शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे

By admin | Updated: January 15, 2017 05:34 IST

रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब आहे. दुर्घटना घडणार नाहीत यासाठी एसटीचालकांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत. तसेच तंत्रविभागाने वाहनांच्या

मुरूड : रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब आहे. दुर्घटना घडणार नाहीत यासाठी एसटीचालकांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत. तसेच तंत्रविभागाने वाहनांच्या तांत्रिक अडचणी गांभीर्याने सोडवल्या पाहिजेत, याशिवाय प्रशासनाने कर्मचाऱ्यांची मानसिकता चांगली राहील, याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन रेवदंडा येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी केले.मुरूड आगारातर्फे आयोजित सुरक्षितता मोहिमेंतर्गत जनजागृती करण्यात आली. प्रवासी बसमध्ये त्या मार्गावरील असणारे पोलीस नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिल्यास अपघात घडल्यास तातडीने मदत मिळणे शक्य होईल, याकडे लक्ष वेधले. महामंडळाने कर्मचाऱ्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. व्यासपीठावर आगार व्यवस्थापक तेजस गायकवाड, तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत सुर्वे, लेखापाल प्रकाश भादरिंगे, कैलास भगत आदी उपस्थित होते.माणगावात पोलीस पाटील कार्यशाळा- माणगाव येथील तहसील कार्यालयात बुधवारी माणगाव, तळा तालुक्यातील डीवायएसपी दत्ता नलावडे यांच्या उपस्थितीत पोलीस पाटलांची कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. कार्यशाळेत दोन्ही तालुक्यांतील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी माणगावचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे, गोरेगावचे पो. निरीक्षक विक्र म जगताप, तळा. पो. ठाण्याचे पो. नि. साबळे आदींनी मार्गदर्शन केले. - डीवायएसपी नलावडे यांनी, सर्व कायदे, कामाची सुसूत्रता, त्याबाबत येणाऱ्या अडचणी, गावात सुरू असलेले अवैध गावठी दारूचे धंदे यावर सक्त कारवाई करण्याबाबतची माहिती पोलीस पाटील यांनी दिली. पो. नि. लेंगरे यांनीही मार्गदर्शन केले. तर गोरेगावचे पो. नि. जगताप यांनी पोलीस पाटील अधिनियम १९६७बाबत पोलीस पाटील यांची कर्तव्य, नेमणुका यासंदर्भात माहिती दिली.