शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

शेतक-यांची मुख्यमंत्र्यांना पत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 04:59 IST

शेतक-यांना गेल्या ३० वर्षांच्या नुकसानभरपाईसह शेती संरक्षक बंधारे, निक्षारीकरणाची निचरा व्यवस्था आणि पक्के शेतरस्ते तयार करून मिळावे

जयंत धुळप।अलिबाग : गेली ३० वर्षे खारभूमी विभागाने अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील जमिनी नापीक केल्यामुळे शेतक-यांना गेल्या ३० वर्षांच्या नुकसानभरपाईसह शेती संरक्षक बंधारे, निक्षारीकरणाची निचरा व्यवस्था आणि पक्के शेतरस्ते तयार करून मिळावे, या प्रमुख मागणीसह खारभूमी नुकसानीस नैसर्गिक आपत्ती घोषित करणे, अंबा खोरे कोलाड रायगड येथील गोडे पाणी समुद्रात न सोडता, शेतीस देणे आणि पर्यायी विकास शेतीअंतर्गत, एकाच वेळी तीन पिकांचा प्रकल्प समजून घेणे, या मागण्यांच्या पूर्ततेसाठी मंगळवारच्या स्वातंत्र्यदिनी अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील उधाणग्रस्त १००० शेतक-यांनी आपली मागणीपत्रे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविली असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा संघटक राजन भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.गेल्या ३० वर्षांपासून आमच्या जवळ असलेले नवसंशोधन आम्ही देशासाठी देण्यास तयार आहोत. ‘पाण्याखाली मासे, वरती भाताचे पीक व बांधांवर सोलर वीजनिर्मिती’ असा एकाच जमिनीतून, एकाच वेळी तीन पिकांचा प्रकल्प आम्ही आपणास देऊ इच्छितो. आमच्याकडे पदवी नाही म्हणून आमचा प्रकल्प नाकारू नका. खारेपाटातील शेतकºयांनी गेल्या ३० वर्षांत आत्महत्या केली नाही म्हणून आम्ही शेतकरी नाहीत, अशी समजूत करून घेऊ नका, असा इशारा या पत्रांमधून स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आला आहे.नुकसानभरपाईची मागणीखारेपाटातील शेती ३० वर्षे अनुत्पादक आहे. त्यामुळे शेतकºयांना कर्जमुक्तीबरोबर प्रतिएकरी ५० हजार रुपयांप्रमाणे ३० वर्षांची पंधरा लाख रु पये नुकसानभरपाई द्यावी, तसेच येथे खाड्यांचे बंधारे व दळणवळणासाठी पक्के शेतरस्ते तयार करून मिळावेत, अशी विनंती करण्यात आली आहे.>खारे पाणी घुसून शेती नापीक१९७९मध्ये खारलँड कायदा अस्तित्वात आल्यानंतर संरक्षक बंधारे जे पूर्वी गावकी श्रमदानातून बांधत होते, ते काम खारभूमी विभाग करू लागले. खारभूमीचे अलिबाग तालुक्यात २३ हजार हेक्टर लाभ क्षेत्र तयार झाले असून व ते शासकीय राजपत्राद्वारे घोषित झाले. काही बांध खारभूमी विभागाने ताब्यात घेतलेच नाहीत. बांध बांधण्यासाठी कंत्राटदार आले. कामे न होता बिले निघाली. अलिबाग तालुक्यातील ७ हजार हेक्टर खारभूमी क्षेत्रापैकी ३०३६ हेक्टरपेक्षा जास्त सुपीक क्षेत्र, खारभूमी विभागाने १९८२ सालापासून संरक्षक बंधारे दुरु स्त न केल्यामुळे खारे पाणी घुसून नापीक केले आहे.>३० वर्षांत ४५ लाख दिवसांचा रोजगार बुडाला३० वर्षांच्या कालखंडात १८ लाख क्विंटल भाताचे (तांदळाचे) उत्पादन होऊ शकले नाही. तसेच ४५ लाख दिवसांचा रोजगार बुडाला. सरासरी १८ लाख क्विंटल माशांचे उत्पादन होऊ शकले नाही, असे गणित या पत्रात मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून देण्यात आले आहे.