता आहे. आदगाव, सर्वा व नानवेली या तिन्ही गावांच्या वाहतुकीचे रस्त्याच्या दुतर्फा डोंगर व दाट वनराई आहे. आदगाव सर्वा रस्त्याच्या कामासाठी उजव्या बाजूला असलेला डोंगरात खोदकाम सुरू असल्याने आदगाव सर्वा रस्ता दरडप्रवण क्षेत्र बनू शकतो.शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे आदगाव कुणबी वाडीचा जोड रस्ता अक्षरश: वाहून गेला आहे. कुणबी वाडीची लोकसंख्या १५० च्या आसपास आहे. जोड रस्त्याच्या शेजारील शेतकरी राजेंद्र शिंदे यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. जोड रस्ताच वाहून गेल्यामुळे दळणवळणास अडचणी येत आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील वावे, नागलोली, धनगरमलई, आडी, कोलमांडला, जावेळे, गडबवाडी भागात दाट जंगल आहे. पावसाचे प्रमाण जास्त झाल्यास झाडे कोसळली आहेत.