शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

२०० विद्यार्थ्यांची पालकांना पत्रे

By admin | Updated: June 30, 2016 02:51 IST

आपला देश स्वच्छ आणि आरोग्य संपन्न राहावा यासाठी आपल्या घरी तातडीने शौचालय बांधावे

आविष्कार देसाई,

अलिबाग- ‘प्रिय, बाबा स.न.वि.वि. पत्रास कारण की...आपला परिसर आणि आपला देश स्वच्छ आणि आरोग्य संपन्न राहावा यासाठी आपल्या घरी तातडीने शौचालय बांधावे’, अशा आशयाची सुमारे दोनशे पत्रे अलिबाग तालुक्यातील विद्यार्थ्यांनी आपापल्या आई-वडिलांना लिहिली आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने हा पायलट प्रोजेक्ट राबविण्यात आला. या प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने लवकरच सर्व जिल्ह्यामध्ये तो राबविण्यात येणार आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत २०१९ सालापर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे. अभियान यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत विविध इनोव्हेटीव्ह आयडिया राबविल्या जात आहेत. रायगड जिल्ह्याला २०१६ मध्ये ३८ हजार ५८२ वैयक्तिक शौचालये बांधायची आहेत. आतापर्यंत चार हजार ३३५ वैयक्तिक शौचालये बांधून पूर्ण झाली आहेत. अद्यापही ३४ हजार २४७ वैयक्तिक शौचालये बांधायची शिल्लक आहेत.वेळ कमी आणि टार्गेट जास्त असल्याने रायगड जिल्हा परिषद विविध संकल्पना राबवित आहे. अशीच एक भन्नाट कल्पना मंगळवारी अलिबाग तालुक्यातील शाळांमध्ये राबविण्यात आली. तेथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना स्वच्छतेसाठी वैयक्तिक शौचालयाची गरज याचे महत्त्व पटवून देण्यात आले. त्यानंतर शौचालय नसलेल्या विद्यार्थ्यांना आपापल्या आई-वडिलांना पत्र लिहून वैयक्तिक शौचालयाची मागणी करण्यास प्रोत्साहित करण्यात आले आहे. >पत्र पाठविण्यामध्ये मुलींची संख्या मोठीपत्र पाठविण्यामध्ये मुलींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे. विद्यार्थ्यांनी लिहिलेली पत्रे त्यांच्या आई-वडिलांना दोन-तीन दिवसात पोस्ट आॅफिसमार्फत प्राप्त होतील. मुलांनी पत्राद्वारे केलेल्या मागणीला पालक सकारात्मक प्रतिसाद देतील, असा विश्वास पाणी व स्वच्छता विभागाचे जिल्हा कार्यक्रम प्रमुख जयवंत गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.>वैयक्तिक शौचालय बांधण्याची मागणीसुमारे २०० विद्यार्थ्यांनी आपापल्या आई-वडिलांना पत्र लिहून घरी वैयक्तिक शौचालय बांधण्याची मागणी केली आहे. त्यामध्ये अलिबाग तालुक्यातील नवगाव हायस्कूल, परहूर येथील खोपकर महाविद्यालय, कावीर ग्रामपंचायत हद्दीतील आर.पी.पाटील हायस्कूल तसेच खानाव हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी पाणी व स्वच्छता विभागाच्या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. नुसते टार्गेट पूर्ण करणे हा उद्देश नसून त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटणे हे महत्त्वाचे असल्याचे साळुंखे यांनी सांगितले.